शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

औरंगाबादच्या प्लास्टीक उद्योगांवर कच्च्या मालाचे संकट

By | Updated: December 5, 2020 04:08 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अजूनही विमान मालवाहतूक, जहाजांद्वारे होणारी मालवाहतूक ठप्प आहे. त्यामुळे विविध देशांत कंटेनर अडकून पडले आहेत. ...

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अजूनही विमान मालवाहतूक, जहाजांद्वारे होणारी मालवाहतूक ठप्प आहे. त्यामुळे विविध देशांत कंटेनर अडकून पडले आहेत. तथापि, प्लास्टीक उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवर मोठा परिणाम झाला असून दुसरीकडे, कच्च्या मालाच्या सीमाशुल्कामध्येही कैक पटीने वाढ झाल्यामुळे औरंगाबादसह देशभरातील प्लास्टीक उद्योग संकटात सापडले आहेत.

औरंगाबादेत गरवारे पॉलिएस्टर, कॉस्मो फिल्म या मोठ्या कंपन्यांसह लहान-मोठे मिळून जवळपास सव्वाशे उद्योग कार्यरत आहेत. हे उद्योग शेतीसाठी पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचनाचे पाईप, पॉलिहाऊससाठी लागणारे प्लास्टीकचे आच्छादन, ऑटोमोबाईलसाठी लागणाऱ्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या, दुधाच्या पिशव्या, कार किंवा अन्य इंटेरियर डिझाईनसाठी काचांना लावण्यात येणारी फिल्म, एक्स रेसाठी प्लास्टीकची सीट आदी दैनंदिन गरजांची उत्पादने तयार करतात.

टंचाईची कारणे नेमके कोणती

मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक देशांत लॉकडाऊन करण्यात आले. विमान मालवाहतूक व जहाज वाहतूक ठप्प झाली. मात्र, सप्टेंबरपासून चीन यातून सावरला व त्याने आपल्या देशातील उद्योग व निर्यातील गती दिली. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर चीनने सुमारे ९ लाख कंटेनरद्वारे उत्तर अमेरिकेसह अनेक देशांत उत्पादने व कच्चा माल निर्यात केला. मात्र, ते कंटेनर हाताळण्यासाठी किंवा परत चीनला पाठविण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अनेक देशांत कंटेनर पडून आहेत. परिणामी, चीनसह विविध देशांतून भारतात येणाऱ्या कच्च्या मालावर मर्यादा आली. सध्या त्याची सर्वाधिक झळ प्लास्टीक उद्योगांना बसली आहे.

दुपटीने वाढल्या कच्च्या मालाच्या किमती

यासंदर्भात मराठवाडा प्लास्टीक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष भरतसिंग राजपूत यांनी सांगितले की, अलीकडच्या पाच महिन्यांपासून वेगवेगळ्या प्लास्टीक उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती व सीमाशुल्कात भरमसाठ वाढ झाल्यामुळे औरंगाबादसह देशभरातील प्लास्टीक उद्योग अडचणीत सापडले आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत शंभर पटीने वाढ झाली आहे. याबाबत आमच्या देशपातळीवरील संघटनेने कच्च्या मालाच्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा केली आहे. त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रातील अनेक प्लास्टीक उद्योग कधी बंद पडतील, ते सांगता येत नाही.

कोठून येतो कच्चा माल

भारतात प्रामुख्याने सौदी अरब, जपान, कोरिया, थायलंड या देशांतून प्लास्टीक उत्पादनासाठी कच्चा माल (दाणे स्वरुपात) येतो. देशात ओएनजीसी, इंडियन ऑईल, एमआरपीएल, एचएमईएल या सरकारी कंपन्याबरोबर रिलायन्स ही खासगी कंपनी कच्चा माल तयार करते. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची टंचाई जाणवत आहे.

भाववाढीची स्थिती अशी

कच्चा माल सध्याची दरवाढ टक्केवारीमध्ये

पीव्हीसी ६४ टक्के

एबीएस १४० टक्के

पीसी १११ टक्के

एचडीपीई २८ टक्के

पॉलिप्रोपीलीन ३४ टक्के

जीपीएस ४३ टक्के

एचआयपीएस ४८ टक्के