शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
2
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
3
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
4
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
5
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
6
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
7
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
8
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
9
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
10
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
11
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
12
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
13
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
14
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
15
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
16
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
17
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
18
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
19
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
20
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट

औरंगाबादच्या प्लास्टीक उद्योगांवर कच्च्या मालाचे संकट

By | Updated: December 5, 2020 04:08 IST

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अजूनही विमान मालवाहतूक, जहाजांद्वारे होणारी मालवाहतूक ठप्प आहे. त्यामुळे विविध देशांत कंटेनर अडकून पडले आहेत. ...

औरंगाबाद : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अजूनही विमान मालवाहतूक, जहाजांद्वारे होणारी मालवाहतूक ठप्प आहे. त्यामुळे विविध देशांत कंटेनर अडकून पडले आहेत. तथापि, प्लास्टीक उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या आयातीवर मोठा परिणाम झाला असून दुसरीकडे, कच्च्या मालाच्या सीमाशुल्कामध्येही कैक पटीने वाढ झाल्यामुळे औरंगाबादसह देशभरातील प्लास्टीक उद्योग संकटात सापडले आहेत.

औरंगाबादेत गरवारे पॉलिएस्टर, कॉस्मो फिल्म या मोठ्या कंपन्यांसह लहान-मोठे मिळून जवळपास सव्वाशे उद्योग कार्यरत आहेत. हे उद्योग शेतीसाठी पीव्हीसी पाईप, ठिबक सिंचनाचे पाईप, पॉलिहाऊससाठी लागणारे प्लास्टीकचे आच्छादन, ऑटोमोबाईलसाठी लागणाऱ्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या, दुधाच्या पिशव्या, कार किंवा अन्य इंटेरियर डिझाईनसाठी काचांना लावण्यात येणारी फिल्म, एक्स रेसाठी प्लास्टीकची सीट आदी दैनंदिन गरजांची उत्पादने तयार करतात.

टंचाईची कारणे नेमके कोणती

मार्चमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक देशांत लॉकडाऊन करण्यात आले. विमान मालवाहतूक व जहाज वाहतूक ठप्प झाली. मात्र, सप्टेंबरपासून चीन यातून सावरला व त्याने आपल्या देशातील उद्योग व निर्यातील गती दिली. ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर चीनने सुमारे ९ लाख कंटेनरद्वारे उत्तर अमेरिकेसह अनेक देशांत उत्पादने व कच्चा माल निर्यात केला. मात्र, ते कंटेनर हाताळण्यासाठी किंवा परत चीनला पाठविण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे अनेक देशांत कंटेनर पडून आहेत. परिणामी, चीनसह विविध देशांतून भारतात येणाऱ्या कच्च्या मालावर मर्यादा आली. सध्या त्याची सर्वाधिक झळ प्लास्टीक उद्योगांना बसली आहे.

दुपटीने वाढल्या कच्च्या मालाच्या किमती

यासंदर्भात मराठवाडा प्लास्टीक मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष भरतसिंग राजपूत यांनी सांगितले की, अलीकडच्या पाच महिन्यांपासून वेगवेगळ्या प्लास्टीक उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती व सीमाशुल्कात भरमसाठ वाढ झाल्यामुळे औरंगाबादसह देशभरातील प्लास्टीक उद्योग अडचणीत सापडले आहेत. कच्च्या मालाच्या किमतीत शंभर पटीने वाढ झाली आहे. याबाबत आमच्या देशपातळीवरील संघटनेने कच्च्या मालाच्या भाववाढीवर नियंत्रण आणण्याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा केली आहे. त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. औरंगाबादच्या औद्योगिक क्षेत्रातील अनेक प्लास्टीक उद्योग कधी बंद पडतील, ते सांगता येत नाही.

कोठून येतो कच्चा माल

भारतात प्रामुख्याने सौदी अरब, जपान, कोरिया, थायलंड या देशांतून प्लास्टीक उत्पादनासाठी कच्चा माल (दाणे स्वरुपात) येतो. देशात ओएनजीसी, इंडियन ऑईल, एमआरपीएल, एचएमईएल या सरकारी कंपन्याबरोबर रिलायन्स ही खासगी कंपनी कच्चा माल तयार करते. मात्र, त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची टंचाई जाणवत आहे.

भाववाढीची स्थिती अशी

कच्चा माल सध्याची दरवाढ टक्केवारीमध्ये

पीव्हीसी ६४ टक्के

एबीएस १४० टक्के

पीसी १११ टक्के

एचडीपीई २८ टक्के

पॉलिप्रोपीलीन ३४ टक्के

जीपीएस ४३ टक्के

एचआयपीएस ४८ टक्के