शहरं
Join us  
Trending Stories
1
काय झालास तू? 'व्होट बँके'साठी महाभियोग प्रस्ताव आणल्याचा आरोप, ठाकरेंना अमित शाहांनी घेरले
2
नेहरू, इंदिरा गांधी अन् सोनिया गांधी...! अमित शाह यांनी थेट लोकसभेत दिली मत चोरीची 3 उदाहरणं, स्पष्टच बोलले
3
"त्यांच्यावर बोलायला मी रिकामा नाही"; राहुल गांधींच्या आरोपांची मुख्यमंत्री फडणवीसांनी उडवली खिल्ली
4
सीतामढी जिल्ह्यात 'HIV ब्लास्ट', आतापर्यंत 7400 HIV ग्रस्त आढळले? डॉक्टर म्हणाले, बाधितांनी निगेटिव्हसोबत लग्न करू नये
5
इस्रायली पंतप्रधानांचा PM मोदींना फोन, या संदर्भात व्यक्त केला आनंद; गाझावरही चर्चा
6
भरधाव ब्रेझा उभ्या असलेल्या वॅगनआरला धडकली, दोन्ही कारने घेतला पेट; 5 जणांचा मृत्यू
7
संस्थेची गाडी, हातात अर्ज अन् चर्चांना उधाण; तानाजी सावंतांच्या मुलाने भरला भाजपचा उमेदवारी अर्ज?
8
'उपमुख्यमंत्र्यांच्या मुलाला वाचवताय का?'; मुंढवा जमीन घोटाळ्याच्या FIR वर हायकोर्टाचा पोलिसांना थेट सवाल
9
स्मृती मानधना लग्न मोडल्यावर पहिल्यांदाच सर्वांसमोर, 'तिला' पाहताच मारली मिठी... (VIDEO)
10
STवर ४ हजार कोटींचा आर्थिक भार, देणी कधीपर्यंत फेडणार?; प्रताप सरनाईकांनी तारीखच सांगितली
11
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: लक्ष्मी देवीसह स्वामी सेवा करा; धनधान्य, वैभव, कालातीत कृपा लाभेल!
12
IND vs SA T20: संजू सॅमसनला Playing XI मध्ये का घेतलं नाही? माजी क्रिकेटरने सांगितलं 'लॉजिक'
13
समसप्तक वसुमान योगात कालाष्टमी २०२५: ६ राशींना धनलाभ योग, चौपट भरभराट; पण पैसे उसने देऊ नका!
14
अयोध्येच्या राम मंदिरात दर्शन घ्यायला केव्हा जाणार? अखिलेश यादव यांनी काय उत्तर दिलं पाहा
15
"काय बोलायचं ते मी ठरवेन, तुम्ही सांगू नका..."; अमित शाह-राहुल गांधींमध्ये लोकसभेत खडाजंगी
16
रोहित शर्मा नंबर १, विराट कोहली नंबर २ ... ताज्या ICC ODI क्रमवारीत टीम इंडियाचा धुमधडाका
17
“ज्यांनी लाडकी बहीण योजना आणली ते १ नंबरवरून दोनवर गेले”; जयंत पाटलांचा एकनाथ शिंदेंना टोला
18
चालत्या बसमधून उचलून २ महिने जेलमध्ये डांबलं; टॉपर विद्यार्थ्याला अडकवणारे पोलीस CCTV मुळे फसले
19
"EVM नव्हे, पंतप्रधान मोदी...!"; कंगना रनौतचा काँग्रेसवर जोरदार निशाणा, स्पष्टच बोलल्या
20
IPL 2026 Auction : मिनी लिलावाच्या फायनल यादीत घोळ! विराट-क्रिसचं नाव झालेले ‘गायब’, आता...
Daily Top 2Weekly Top 5

‘आजोबांकडे संपत्ती आहे’; पतसंस्थेचा मॅनेजरच निघाला नातीच्या अपहरणाच्या कटाचा मास्टरमाइंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:49 IST

अपहरण करण्यासाठी १५ दिवसांपेक्षा अधिक काळ रेकी. त्यानंतर इतर सहभागी आरोपींना खंडणीतील प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले.

छत्रपती संभाजीनगर: मुलीच्या आजोबाकडे गडगंज संपत्ती आहे, त्यांची किंमती शेतजमीन आपल्याच गातात आहे, हे माहिती असलेल्या गणेश मोरे हाच या अपहरणाच्या कटाचा मुख्यसुत्रधार असल्याचे पोलिस तपासात समोर आले. अपहरण करून दीड कोटींची खंडणी मुलीच्या आजोबांकडे मागण्याची शक्कल त्यानेच लढतली.

गणेश हा अंबड तालुक्यातील एका गावात असलेल्या पतसंस्थेचा शाखा व्यवस्थापक आहे. इतर दोन आरोपी चालक असून, एकजण शेती करतो. अपहरण करण्यासाठी गणेशने १५ दिवसांपेक्षा अधिक काळ रेकी केली. त्यानंतर इतर सहभागी आरोपींना खंडणीतील प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी गणेशने गावातीलच सख्खा चुलता बाबासाहेब मोरे, बळीराम ऊर्फ भय्या महाजन यांच्यासह शेजारी गावातील संदीप ऊर्फ पप्पू पवार यांना तयार केले. त्यानुसार अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पण, शहरातील रस्त्यांची माहिती नसल्यामुळे आरोपींनी ज्या रस्त्यावर गाडी नेली, तो रस्ताच पुढे बंद होता. त्यामुळे त्यांना गाडी सोडून पळून जावे लागले.

फिर्यादीसह आरोपी एकाच गावचेअपहरणाचा प्रयत्न झालेल्या मुलीचे आजोबा, त्यांचा गाडीवरील चालक आणि तीन आरोपी एकाच गावातील आहेत. मुलीच्या आजोबांची संपूर्ण माहिती आरोपींना होती. मुलीचे आजोबा महागड्या गाडीतून गावात जात होते. त्याठिकाणी ये-जा असल्यामुळे आरोपींना त्यांच्याकडे संपत्ती असल्याची माहिती होती. तसेच त्याच गावातील चालक मुलीला क्लासला घेऊन जाणाऱ्या गाडीवर चालक हाेता. त्याचीही आराेपींसोबत ओळख होती. आरोपी त्याला फोनही करीत होता.

पुण्यातील प्लॅन फसलापुण्यातील खराडी परिसरातूनही एकाच्या अपहरणाचा प्लॅन करण्यात आला हाेता. मात्र, तो प्लॅन फसल्यामुळे आरोपींनी छत्रपती संभाजीनगर शहरातील मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न केल्याचे आरोपीच्या चौकशीतून समोर आले आहे. त्यात मुख्य आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्याकडून याविषयी अधिक उलगडा होण्याची शक्यता आहे.

दोन आरोपींना पाच दिवसांची कोठडीशहर पोलिसांनी अटक केलेल्या दोन आरोपींना तपास अधिकारी पाेलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी न्यायालयात हजर केले. तेव्हा आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

कुटुंबाला दिले संरक्षणअपहरणाचा प्रयत्न झालेल्या मुलीच्या कुटुंबाला शहर पोलिसांनी संरक्षण दिले आहे. या घटनेमुळे घाबरलेल्या कुटुंबाला पोलिस संरक्षण देण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

चैतन्य तुपे प्रकरणाशी साधर्म्यशहरातील बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा चैतन्य तुपे याच्या अपहरणानंतर आरोपींनी फोन करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या घटनेतील आरोपी जालना जिल्ह्यातीलच होते. त्यांनी बाहेरून येऊन अपहरण केले होते. बुधवारी घडलेल्या घटनेतही आरोपी जालना जिल्ह्यातीलच असून, त्यांनीही दीड कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा कट होता. तसेच यात मुलीचे आजोबा हे जमीन व्यावसायिक आहेत.

तांत्रिक माहितीचा बारकाईने अभ्यासमुलीच्या अपहरणाचा प्रयत्न झाल्यानंतर शहर पोलिसांच्या विविध पथकांनी संपूर्ण प्रकरणाचा, तांत्रिक माहितीचा बारकाईने अभ्यास करीत रातोरात आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर आरोपींना ताब्यात घेत घटनेचा उलगडा केला आहे.- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर