शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

समांतरचे नवीन डिझाईन तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 23:20 IST

समांतर जलवाहिनी योजनेचे डिझाईन मनपाने तब्बल १२ वर्षांपूर्वी तयार केले होते. २०२५ मध्ये शहराची संभाव्य लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार केली होती. शहर झपाट्याने वाढत आहे. सातारा-देवळाईसारखा महत्त्वाचा भागही आता मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त : पाणी प्रश्नावर भाजप नगरसेवकांनी घेतली भेट

औरंगाबाद : समांतर जलवाहिनी योजनेचे डिझाईन मनपाने तब्बल १२ वर्षांपूर्वी तयार केले होते. २०२५ मध्ये शहराची संभाव्य लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून ही योजना तयार केली होती. शहर झपाट्याने वाढत आहे. सातारा-देवळाईसारखा महत्त्वाचा भागही आता मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे संभाव्य समांतर जलवाहिनी योजनेचे नवीन डिझाईन तयार करा, असे आदेश आज विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपाला दिले.शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. सिडको-हडकोसह जालना रोडवरील अनेक वॉर्डांना आठ ते दहा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत महापालिकेला पाण्याचे नियोजन करता आले नाही. त्यामुळे आज भाजपा नगसेवकांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांची भेट घेतली. आयुक्तांनी प्रथम कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्याशी फोनवर संपर्क साधून समांतरची सद्य:स्थिती जाणून घेतली. त्यानंतर विधि सल्लागार अपर्णा थेटे यांच्याकडून कादेशीर माहिती घेतली. नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसेकर यांच्यासोबतही समांतर जलवाहिनीसंदर्भात सविस्तर चर्चा केली. म्हैसेकर यांनी नमूद केले की, मुळात ही योजना १२ वर्षांपूर्वी तयार केली होती. योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत तिचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे जुनी योजना आज राबवून काहीच उपयोग होणार नाही. महापालिकेलाही यापूर्वी नवीन डिझाईन तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शासनाकडे नवीन योजनेचा प्रस्ताव पाठविल्यास त्यात काहीतरी मार्ग काढता येईल. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत मुख्य जलवाहिनी तरी टाकता येईल. या कामासाठी स्वतंत्र टेंडर काढता येऊ शकते का, याची चाचपणी करण्यात येईल. सातारा-देवळाईसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविणे अशक्य आहे. नवीन योजनेत सातारा देवळाईसह २०४५ किंवा २०४० ची लोकसंख्या डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प राबवावा लागेल, असेही त्यांनी नमूद केले.केंद्रेकर यांनी मनपा अधिकाऱ्यांना नवीन योजनेचे डिझाईन तयार करण्याचे आदेश दिले. यावेळी उपमहापौर विजय औताडे, माजी महापौर बापू घडमोडे, प्रमोद राठोड, दामूअण्णा शिंदे, मनोज गांगवे, माधुरी अदवंत आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी