शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

समृद्धीच्या कामात भेगा; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 4:54 PM

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा मागील सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी असलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे.

ठळक मुद्देमहामार्गाचे काम काही खाजगी कंपन्यांना देण्यात आले आहे.कोरोना संसर्ग आणि पावसाळ्यामुळे या महामार्गाचे काम संथ गतीनेपावसामुळे कंत्राटदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे

- बाबासाहेब धुमाळ 

वैजापूर : वैजापूर तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामात अनेक त्रुटी आढळून येत आहेत. महामार्ग उंच करण्यासाठी कंत्राटदाराने वापरलेली माती व मुरूम पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याने रस्त्यावर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. याकडे सरकार व संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने महामार्गाच्या कामाची गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत आहे.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग हा मागील सरकारचा सर्वात महत्त्वाकांक्षी असलेला महत्त्वाचा प्रकल्प आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करून २०१८-१९ दरम्यान या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. महामार्गाचे काम काही खाजगी कंपन्यांना देण्यात आले आहे. मात्र, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून कोरोना संसर्ग आणि पावसाळ्यामुळे या महामार्गाचे काम संथ गतीने सुरू आहे. ठिकठिकाणी पूल, काँक्रिटीकरण, तर कोठे मातीचा भराव टाकण्याचे काम केले जात आहे. वैजापूर तालुक्यातील करंजगाव, बोरदहेगाव, सटाणा, अगरसायगाव, डवाळा, खंबाळा, सुराळा आदी गावांतून हा महामार्ग गेला असून, त्यासाठी एल अँड टी कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे.

बोरदहेगाव शिवारातील जुने पालखेड, दहेगाव व सटाणा या गावांजवळ कंत्राटदाराने माती व मुरमाचा भराव टाकून महामार्गाची उंची सुमारे ६ मीटरपर्यंत वाढवली आहे. त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण करून येथील काम पूर्णदेखील झाले आहे. मात्र, आता ज्या ठिकाणी पुलाचे काम करण्यात आले आहे त्या पुलाखालील माती आणि मुरमाचा भराव पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. त्यामुळे या रस्त्याला मोठमोठ्या भेगा पडल्या असून, समृद्धी महामार्गावरील या जागेवर मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेकडे एल अँड टी कंपनीचे दुर्लक्ष होत आहे. शिवाय समृद्धी महामार्गाच्या कामावर लक्ष देण्यासाठी असलेले अधिकारीदेखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महामार्गाच्या कामासाठी नेमलेल्या कंपन्यांमध्ये काम पूर्ण करण्यासाठी स्पर्धाच सुरू असल्याचे समजते. 

पावसामुळे पितळ पडले उघडेसध्या पावसाळा सुरू असून, पावसाचे पाणी समृद्धी महामार्गाच्या रस्त्यावरून वाहत्या रस्त्याखाली उतरत आहे. त्यामुळे कंत्राटदाराने केलेल्या कामाचे पितळ उघडे पडण्यास सुरुवात झाली आहे. कंत्राटदाराने महामार्ग उंच करण्यासाठी वारलेली माती व मुरूम वाहून जात असल्याने कामाची गुणवत्ता लक्षात येत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून महामार्ग खचून जाऊ नये याकरिता रस्त्याच्या खाली दोन्ही बाजंूनी दगडाचे संरक्षक पिचिंग करणे गरजेचे होते.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकार