शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

भरधाव कारने दांपत्याला चिरडले; ३ वर्षीय चिमुकला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 17:43 IST

हा अपघात एवढा भीषण होता की दांपत्य गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच ठार झाले.

ठळक मुद्दे गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास झाला अपघात

औरंगाबाद: नातेवाईकांना भेटून वडगांवकोल्हाटी येथे तीन वर्षीय चिमुकल्यासह जाणाऱ्या दुचाकीस्वार दांपत्याला भरधाव कारने चिरडले. या घटनेत पती पत्नी जागीच ठार झाले तर त्यांचा तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला . हा अपघात ३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता नगरनाका ते छावणी उड्डाणपूलदरम्यान झाला. अमोल रामधन हेरोडे आणि प्रियंका अमोल हेरोडे ( दोघे  रा. वडगांव कोल्हाटी , मूळ रा. खामगांव, जिल्हा बुलढाणा) अशी मयताची नावे आहेत. तर उत्कर्ष (३वर्ष ) असे जखमीचे नाव आहे.

या घटनेविषयी अधिक माहिती अशी की, हेरोडे दांपत्य मूळचे पोरज, ता. खामगाव, बुलढाणा येथील रहिवासी आहेत. वाळूज औद्योगिक वसाहतीमधील खाजगी कंपनीत अमोल नोकरी करीत होते. गुरुवारी अनिल हे पत्नी प्रियंका आणि मुलगा उत्कर्षसह मोटारसायकलवर शहरात राहणाऱ्या मामे सासऱ्याच्या घरी भेटण्यासाठी आले होते. रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हेरोडे दांपत्य आणि उत्कर्षला घेऊन वडगांव कोल्हाटी येथे दुचाकीने जात होते. रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास नगरनाका ते छावणी उड्डाणपूलदरम्यान ते असतांना मागून आलेल्या तवेरा कारने त्यांना जोराची धडक देऊन फरपटत नेले.

हा अपघात एवढा भीषण होता की हेरोडे दांपत्य गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडून जागीच ठार झाले. तर दूर फेकल्या गेलेल्या  उत्कर्षच्या हाताला फ्रक्चर झाले आणि तो गंभीर जखमी झाला. या अपघाताची माहिती मिळताच छावणी पोलिसांनी मयत अमोल आणि प्रियंका आणि जखमीला घाटी रुग्णालयात दाखल केले.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबादDeathमृत्यू