शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा चांगला जावई होऊ शकलो नाही; पत्नीच्या खुनानंतर सिद्धेशचे सासऱ्याला पश्चात्तापाचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 13:36 IST

Kavita trivedi murder case : पिसादेवी येथील रुख्मिणी स्क्वेअर अपार्टमेंटमध्ये १५ फेब्रुवारी राेजी रात्री सिद्धेश त्रिवेदीने पत्नीला डोक्यात डंबेल्सने प्रहार करून मारून टाकले व दोन लहान मुलांना मृत आईजवळ सोडून तो दरवाजाला बाहेरून कुलूप लावून फरार झाला होता.

ठळक मुद्देसावत्र भावाला त्याने पत्र लिहून ‘मी तुमच्यासोबत भावासारखा वागलो नाही’, असे कळविले.त्यानंतर त्याने सासऱ्याकडेही पत्राद्वारेच पश्चात्तापाची भावना व्यक्त केली.

औरंगाबाद : पत्नीचा खून करणाऱ्या सिद्धेश त्रिवेदीला आता पश्चात्ताप होत असून, ही भावना त्याने सासरे जगदीश ईश्वरराव अवस्थी (रा. लोहोणेर, जि. नाशिक) यांना पत्र पाठवून व्यक्त केली. तो म्हणतो, ‘मी आपला चांगला जावई होऊ शकलो नाही. माझ्या अंगात काय संचारले होते, तेच मला कळाले नाही. माझ्याकडून मोठी चूक झाली. मला माफ करा’.

चिकलठाणा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, हवालदार रवींद्र साळवे, दीपक सुराशे व एस. बी. घुगे यांच्या पथकाने सिद्धेशला शनिवारी दिव-दमण या केंद्रशासित प्रदेशातून अटक करून आणले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिसादेवी येथील रुख्मिणी स्क्वेअर अपार्टमेंटमध्ये १५ फेब्रुवारी राेजी रात्री सिद्धेश त्रिवेदीने पत्नीला डोक्यात डंबेल्सने प्रहार करून मारून टाकले व दोन लहान मुलांना मृत आईजवळ सोडून तो दरवाजाला बाहेरून कुलूप लावून फरार झाला होता. जाताना त्याने अपार्टमेंटच्या पार्किंगमधून आपली स्कूटी घेतली व त्यावरून तो थेट पुण्याला गेला. तिथे विमानतळाच्या पार्किंगमध्ये स्कूटी उभी करून विमानाने तो दिल्लीला गेला.

प्लॉट खरेदी करण्यासाठी सिद्धेशने ९५ हजारांत पत्नीचे दागिने मोडले होते. त्यातील काही पैसे त्याने कपाटात ठेवले होते. ते पत्नी कविताच्या हाती लागले; पण कपाटातील दागिने गायब होते. याचा जाब कविताने विचारल्यामुळे दोघांत कडाक्याचे भांडण जुंपले. काही केल्या कविता ऐकत नाही, हे लक्षात येताच त्याने बाजूला पडलेला डंबेल तिच्या डोक्यात मारला. ती निपचित पडताच तो घरातून पळून गेला. आता त्याला केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होत असून, औरंगाबादेत राहणाऱ्या त्याच्या सावत्र भावाला त्याने पत्र लिहून ‘मी तुमच्यासोबत भावासारखा वागलो नाही’, असे कळविले. त्यानंतर त्याने सासऱ्याकडेही पत्राद्वारेच पश्चात्तापाची भावना व्यक्त केली.

महिनाभर कुठे होता सिद्धेशपत्नीचा खून केल्यानंतर तो स्कूटीवरून थेट पुण्याला गेला. तेथून विमानाने तो दिल्लीला गेला. तेथे काही दिवस तो थांबला. मात्र, पोलीस पकडतील म्हणून नंतर सतत तो जागा बदलत राहिला. दिल्लीहून तो बसने मनालीला गेला. तेथून चंदीगड, हरिद्वार, जयपूर, गोरखपूर, वाराणसी, लखनौ येथे गेला. तेथून पुन्हा तो जयपूरला आला. नंतर अहमदाबाद, द्वारकाला जाऊन परत अहमदाबादला आला. तेथून तो दिव-दमन येथे गेला. नंतर तो राजकोट येथे गेला व परत दिव-दमनला आला. या प्रवासात त्याच्याजवळचे सारे पैसे संपून गेले. मग, तेथेच तो समुद्रकिनारी फिरत जे मिळेल ते खाऊन दिवस कंठित होता.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद