शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

तुमचा चांगला जावई होऊ शकलो नाही; पत्नीच्या खुनानंतर सिद्धेशचे सासऱ्याला पश्चात्तापाचे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 13:36 IST

Kavita trivedi murder case : पिसादेवी येथील रुख्मिणी स्क्वेअर अपार्टमेंटमध्ये १५ फेब्रुवारी राेजी रात्री सिद्धेश त्रिवेदीने पत्नीला डोक्यात डंबेल्सने प्रहार करून मारून टाकले व दोन लहान मुलांना मृत आईजवळ सोडून तो दरवाजाला बाहेरून कुलूप लावून फरार झाला होता.

ठळक मुद्देसावत्र भावाला त्याने पत्र लिहून ‘मी तुमच्यासोबत भावासारखा वागलो नाही’, असे कळविले.त्यानंतर त्याने सासऱ्याकडेही पत्राद्वारेच पश्चात्तापाची भावना व्यक्त केली.

औरंगाबाद : पत्नीचा खून करणाऱ्या सिद्धेश त्रिवेदीला आता पश्चात्ताप होत असून, ही भावना त्याने सासरे जगदीश ईश्वरराव अवस्थी (रा. लोहोणेर, जि. नाशिक) यांना पत्र पाठवून व्यक्त केली. तो म्हणतो, ‘मी आपला चांगला जावई होऊ शकलो नाही. माझ्या अंगात काय संचारले होते, तेच मला कळाले नाही. माझ्याकडून मोठी चूक झाली. मला माफ करा’.

चिकलठाणा ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीप ठुबे, हवालदार रवींद्र साळवे, दीपक सुराशे व एस. बी. घुगे यांच्या पथकाने सिद्धेशला शनिवारी दिव-दमण या केंद्रशासित प्रदेशातून अटक करून आणले. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पिसादेवी येथील रुख्मिणी स्क्वेअर अपार्टमेंटमध्ये १५ फेब्रुवारी राेजी रात्री सिद्धेश त्रिवेदीने पत्नीला डोक्यात डंबेल्सने प्रहार करून मारून टाकले व दोन लहान मुलांना मृत आईजवळ सोडून तो दरवाजाला बाहेरून कुलूप लावून फरार झाला होता. जाताना त्याने अपार्टमेंटच्या पार्किंगमधून आपली स्कूटी घेतली व त्यावरून तो थेट पुण्याला गेला. तिथे विमानतळाच्या पार्किंगमध्ये स्कूटी उभी करून विमानाने तो दिल्लीला गेला.

प्लॉट खरेदी करण्यासाठी सिद्धेशने ९५ हजारांत पत्नीचे दागिने मोडले होते. त्यातील काही पैसे त्याने कपाटात ठेवले होते. ते पत्नी कविताच्या हाती लागले; पण कपाटातील दागिने गायब होते. याचा जाब कविताने विचारल्यामुळे दोघांत कडाक्याचे भांडण जुंपले. काही केल्या कविता ऐकत नाही, हे लक्षात येताच त्याने बाजूला पडलेला डंबेल तिच्या डोक्यात मारला. ती निपचित पडताच तो घरातून पळून गेला. आता त्याला केलेल्या कृत्याचा पश्चात्ताप होत असून, औरंगाबादेत राहणाऱ्या त्याच्या सावत्र भावाला त्याने पत्र लिहून ‘मी तुमच्यासोबत भावासारखा वागलो नाही’, असे कळविले. त्यानंतर त्याने सासऱ्याकडेही पत्राद्वारेच पश्चात्तापाची भावना व्यक्त केली.

महिनाभर कुठे होता सिद्धेशपत्नीचा खून केल्यानंतर तो स्कूटीवरून थेट पुण्याला गेला. तेथून विमानाने तो दिल्लीला गेला. तेथे काही दिवस तो थांबला. मात्र, पोलीस पकडतील म्हणून नंतर सतत तो जागा बदलत राहिला. दिल्लीहून तो बसने मनालीला गेला. तेथून चंदीगड, हरिद्वार, जयपूर, गोरखपूर, वाराणसी, लखनौ येथे गेला. तेथून पुन्हा तो जयपूरला आला. नंतर अहमदाबाद, द्वारकाला जाऊन परत अहमदाबादला आला. तेथून तो दिव-दमन येथे गेला. नंतर तो राजकोट येथे गेला व परत दिव-दमनला आला. या प्रवासात त्याच्याजवळचे सारे पैसे संपून गेले. मग, तेथेच तो समुद्रकिनारी फिरत जे मिळेल ते खाऊन दिवस कंठित होता.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद