शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

खाजगी कंपनी नेमूनही कचरा संकलनाचा खर्च जास्तच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 20:17 IST

बिल पाहून मनपा अधिकारीही क्षणभर अवाक् झाले आहेत.

ठळक मुद्दे महानगरपालिकेचा दावा ठरला फोलकंपनीतर्फे शहरात फक्त सहा प्रभागांत काम केले जात आहे.

औरंगाबाद : कचरा संकलनासाठी महापालिकेने नेमलेल्या कंपनीने महापालिकेला सादर केलेले बिल पाहून मनपा अधिकारीही क्षणभर अवाक् झाले आहेत.

मागील काही वर्षांपासून महापालिका प्रशासन कचरा संकलनाचे काम वेगवेगळ्या कंत्राटदारांकडून करून घेत होते. दरवर्षी कचरा संकलन आणि वाहतुकीचा खर्च तब्बल ६० कोटींपर्यंत जात होता. या कामात सुसूत्रता यावी, खर्च कमी व्हावा, या  हेतूने मनपाने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या खाजगी कंपनीची कचरा संकलनासाठी नेमणूक केली आहे. या कंपनीने सादर केलेले तीन महिन्यांतील बिल दीड कोटींपर्यंत पोहोचले आहे. कंपनीच्या कामामुळे मनपाचे १ कोटी २२ लाख रुपये वाचले आहेत.

शहरातील प्रत्येक नागरिकाच्या दारावर जाऊन कचरा संकलन करणे व त्याची कचरा डेपोपर्यंत वाहतूक करण्यासाठी कंपनीची नियुक्ती केली आहे. गेल्या तीन महिन्यांत या कंपनीमुळे १ कोटी २२ लाख रुपये वाचल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. महापौर नंदकुमार घोडेले यांनी मंगळवारी घनकचरा व्यवस्थापनाची आढावा बैठक घेतली. या बैठकीत महापालिकेची बचत झाल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

कंपनीतर्फे शहरात फक्त सहा प्रभागांत काम केले जात आहे. दररोज दोनशे ते अडीचशे टन कचरा कंपनी संकलन करते व तो कचरा प्रक्रिया प्रकल्पापर्यंत नेते. गेल्या तीन महिन्यांत कंपनीचे महापालिकेकडे दीड कोटी रुपयांचे बिल थकीत आहे. हेच काम महापालिकेतर्फे खासगी वाहने लावून केले असते, तर १ कोटी २२ लाख रुपये खर्च येत होता, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे होते. ८० लाख रुपयांचे पेट्रोल - डिझेल, तर ४० लाख रुपये मजुरांवरील खर्चापोटी वाचल्याचे यावेळी सांगण्यात आले. कंपनीमुळे खर्च वाढला, असे एकाही अधिकाऱ्याने सांगितले नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नfundsनिधी