शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

नारेगाव येथील कचरा नष्ट करण्याचा खर्च ५० कोटीवर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 17:42 IST

महापालिकेने ३५ वर्षे नारेगाव येथे कचरा टाकला. या कचऱ्यावर मनपाकडून कोणतीही प्रक्रिया करण्यात आली नाही.

ठळक मुद्देमनपा करणार संशोधन सुसज्ज मैदानाचे स्वप्न

औरंगाबाद : महापालिकेने ३५ वर्षे नारेगाव येथे कचरा टाकला. या कचऱ्यावर मनपाकडून कोणतीही प्रक्रिया करण्यात आली नाही. मागील नऊ महिन्यांपासून नारेगाव येथे कचरा टाकणे बंद आहे. मागील अनेक वर्षांपासून पडून असलेल्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येईल, असे आश्वासन मनपाने खंडपीठाला यापूर्वीच दिले आहे. लाखो मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी मनपाला किमान ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नारेगाव कचरा डेपोच्या जागेवर सुसज्ज मैदान उभारण्याचे स्वप्न मनपा प्रशासनाने बघितले आहे. सध्या पडून असलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया कशी करायची याचा अभ्यास करण्यासाठी खाजगी संस्थेच्या सहकार्याने सर्वेक्षण करण्यात येईल. कचरा नष्ट करण्यासाठी निविदा काढण्याचा विचार मनपा प्रशासनाने सुरू केला आहे. नारेगाव येथे किमान २० ते २५ लाख मेट्रिक टन कचरा असावा, असा अंदाज आहे. यातील ६० टक्के कचऱ्याचे रूपांतर खत आणि मातीत झाले आहे. हा सर्व मिक्स पद्धतीचा कचरा असून, त्यात कॅरिबॅग, लोखंड, काच, ड्रेब्रीज वेस्टही आहे.

अनेक वर्षे हा कचरा असाच पडून राहिला तरी तो नष्ट होणार नाही. या संपूर्ण कचऱ्याचे वर्गीकरण करून प्रक्रिया करणे हा एकमेव पर्याय मनपासमोर आहे. शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून जागेवरच कचरा नष्ट करता येऊ शकतो का, याचीही चाचपणी मनपा प्रशासन करीत आहे. नारेगाव कचरा डेपोप्रश्नी खंडपीठात वेगवेगळ्या याचिका दाखल केलेल्या असताना महापालिका प्रशासनाने एक वर्षात संपूर्ण जुन्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे आश्वासन दिले आहे.

या कचऱ्यावर लवकरच प्रक्रिया करायची असल्यास मनपाकडे आर्थिक तरतूद अजिबात नाही. यापूर्वी राज्याने मनपाला ९० कोटींचा निधी दिला. या निधीतून कचरा प्रक्रिया केंद्र उभारणे आदी कामे सुरू आहेत. जुन्या कचऱ्यासाठी मनपाला परत एकदा राज्य शासनाकडेच निधीची मागणी करावी लागणार आहे. 

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाpollutionप्रदूषण