जलवाहिनीची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू
By Admin | Updated: May 22, 2014 00:17 IST2014-05-22T00:08:07+5:302014-05-22T00:17:06+5:30
जालना : शहराला पाणीपुरवठा करणार्या घाणेवाडी जलाशयाची जलवाहिनी मंगळवारी कन्हैय्यानगरजवळ पुन्हा फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

जलवाहिनीची दुरुस्ती युद्धपातळीवर सुरू
जालना : शहराला पाणीपुरवठा करणार्या घाणेवाडी जलाशयाची जलवाहिनी मंगळवारी कन्हैय्यानगरजवळ पुन्हा फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शहरात नवीन जालना भागास घाणेवाडी जलाशयातून तर जायकवाडी - जालना योजनेद्वारे जुना जालना भागास पाणीपुरवठा केला जात आहे. परंतु, दोन्ही योजनेतील काही अडचणींमुळ ऐन उन्हाळ्यात पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचे प्रकार होत आहेत. मंगळवारी सकाळी घाणेवाडीची जलवाहिनी कन्हैय्यानगर भागाजवळ जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. जालना शहरास पाणीपुरवठा करण्यासाठी घाणेवाडी येथून दोन जलवाहिन्या आहेत. यापैकी एक निजाम कालीन तर ३० वर्षे जुनी आहे. घाणेवाडीतून पाणीपुरवठा सुरु केल्यानंतर दोन पैकी एक जलवाहिनी नादुरुस्त आढळून आली होती. तिची दुरुस्ती अद्याप केलेली नाही. निजाम कालीन जलवाहिनीतून पाणीपुरवठा सुरु होता. मंगळवारी ही जलवाहिनीही नादुरुस्त झाली. तिच्या दुरुस्तीचे काम बुधवारी नगर पालिकेने हाती घेतले. मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्यासह पाणीपुरवठा विभागातील अधिकार्यांनी जलवाहिनीची पाहणी केली. (प्रतिनिधी) बुधवारी पालिकेच्या दुरुस्ती पथकाने घाणेवाडीतून येणारे पाणी थांबवून दुरुस्ती चालू केली. नागरिकांनी जलवाहिनी फोडल्याने तसेच काही पाईप्स जीर्ण झाल्याने जलवाहिनी फुटत आहे. काही दिवसांपूर्वी नगरपालिकेने गळती रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली होती. परंतु सध्या हे पथक कुठे गेले, हे कळेनासे झाले आहे. शहरातील अंतर्गत जलवाहिनींच्या कामांबाबतही पालिकेने लवकरच सुरूवात करावी, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.