शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : लॉकडाऊन वाढवा, पण एवढी एक गोष्ट करा; घरापासून दूर असलेल्या विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 17:42 IST

लॉकडाऊन वाढला तर आई वडिलांना समजावणे कठीण होईल; विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

ठळक मुद्देशिक्षण व स्पर्धा परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी घरापासून दूरलॉकडाऊन मध्ये अडकलेल्या विद्यार्थाची यु ट्यूब वरून विनंती

औरंगाबाद : आम्ही सरकार सोबत आहोत, आम्ही लॉकडाऊनमध्ये अडकलो असून सुरक्षेच्या सर्व नियमांचे पालनही करत आहोत.मात्र, रात्री अचानक आई- वडिलांचा काळजी ने भरलेला फोन येतो तेव्हा जीव कासावीस होतो. आता २१ दिवसांचा लॉकडाऊन वाढला तर त्यांना समजावून सांगणे कठीण जाईल. यामुळे १४ एप्रिलनंतर आम्हाला घरी जाऊ द्या, नाही तर आमचे खूप हाल होतील अशी विनंती पुण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांतर्फे माणिक पाटील याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे.

जगभरात धुमाकूळ घालत असलेले कोरोनाचे संकट देशात धडकले आणि सरकारने सुरक्षेचा उपाय म्हणून देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन केले. यामुळे आपल्या घरापासून दूर राहणारी अनेक विद्यार्थी मिळेल त्या वाहनाने गावाकडे  परतली. मात्र काही बाहेरच्या राज्यात असलेली विद्यार्थी अर्ध्या मार्गातच अडकली. नांदेडचा माणिक गीते हा युवक दिल्ली येथे यूपीएससीची तयारी करत आहे. लॉकडाऊनच्या दरम्यान तोही आपल्या घरी जाण्यासाठी निघाला मात्र पुण्यात आल्यानंतर जिल्हासीमा बंद करण्यात आल्याने तो येथेच अडकला. एका मित्राने त्याला पुण्यात आसरा दिला. तेव्हा पासुन लॉकडाऊनचे २१ दिवस कधी संपतात याची वाट पाहण्यात माणिक आणि त्याचे मित्र दिवस काढत आहेत. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासोबत आहोत मात्र १४ एप्रिल नंतर आम्हाला घरी जाऊद्या अशी विनंती सर्व विद्यार्थ्यांतर्फे माणिक पाटील ने यु ट्यूबवरील एका व्हिडीओच्या माध्यमातून केली आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून अनेक पालक आणि त्यांची घराबाहेर अडकलेली मुले व्हिडीओपाहून भावुक होत आहेत.

बातम्या पाहून आई- वडिलांची चिंता वाढतेदेशात कोरोनाचे हॉटस्पॉट म्हणून पुण्याकडे पाहिले जात आहे. इथे रोज नव्या कोरोना बाधितांची भर पडत आहे अशा बातम्या पाहून आई-वडीलांच्या चिंतेत भर पडत आहे. रात्री अचानक आईचा फोन येतो, तिचे अश्रू थांबत नाहीत. मात्र मी इथेच सुरक्षित आहे असे समजावत फोन कट करतो. अशी परिस्थिती इथे अडकलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची असल्याचे माणिक व्हिडीओमधून सांगतो

जेवणाचे होत आहेत हालविद्यार्थ्यांना नियमित मेसवर सुद्धा पौष्टिक जेवण मिळत नाही. आतातर लॉकडाऊन आहे,यात मिळेल ते अन्न खाऊन आम्ही विद्यार्थी दिवस काढत आहोत. अनेक स्वप्न घेऊन आम्ही गाव सोडला होता मात्र अशा वातावरणात अडकल्याने सर्वांना घराची तीव्र ओढ लागली आहे अशा भावना सुद्धा माणिक व्यक्ती करतो.

लॉकडाऊन वाढला तर...इथे अडकलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना घरून रोज पाच ते सहा वेळेस फोन येतात. अत्यंत व्याकुळ स्वरात बोलणाऱ्या आईला फक्त २१ दिवसांचा प्रश्न आहे,नंतर घरीच येयचे आहे असे सर्वजण समजावून सांगत आहेत. मात्र लॉकडाऊन वाढला तर त्यांना समजावून सांगणे अवघड जाईल. त्यासोबत आमचेही हाल खूप बेकार होतील असेच चित्र आहे. यामुळे १४ एप्रिलनंतर आम्हाला घरी जाऊ द्या अशी विनंती अशाच पद्धतीने अडकलेल्या विद्यार्थ्यांतर्फे माणिकने केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीPuneपुणेNandedनांदेड