शहरं
Join us  
Trending Stories
1
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली!
2
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
3
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
4
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
5
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
6
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
7
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
8
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
9
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
10
Bombay HC: मुंबई उच्च न्यायालय बॉम्बनं उडवून देण्याची धमकी, परिसरात खळबळ!
11
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
12
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
13
भेटण्याची वेळ द्या सर..; प्रियंका गांधींच्या विनंतीला गडकरींचा लगेच होकार, नेमकी काय चर्चा झाली?
14
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
15
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
16
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
17
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
18
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
19
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
20
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : शासकीय रुग्णालयांवर कोट्यवधी खर्च; पण रुग्णांचा ‘खाजगी’कडेच ओढा अधिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 19:56 IST

नागरिकांचा सरकारी आरोग्य यंत्रणेवर विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

ठळक मुद्देसरकारी रुग्णालयातील खाटा रिक्त रुग्णांचा ओढा खाजगीकडे अधिक

औरंगाबाद :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेने कोट्यवधी रुपये खर्च करून उपचारासाठी आवश्यक सुविधा उभारली. याठिकाणी रुग्णांवर उपचारही मोफत होत आहेत. तरीही सरकारी रुग्णालयांतील खाटा रिक्त आणि खाजगी रुग्णालयांच्या खाटा भरलेल्या, अशी परिस्थती आहे. त्यामुळे नागरिकांचा सरकारी आरोग्य यंत्रणेवर विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

औरंगाबादेत गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाचा विळखा पडलेला आहे. सरकारी यंत्रणेबरोबर खाजगी रुग्णालये रुग्णांच्या उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. रोज दोनशे ते तीनशेच्या घरांत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी डेडिकेट कोविड हॉस्पिटल (डीसीएच), डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) आणि कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. खाजगी रुग्णालये आणि खाजगी जागेतही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय असो की चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील युद्धपातळीवर अवघ्या एक महिन्यात उभारण्यात आलेले मेट्रॉन रुग्णालय, अशा सर्वच ठिकाणी उपचाराच्या सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला.

डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी नेमण्यात आले. तरीही या शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्याऐवजी खाजगी रुग्णालयांकडे रुग्णांचा अधिक कल असल्याचे खाटांच्या परिस्थितीवरून पाहायला मिळत आहे. कारण सरकारी रुग्णालयांत खाटा रिकाम्या आणि खाजगी रुग्णालयांतील खाटा रुग्णांनी फुल झालेल्या आहेत. त्यामुळे ही परिस्थती का आहे, रुग्ण शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्याचे का टाळत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांत कोरोनाचे उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह विमा, उपचाराची गुणवत्ता, सोयीसुविधांची परिस्थिती जाणून रुग्ण उपचारासाठी रुग्णालयांची निवड करीत असल्याचे दिसते.  रुग्णांचा खाजगी रुग्णालयांवर अधिक भरवसा असल्याचे चित्र सरकारी रुग्णालयांतील रिक्त खाटांवरून पाहायला मिळत आहे. 

उपचारासाठी दाखल झाल्यानंतर बदलतो निर्णयघाटी रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार केले जातात; परंतु येथे दाखल झाल्यानंतरही अनेक जण खाजगी रुग्णालयांचा रस्ता धरत असल्याची परिस्थती आहे. मनपाकडून रुग्णांची अँटिजन तपासणी केली जाते. यात अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मनपा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करते; परंतु अवघ्या एक ते दोन दिवसांत रुग्ण अन्य ठिकाणी हलविण्याची मागणी करतात, अथवा खाजगी रुग्णालयात जाण्यास प्राधान्य देत असल्याचेही दिसून येत आहे.

कोणालाही माघारी पाठवीत नाहीकोणत्याही रुग्णालयाला घाटीतून माघारी पाठविले जात नाही. काही वेळा व्हेंटिलेटर उपलब्ध नसेल तरच रुग्ण खाजगी रुग्णालयात जाण्यास प्राधान्य देतो.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

सरकारी यंत्रणा सक्षमकोरोनाच्या उपचारासाठी सरकारी यंत्रणा सक्षम आहे. हा आजार सध्या उच्च स्तरातील वर्गात अधिक              आढळत आहे, तसेच आपल्याला कोरोना झाला हे कोणाला समजू नये, ही दोन कारणे खाजगी रुग्णालयात जाण्यामागे असू शकतात.- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

जिल्ह्यातील खाटांची परिस्थितीजिल्ह्यात ८० कोविड केअर सेंटर आहेत. याठिकाणी १ हजार २७६ खाटा आहेत. जिल्ह्यात एकूण २९ डीसीएचसी असून, त्यांची १ हजार ८२९ खाटांची क्षमता आहे, तर ३ डीसीएच आहेत. याठिकाणी ७५६ खाटा आहेत. शासनाने या सगळ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केला.

रुग्णालय    एकूण खाटा    दाखल रुग्ण   रिक्त खाटाघाटी     ४५८          ३४५     ११३जिल्हा रुग्णालय     २००          १८१     १९ईएसआयसी रुग्णालय     ६५          ५५         १०मेट्रॉन      २३५          २३५     ०एमजीएम हॉस्पिटल     २७४          २२१     ५३धूत हॉस्पिटल     ७५          ७३         २बजाज हॉस्पिटल      ३४          २९         ५डॉ. हेडगेवार हॉस्पिटल     ५८          ५८         ०    एशियन हॉस्टिल       ४०          ३७         ३ओरियन सिटी केअर हॉस्पिटल    ३२         ३२         ०वायएसके हॉस्पिटल     ५०          २५          २५अजंता हॉस्पिटल     २५          १३          १२ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद