शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

coronavirus : शासकीय रुग्णालयांवर कोट्यवधी खर्च; पण रुग्णांचा ‘खाजगी’कडेच ओढा अधिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 19:56 IST

नागरिकांचा सरकारी आरोग्य यंत्रणेवर विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

ठळक मुद्देसरकारी रुग्णालयातील खाटा रिक्त रुग्णांचा ओढा खाजगीकडे अधिक

औरंगाबाद :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणेने कोट्यवधी रुपये खर्च करून उपचारासाठी आवश्यक सुविधा उभारली. याठिकाणी रुग्णांवर उपचारही मोफत होत आहेत. तरीही सरकारी रुग्णालयांतील खाटा रिक्त आणि खाजगी रुग्णालयांच्या खाटा भरलेल्या, अशी परिस्थती आहे. त्यामुळे नागरिकांचा सरकारी आरोग्य यंत्रणेवर विश्वास नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

औरंगाबादेत गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाचा विळखा पडलेला आहे. सरकारी यंत्रणेबरोबर खाजगी रुग्णालये रुग्णांच्या उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. रोज दोनशे ते तीनशेच्या घरांत कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. रुग्णांवर उपचार करण्यासाठी डेडिकेट कोविड हॉस्पिटल (डीसीएच), डेडिकेट कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी) आणि कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. खाजगी रुग्णालये आणि खाजगी जागेतही ही सुविधा उपलब्ध करण्यात आली. घाटी रुग्णालय, जिल्हा रुग्णालय असो की चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील युद्धपातळीवर अवघ्या एक महिन्यात उभारण्यात आलेले मेट्रॉन रुग्णालय, अशा सर्वच ठिकाणी उपचाराच्या सुविधांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आला.

डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचारी नेमण्यात आले. तरीही या शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्याऐवजी खाजगी रुग्णालयांकडे रुग्णांचा अधिक कल असल्याचे खाटांच्या परिस्थितीवरून पाहायला मिळत आहे. कारण सरकारी रुग्णालयांत खाटा रिकाम्या आणि खाजगी रुग्णालयांतील खाटा रुग्णांनी फुल झालेल्या आहेत. त्यामुळे ही परिस्थती का आहे, रुग्ण शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्याचे का टाळत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांत कोरोनाचे उपचार मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह विमा, उपचाराची गुणवत्ता, सोयीसुविधांची परिस्थिती जाणून रुग्ण उपचारासाठी रुग्णालयांची निवड करीत असल्याचे दिसते.  रुग्णांचा खाजगी रुग्णालयांवर अधिक भरवसा असल्याचे चित्र सरकारी रुग्णालयांतील रिक्त खाटांवरून पाहायला मिळत आहे. 

उपचारासाठी दाखल झाल्यानंतर बदलतो निर्णयघाटी रुग्णालयात गंभीर रुग्णांवर उपचार केले जातात; परंतु येथे दाखल झाल्यानंतरही अनेक जण खाजगी रुग्णालयांचा रस्ता धरत असल्याची परिस्थती आहे. मनपाकडून रुग्णांची अँटिजन तपासणी केली जाते. यात अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर मनपा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करते; परंतु अवघ्या एक ते दोन दिवसांत रुग्ण अन्य ठिकाणी हलविण्याची मागणी करतात, अथवा खाजगी रुग्णालयात जाण्यास प्राधान्य देत असल्याचेही दिसून येत आहे.

कोणालाही माघारी पाठवीत नाहीकोणत्याही रुग्णालयाला घाटीतून माघारी पाठविले जात नाही. काही वेळा व्हेंटिलेटर उपलब्ध नसेल तरच रुग्ण खाजगी रुग्णालयात जाण्यास प्राधान्य देतो.- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी)

सरकारी यंत्रणा सक्षमकोरोनाच्या उपचारासाठी सरकारी यंत्रणा सक्षम आहे. हा आजार सध्या उच्च स्तरातील वर्गात अधिक              आढळत आहे, तसेच आपल्याला कोरोना झाला हे कोणाला समजू नये, ही दोन कारणे खाजगी रुग्णालयात जाण्यामागे असू शकतात.- डॉ. एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक

जिल्ह्यातील खाटांची परिस्थितीजिल्ह्यात ८० कोविड केअर सेंटर आहेत. याठिकाणी १ हजार २७६ खाटा आहेत. जिल्ह्यात एकूण २९ डीसीएचसी असून, त्यांची १ हजार ८२९ खाटांची क्षमता आहे, तर ३ डीसीएच आहेत. याठिकाणी ७५६ खाटा आहेत. शासनाने या सगळ्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च केला.

रुग्णालय    एकूण खाटा    दाखल रुग्ण   रिक्त खाटाघाटी     ४५८          ३४५     ११३जिल्हा रुग्णालय     २००          १८१     १९ईएसआयसी रुग्णालय     ६५          ५५         १०मेट्रॉन      २३५          २३५     ०एमजीएम हॉस्पिटल     २७४          २२१     ५३धूत हॉस्पिटल     ७५          ७३         २बजाज हॉस्पिटल      ३४          २९         ५डॉ. हेडगेवार हॉस्पिटल     ५८          ५८         ०    एशियन हॉस्टिल       ४०          ३७         ३ओरियन सिटी केअर हॉस्पिटल    ३२         ३२         ०वायएसके हॉस्पिटल     ५०          २५          २५अजंता हॉस्पिटल     २५          १३          १२ 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद