शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Coronavirus : औरंगाबाद जिल्ह्याचा कोरोना मृत्युदर ३.२५ टक्क्यांवर; आरोग्य यंत्रणेचे मृत्यू रोखण्यावर लक्ष केंद्रित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 7:47 PM

जिल्हात १३ मे पासून कोरोनामुळे रोज होणारे मृत्यू काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे.

ठळक मुद्देल्ह्यात आॅक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे. महिनाभरात जिल्ह्याचा मृत्यूदर ४.२५ वरून ३.२५ टक्के

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी-अधिक होत राहणार आहे. त्यामुळे रुग्णसंख्यावाढीच्या प्रश्नाऐवजी रुग्णांचे मृत्यू रोखण्याकडे आरोग्य विभागाने अधिक लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. 

जिल्हात १३ मे पासून कोरोनामुळे रोज होणारे मृत्यू काही केल्या थांबत नसल्याची स्थिती आहे. त्यात एकही दिवस खंड पडलेला नाही. तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठांना कोरोना विषाणूचा धोका अधिक आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या रुग्णांकडे अधिक लक्ष दिले जात आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होतो. त्यामुळे जिल्ह्यात आॅक्सिजन बेडची संख्या वाढविण्यावर भर दिला जात आहे.

जिल्ह्यात रोज रुग्णांची भर पडत आहे. रुग्णसंख्येपेक्षा यातील गंभीर रुग्णांना वेळीच उपचार मिळावेत आणि मृत्यू रोखले जातील, यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. ११ जुलै रोजी जिल्ह्याचा मृत्यूदर ४.२५ टक्के होता. महिनाभरात मृत्यूदर ३.२५ टक्के झाला.घाटी रुग्णालयात कोरोनाचे गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण अधिक आहे. घाटीत मंगळवारी दुपारपर्यंत १४१ गंभीर रुग्ण दाखल होते. रुग्णांसाठी डॉक्टरांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते; परंतु उशिरा दाखल होण्यामुळे उपचाराला प्रतिसाद मिळत नाही आणि  मृत्यू ओढवतो. त्यामुळे वेळीच रुग्णालयात दाखल होणे महत्त्वाचे असल्याचे घाटीतील डॉक्टरांनी सांगितले. 

महिनाभरात २०८ रुग्णांचा मृत्यू ११ जुलै रोजी जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ही ८,२१६ होती, तर एकूण मृत्यूचा आकडा हा ३५० होता. महिनाभरात २०८ रुग्णांचा मृत्यू झाला, तर रुग्णसंख्या दुप्पट झाली. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या मंगळवारी (दि.११) दुपारपर्यंत १७,१२५ झाली, तर एकूण मृतांची संख्या ५५८ झाली.

५० वर्षांवरील रुग्णांकडे अधिक लक्षकोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत राहील; परंतु त्यापेक्षाही रुग्ण गंभीर होऊन मृत्यू ओढवणार नाही यावर अधिक भर दिला जात आहे. त्यासाठी ५० वर्षांवरील रुग्णांकडे अधिक लक्ष दिले जात आहे.- डॉ. उल्हास गंडाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद