शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

कोरोनाच्या बाजार समितीच्या उपाययोजना कागदावरच; जाधववाडी सुरू करण्याबाबतचा निर्णय अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 17:25 IST

Jadhavmandi opening decision pending बाजार समितीने विश्वास दिला पाहिजे की, तेथे गदारोळ होणार नाही, शेतकऱ्यांची काळजी घेतली जाईल, संसर्ग पसरणार नाही.

ठळक मुद्देआवारात टेस्टिंगसाठी मनपा पथक देणार आहे. इतर यंत्रणा उभारणे कृउबाची जबाबदारी आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषि उत्पन्न बाजार समितीने कागदोपत्री उपाययोजना करत असल्याचे दाखविले तर काहीही होणार नाही. कागदोपत्री उपाययोजनांमुळे जाधववाडी सुरू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी सांगितले.महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता आणि जिल्हाधिकाऱ्यांची शुक्रवारी जाधववाडी भाजी मंडई सुरू करण्याबाबत बैठक होणार होती. कृउबाच्या पदाधिकारी, प्रशासनाला बैठकीला बोलावले होते; पण बाजार समितीने निर्णय क्षमता असलेले कर्मचारी बैठकीला पाठविले नाही. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीत मंडई सुरू करण्याचा निर्णय अधांतरी राहिला.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, कृउबा समितीचे सभापती पठाडे हे बैठकीला आले नाहीत. बाजार समितीने विश्वास दिला पाहिजे की, तेथे गदारोळ होणार नाही, शेतकऱ्यांची काळजी घेतली जाईल, संसर्ग पसरणार नाही. ते काही करत नसतील आणि कागदोपत्री सर्व उपाययोजना दाखवत असतील तर काहीही निर्णय होणार नाही. मार्किंग कसे केले आहे, तेथे भाजी विक्रेते शेतकरी कसे बसणार आहेत, याबाबत जाधववाडीत त्यांनी काय उपाय केले याचे चित्रीकरण करण्यात येईल. त्यांनी नियोजन कागदावर केलेले आहे. त्या आवारात टेस्टिंगसाठी मनपा पथक देणार आहे. सुरक्षा रक्षक आणि इतर यंत्रणा उभारणे कृउबाची जबाबदारी आहे.

सात सुरक्षा रक्षकांवर १६० दुकानांची जबाबदारीजाधववाडीतील दुकान नं.१ ते १६० पर्यंत चार सुरक्षा रक्षकांवर तर हातगाडी, किरकोळ व्यापाऱ्यांवर नियंत्रणासाठी ३ सुरक्षा रक्षकांवर जबाबदारी असल्याचे कार्यालयीन आदेश समितीने काढले आहेत. सोशल डिस्टन्सिंगनुसार फळे व भाजी विक्रीसाठी बसण्यासाठी हे सुरक्षा रक्षक काम करतील. असे त्या आदेशात म्हटले आहे. सात सुरक्षा रक्षक गर्दीवर कसे नियंत्रण ठेवणार असा प्रश्न आहे.

सर्व बाबींचे चित्रीकरणासह माहिती घेणारबाजार समितीने सूचनांचे पत्रक काढले असून त्यामध्ये सोशल डिस्टन्स पाळणे, प्रत्येकाने मास्क लावणे, मुख्य प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर हाताला लावणे, हात धुण्यासाठी बाजार समिती आवारात व्यवस्था केलेली आहे, तेथे प्रत्येकाने हात धुवावेत. रेखांकन केलेल्या जागेवरच शेतमाल खरेदी-विक्री करावा. मनपाने मुख्य बाजार आवारात लावलेल्या कॅम्पमधये अ‍ॅण्टीजेन आणि आरटीपीसीआरची टेस्ट करणे प्रत्येकास बंधनकारक असेल. बाजार आवारात रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शेतमाल खरेदी-विक्री होऊ नये. किरकोळ शेतमाल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बाजार आवारात बंदी असून त्यांनी आपापल्या भागात हातगाडी किंवा नजीकच्या भाजीमंडईत शेतमाल खरेदी करावा. या सूचना बाजार समितीने केल्या असून त्याची शहानिशा जिल्हा प्रशासन चित्रीकरणासह करणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद