शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

कोरोनाच्या बाजार समितीच्या उपाययोजना कागदावरच; जाधववाडी सुरू करण्याबाबतचा निर्णय अधांतरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 17:25 IST

Jadhavmandi opening decision pending बाजार समितीने विश्वास दिला पाहिजे की, तेथे गदारोळ होणार नाही, शेतकऱ्यांची काळजी घेतली जाईल, संसर्ग पसरणार नाही.

ठळक मुद्देआवारात टेस्टिंगसाठी मनपा पथक देणार आहे. इतर यंत्रणा उभारणे कृउबाची जबाबदारी आहे.

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कृषि उत्पन्न बाजार समितीने कागदोपत्री उपाययोजना करत असल्याचे दाखविले तर काहीही होणार नाही. कागदोपत्री उपाययोजनांमुळे जाधववाडी सुरू करण्याचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी सांगितले.महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता आणि जिल्हाधिकाऱ्यांची शुक्रवारी जाधववाडी भाजी मंडई सुरू करण्याबाबत बैठक होणार होती. कृउबाच्या पदाधिकारी, प्रशासनाला बैठकीला बोलावले होते; पण बाजार समितीने निर्णय क्षमता असलेले कर्मचारी बैठकीला पाठविले नाही. त्यामुळे शुक्रवारच्या बैठकीत मंडई सुरू करण्याचा निर्णय अधांतरी राहिला.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले, कृउबा समितीचे सभापती पठाडे हे बैठकीला आले नाहीत. बाजार समितीने विश्वास दिला पाहिजे की, तेथे गदारोळ होणार नाही, शेतकऱ्यांची काळजी घेतली जाईल, संसर्ग पसरणार नाही. ते काही करत नसतील आणि कागदोपत्री सर्व उपाययोजना दाखवत असतील तर काहीही निर्णय होणार नाही. मार्किंग कसे केले आहे, तेथे भाजी विक्रेते शेतकरी कसे बसणार आहेत, याबाबत जाधववाडीत त्यांनी काय उपाय केले याचे चित्रीकरण करण्यात येईल. त्यांनी नियोजन कागदावर केलेले आहे. त्या आवारात टेस्टिंगसाठी मनपा पथक देणार आहे. सुरक्षा रक्षक आणि इतर यंत्रणा उभारणे कृउबाची जबाबदारी आहे.

सात सुरक्षा रक्षकांवर १६० दुकानांची जबाबदारीजाधववाडीतील दुकान नं.१ ते १६० पर्यंत चार सुरक्षा रक्षकांवर तर हातगाडी, किरकोळ व्यापाऱ्यांवर नियंत्रणासाठी ३ सुरक्षा रक्षकांवर जबाबदारी असल्याचे कार्यालयीन आदेश समितीने काढले आहेत. सोशल डिस्टन्सिंगनुसार फळे व भाजी विक्रीसाठी बसण्यासाठी हे सुरक्षा रक्षक काम करतील. असे त्या आदेशात म्हटले आहे. सात सुरक्षा रक्षक गर्दीवर कसे नियंत्रण ठेवणार असा प्रश्न आहे.

सर्व बाबींचे चित्रीकरणासह माहिती घेणारबाजार समितीने सूचनांचे पत्रक काढले असून त्यामध्ये सोशल डिस्टन्स पाळणे, प्रत्येकाने मास्क लावणे, मुख्य प्रवेशद्वारावरच सॅनिटायझर हाताला लावणे, हात धुण्यासाठी बाजार समिती आवारात व्यवस्था केलेली आहे, तेथे प्रत्येकाने हात धुवावेत. रेखांकन केलेल्या जागेवरच शेतमाल खरेदी-विक्री करावा. मनपाने मुख्य बाजार आवारात लावलेल्या कॅम्पमधये अ‍ॅण्टीजेन आणि आरटीपीसीआरची टेस्ट करणे प्रत्येकास बंधनकारक असेल. बाजार आवारात रात्री ८ ते पहाटे ५ वाजेपर्यंत शेतमाल खरेदी-विक्री होऊ नये. किरकोळ शेतमाल खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बाजार आवारात बंदी असून त्यांनी आपापल्या भागात हातगाडी किंवा नजीकच्या भाजीमंडईत शेतमाल खरेदी करावा. या सूचना बाजार समितीने केल्या असून त्याची शहानिशा जिल्हा प्रशासन चित्रीकरणासह करणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद