शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

corona virus : अफवा आणि सत्य; जाणून घ्या सर्वसामान्यांच्या मनातील ७ शंकांची डॉक्टरांनी दिलेली उत्तरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 11:51 AM

सर्वसामान्यांमध्ये अनेक शंका, भीतीयुक्त प्रश्न निर्माण होत आहेत.

ठळक मुद्देकाही प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांनी दिलीउष्णता वाढल्यास कोरोना विषाणूचा प्रसार रोखला जाईल?

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये अनेक शंका, भीतीयुक्त प्रश्न निर्माण होत आहेत. यातील काही प्रश्नांची उत्तरे तज्ज्ञांकडून जाणून घेण्यात आली.

प्रश्न क्रमांक -१ : जलतरण तलावात पोहताना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो का?उत्तर : जलतरण तलावात पोहताना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाही. कारण जलतरण तलावातील पाण्याचे क्लोरिनेशन केलेले असते. तलावाचे व्यवस्थापन होत असेल तर संसर्ग टळू शकतो. अन्यथा संसर्गाचा धोका नाकारता येणार नाही. त्याशिवाय तलावाबाहेर बाधित व्यक्तीमुळे संसर्ग होऊ शकतो. -डॉ. अजित दामले, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, आयआयएमएसआर (जि. जालना)

प्रश्न क्रमांक-२ : फ्लू आणि कोरोना विषाणूच्या लक्षणात काय फरक आहे?उत्तर : फ्लूमध्ये सर्दी, खोकला, ताप असतो. परंतु ३ ते ५ दिवसांत हा फ्लू बरा होतो. याउलट कोरोना विषाणूच्या लक्षणात कोरडा खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास ही प्रमुख लक्षणे आहेत. यात रुग्णाचे नाक गळत नाही. जे बाधित देशातून आलेले आहेत आणि अशी काही लक्षणे असतील, तर काळजी घेण्याची गरज आहे. - डॉ. आनंद निकाळजे, फिजिशियन

प्रश्न क्रमांक -३ : उष्णता वाढल्यास कोरोना विषाणूचा प्रसार रोखला जाईल?उत्तर :  इन्फ्यूईजा, आडिनो व्हायरस यासारख्या वर्गातील विषाणूचा प्रादुर्भाव प्रामुख्याने हिवाळ्यात अधिक दिसून येतो. कोरोना विषाणू हा याच वर्गातील नवीन विषाणू आहे. त्यामुळे त्याचा प्रादुर्भाव उष्णता वाढल्यानंतर म्हणजे उन्हाळ्यात कमी होण्याची शक्यता आहे. परंतु नेमके काय होते, हे आगामी काही दिवसांत दिसून येईल. - डॉ. जयंत तुपकरी, बालरोगतज्ज्ञ

प्रश्न क्रमांक -४ : मास्क घातल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार थांबतो का, कोणत्या प्रकारचा मास्क वापरला पाहिजे?उत्तर : सर्वसामान्यांनी मास्क घालण्याची गरज नाही. कोरोना बाधित, संशयित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी मास्क वापरला पाहिजे. सर्वसामान्य व्यक्तींनी शिंकताना, खोकलताना तोंडातील तुषार उडणार नाहीत, यासाठी रुमाल वापरला पाहिजे. हाताच्या कोपऱ्याचाही अशा वेळी वापर करता येतो. मास्क म्हणून चेहऱ्यावर रुमालही बांधता येईल. - डॉ. दत्ता कदम, बालरोगतज्ज्ञ

प्रश्न क्रमांक -५ : कोरोना विषाणूवर लस विकसित होईल का?उत्तर : कोरोना विषाणूवर लस विकसित करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही लस विकसित होईल. मात्र, त्यासाठी २ ते ३ महिने लागू शकतात. हा विषाणू नवीन आहे. त्यामुळे त्याच्या संसर्गाची शक्यता अधिक आहे. परंतु नागरिकांनी घाबरून जाता कामा नये. - डॉ. संजय पाटणे, अध्यक्ष, औरंगाबाद फिजिशियन असोसिएशन

प्रश्न क्रमांक - ६ : एखाद्याला कोरोनाचा संसर्ग झाला, तर त्याने थेट रुग्णालयात संपर्क साधावा का?उत्तर : कोरोनासारखी काही लक्षणे वाटत असतील तर संबंधिताने घरी बसून राहता कामा नये. जवळच्या जनरल प्रॅक्टिसनर्सकडे जाता येते. तेथे काही लक्षणांवरून जोखीम वाटली तर संबंधित रुग्णाला मोठ्या संस्थेत रेफर करता येते. जोपर्यंत निदान होणार नाही, तोपर्यंत धोक्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेऊन रुग्णालयात गेले पाहिजे.- डॉ. प्रशांत देशमुख,जनरल प्रॅक्टिशनर

प्रश्न क्रमांक - ७ : कोरोना विषाणूवर काही घरगुती औषधोपचार उपलब्ध आहे का?उत्तर : कोरोना विषाणूवर काहीही घरगुती उपचार उपलब्ध नाही. सामाजिक माध्यमांवर जे संदेश फिरत आहेत, ते चुकीचे आहेत. त्यावर विश्वास ठेवता कामा नये. कोरोनाच्या रुग्णाला आयसोलेशन करावे लागते. तसेच प्रतिजैविके, तापेची औषधी दिली जातात. - डॉ. सत्यनारायण सोमाणी, अध्यक्ष, आयएमए.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर