शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

Corona Virus : केंद्र सरकारपासून लपले औरंगाबादेतील ५७० कोरोना रुग्णांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 11:34 AM

Corona Virus:आरोग्य उपसंचालक कार्यालयातील वाॅररूममध्ये पोर्टलवर नोंदणी करण्याचे काम केले जात आहे.

ठळक मुद्देअँटिजन टेस्ट आणि रुग्णांना रेफर करण्याच्या गोंधळात रुग्णांची नोंदच होईना

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : औरंगाबादेतील तब्बल ५७० मृत्यूपासून केंद्र सरकार अनभिज्ञ असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण कोरोनासंदर्भातील पोर्टलवर औरंगाबादेत २ हजार ३५२ मृत्यूची नोंद आहे. प्रत्यक्षात रविवारपर्यंत औरंगाबादेत २ हजार ९२२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. अँटिजन टेस्ट आणि रुग्णांना रेफर करण्याच्या गोंधळात रुग्णांची नोंदच होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, औरंगाबादेतील मृत्यूची गंभीर स्थिती केंद्रापासून लपून रहात असून, त्यातून उपाययोजनांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

आरोग्यासंदर्भातील स्थानिक स्तरावरील माहिती जिल्हा स्तरावरून आरोग्य उपसंचालक कार्यालय, तेथून पुढे राज्य शासनाला माहिती जाते. तर राज्याकडून केंद्राकडे माहिती जाते. कोरोनासंदर्भातील रुग्णसंख्या, मृत्यूची स्थिती स्थानिक पातळीवरून थेट केंद्राला लक्षात यावी, यासाठी पोर्टलवर नोंद करणे गरजेचे ठरते. त्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, महापालिका, घाटी यांना कोरोना रुग्णांची, मृत्यूची नोंद करण्यासाठी पोर्टलचा लाॅगइन आयडी आणि पासवर्ड देण्यात आलेला आहे. परंतु अनेकांकडून ही माहिती भरण्यास अनेक कारणांनी विलंब होत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर कागदोपत्री (मॅन्युअली) कोरोना मृत्यूचे आकडे वेगळे आहेत, तर पोर्टलवरील आकडे वेगळे आहेत. यात तब्बल ५७० रुग्णांच्या मृत्यूचा फरक पडत आहे. स्थानिक पातळीवर जरी ही नोंद असली तर पोर्टलवर नोंदीअभावी केंद्राला त्यासंदर्भात माहिती मिळत नसल्याची स्थिती आहे. परिणामी, औरंगाबादेत मृत्यू कमी असल्याचे कारण पुढे होऊन कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांकडे केंद्राकडून दुर्लक्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाॅररूममध्ये नोंदणीवर भरआरोग्य उपसंचालक कार्यालयातील वाॅररूममध्ये पोर्टलवर नोंदणी करण्याचे काम केले जात आहे. महापालिकेचेही स्वतंत्र वाॅररूम आहे. पाेर्टल म्हणजे एकत्रित रिपोर्टिंग प्रणाली आहे. नोंद झालेल्या रुग्णांच्या मृत्यूची नोंदणी करण्यावर भर दिला जात असल्याचे आरोग्य उपसंचालक स्वप्नील लाळे म्हणाले.

नोंद करण्याची सक्त सूचनाप्रत्येक आरोग्य संस्थेला पोर्टलवर नोंदणी करण्याची सक्त सूचना केली आहे. जिथे रुग्णाचा मृत्यू झाला तेथूनच नोंद होणे गरजेचा आहे. मॅन्युअली आणि पोर्टलवरील संख्येत फरक आहे. परंतु मंत्रालयाला रोज रिपाेर्ट दिला जातो. पोर्टलवरील नोंदी केंद्राला दिसतात.- डाॅ. जी. एम. कुडलिकर, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद