शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

Corona Vaccine : डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; या गतीने लसीकरणासाठी लागणार दोन वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 19:10 IST

औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३२ लाख ८७ हजार आहे. वास्तविक पाहता ही लोकसंख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक आहे.

ठळक मुद्देलसीकरणाची संथगती अत्यल्प प्रमाणात लस उपलब्ध

- मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तरी जीवितहानी टाळण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. डिसेंबर २०२१पर्यंत देशात लसीकरण पूर्ण होणार, असा दावा केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. मात्र लसीकरणाची सध्याची संथगती पाहता ते अवघड असून, या गतीने संपूर्ण लसीकरणासाठी आणखी दोन वर्षे तरी लागणार हे निश्चित. औरंगाबाद जिल्ह्यात १६ जानेवारीला लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. मागील पाच महिन्यांमध्ये जिल्ह्यातील पाच लाख ६४ हजार डोस देण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३२ लाख ८७ हजार आहे. वास्तविक पाहता ही लोकसंख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार नागरिकांना पहिला डोस दिला आहे. एक लाख २७ हजार नागरिकांना दुसरा डोस मिळाला. पहिल्या डोसची टक्केवारी १३.२८, तर दुसऱ्या डोसची टक्केवारी ३.८९ आहे. लसीकरणाची गती अशीच राहिल्यास जिल्ह्यात १०० टक्के लसीकरणासाठी किमान दोन वर्षे लागतील. शहर आणि ग्रामीण भागातील काही लसीकरण केंद्रांवर आजही लांबलचक रांगा लागत आहेत. मात्र केंद्र शासनाकडून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात येत नाही.

२६ मेपर्यंत झालेले लसीकरणहेल्थलाइन वर्कर - ३९,५६४ (पहिला डोस), २१,३५२ (दुसरा डोस)फ्रंटलाइन वर्कर - ६३,००६३ (पहिला डोस), २३,५६५ (दुसरा डोस)१८ ते ४४ - १०, ८३५ (पहिला डोस)४५‌‌ ‌‌‌‌वर्षांपुढील ‌‌‌‌‌‌- १,८०, ३४७ (पहिला डोस), ४१,१८६

(दुसरा डोस)ग्रामीण भागात पहिल्या डोसची टक्केवारी - १०.३६, दुसरा डोस - २.३२शहरात पहिल्या डोसची टक्केवारी - १८.५२, दुसरा डोस-६.७०जिल्ह्यात एकूण पहिल्या डोसची टक्केवारी-१३.२८, दुसरा डोस-३.८९

१८ पेक्षा कमी आणि जास्त वयाचे काय?१८ पेक्षा कमी वयोगटासाठी लस देण्यासंदर्भात कोणतीही हालचाल शासनाकडून नाही. मात्र १८ ते ४४ वयोगटासाठी १ मेपासून लसीकरण मोहीम सुरू केली होती. अवघ्या दहा दिवसांमध्ये लसीकरण मोहीम बंद करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात या वयोगटातील नागरिकांची लोकसंख्या सुमारे १२ लाख आहे. विशेष बाब म्हणजे शहरातील चार खासगी रुग्णालयांमध्ये या वयोगटातील नागरिकांना ९०० रुपये शुल्क आकारून लस देण्यात येत आहे. लस कंपन्यांनी खासगी रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात डोस उपलब्ध करून दिले आहेत.

औरंगाबाद शहरात जम्बो लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यासाठी ११५ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. ग्रामीण भागात तालुकानिहाय लसीकरण केंद्र सुरू केले. शासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात लस डोस येत असल्याने शहरातील लसीकरण केंद्राची संख्या आता ६९पर्यंत खाली आली आहे. ग्रामीण भागातील लस केंद्रांची संख्या कमी झाली.

मागील एक महिन्यापासून शासनाकडून वेळोवेळी अल्प प्रमाणात का होईना लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेत कोणताही खंड नाही. जास्त प्रमाणात लस डोस उपलब्ध झाल्यास पुन्हा शहरात जम्बो लसीकरण मोहीम राबविता येईल. शहरात दररोज २० हजार नागरिकांना लस डोस देता येईल, अशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबाद