शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

Corona Vaccine : डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; या गतीने लसीकरणासाठी लागणार दोन वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 19:10 IST

औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३२ लाख ८७ हजार आहे. वास्तविक पाहता ही लोकसंख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक आहे.

ठळक मुद्देलसीकरणाची संथगती अत्यल्प प्रमाणात लस उपलब्ध

- मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तरी जीवितहानी टाळण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. डिसेंबर २०२१पर्यंत देशात लसीकरण पूर्ण होणार, असा दावा केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. मात्र लसीकरणाची सध्याची संथगती पाहता ते अवघड असून, या गतीने संपूर्ण लसीकरणासाठी आणखी दोन वर्षे तरी लागणार हे निश्चित. औरंगाबाद जिल्ह्यात १६ जानेवारीला लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. मागील पाच महिन्यांमध्ये जिल्ह्यातील पाच लाख ६४ हजार डोस देण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३२ लाख ८७ हजार आहे. वास्तविक पाहता ही लोकसंख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार नागरिकांना पहिला डोस दिला आहे. एक लाख २७ हजार नागरिकांना दुसरा डोस मिळाला. पहिल्या डोसची टक्केवारी १३.२८, तर दुसऱ्या डोसची टक्केवारी ३.८९ आहे. लसीकरणाची गती अशीच राहिल्यास जिल्ह्यात १०० टक्के लसीकरणासाठी किमान दोन वर्षे लागतील. शहर आणि ग्रामीण भागातील काही लसीकरण केंद्रांवर आजही लांबलचक रांगा लागत आहेत. मात्र केंद्र शासनाकडून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात येत नाही.

२६ मेपर्यंत झालेले लसीकरणहेल्थलाइन वर्कर - ३९,५६४ (पहिला डोस), २१,३५२ (दुसरा डोस)फ्रंटलाइन वर्कर - ६३,००६३ (पहिला डोस), २३,५६५ (दुसरा डोस)१८ ते ४४ - १०, ८३५ (पहिला डोस)४५‌‌ ‌‌‌‌वर्षांपुढील ‌‌‌‌‌‌- १,८०, ३४७ (पहिला डोस), ४१,१८६

(दुसरा डोस)ग्रामीण भागात पहिल्या डोसची टक्केवारी - १०.३६, दुसरा डोस - २.३२शहरात पहिल्या डोसची टक्केवारी - १८.५२, दुसरा डोस-६.७०जिल्ह्यात एकूण पहिल्या डोसची टक्केवारी-१३.२८, दुसरा डोस-३.८९

१८ पेक्षा कमी आणि जास्त वयाचे काय?१८ पेक्षा कमी वयोगटासाठी लस देण्यासंदर्भात कोणतीही हालचाल शासनाकडून नाही. मात्र १८ ते ४४ वयोगटासाठी १ मेपासून लसीकरण मोहीम सुरू केली होती. अवघ्या दहा दिवसांमध्ये लसीकरण मोहीम बंद करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात या वयोगटातील नागरिकांची लोकसंख्या सुमारे १२ लाख आहे. विशेष बाब म्हणजे शहरातील चार खासगी रुग्णालयांमध्ये या वयोगटातील नागरिकांना ९०० रुपये शुल्क आकारून लस देण्यात येत आहे. लस कंपन्यांनी खासगी रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात डोस उपलब्ध करून दिले आहेत.

औरंगाबाद शहरात जम्बो लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यासाठी ११५ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. ग्रामीण भागात तालुकानिहाय लसीकरण केंद्र सुरू केले. शासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात लस डोस येत असल्याने शहरातील लसीकरण केंद्राची संख्या आता ६९पर्यंत खाली आली आहे. ग्रामीण भागातील लस केंद्रांची संख्या कमी झाली.

मागील एक महिन्यापासून शासनाकडून वेळोवेळी अल्प प्रमाणात का होईना लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेत कोणताही खंड नाही. जास्त प्रमाणात लस डोस उपलब्ध झाल्यास पुन्हा शहरात जम्बो लसीकरण मोहीम राबविता येईल. शहरात दररोज २० हजार नागरिकांना लस डोस देता येईल, अशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबाद