शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

Corona Vaccine : डिसेंबरपर्यंत संपूर्ण लसीकरण अवघडच; या गतीने लसीकरणासाठी लागणार दोन वर्षे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 19:10 IST

औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३२ लाख ८७ हजार आहे. वास्तविक पाहता ही लोकसंख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक आहे.

ठळक मुद्देलसीकरणाची संथगती अत्यल्प प्रमाणात लस उपलब्ध

- मुजीब देवणीकर औरंगाबाद : कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तरी जीवितहानी टाळण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. डिसेंबर २०२१पर्यंत देशात लसीकरण पूर्ण होणार, असा दावा केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. मात्र लसीकरणाची सध्याची संथगती पाहता ते अवघड असून, या गतीने संपूर्ण लसीकरणासाठी आणखी दोन वर्षे तरी लागणार हे निश्चित. औरंगाबाद जिल्ह्यात १६ जानेवारीला लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. मागील पाच महिन्यांमध्ये जिल्ह्यातील पाच लाख ६४ हजार डोस देण्यात आले.

औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३२ लाख ८७ हजार आहे. वास्तविक पाहता ही लोकसंख्या आता ३८ लाखांपेक्षा अधिक आहे. जिल्ह्यात ४ लाख ३६ हजार नागरिकांना पहिला डोस दिला आहे. एक लाख २७ हजार नागरिकांना दुसरा डोस मिळाला. पहिल्या डोसची टक्केवारी १३.२८, तर दुसऱ्या डोसची टक्केवारी ३.८९ आहे. लसीकरणाची गती अशीच राहिल्यास जिल्ह्यात १०० टक्के लसीकरणासाठी किमान दोन वर्षे लागतील. शहर आणि ग्रामीण भागातील काही लसीकरण केंद्रांवर आजही लांबलचक रांगा लागत आहेत. मात्र केंद्र शासनाकडून मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात येत नाही.

२६ मेपर्यंत झालेले लसीकरणहेल्थलाइन वर्कर - ३९,५६४ (पहिला डोस), २१,३५२ (दुसरा डोस)फ्रंटलाइन वर्कर - ६३,००६३ (पहिला डोस), २३,५६५ (दुसरा डोस)१८ ते ४४ - १०, ८३५ (पहिला डोस)४५‌‌ ‌‌‌‌वर्षांपुढील ‌‌‌‌‌‌- १,८०, ३४७ (पहिला डोस), ४१,१८६

(दुसरा डोस)ग्रामीण भागात पहिल्या डोसची टक्केवारी - १०.३६, दुसरा डोस - २.३२शहरात पहिल्या डोसची टक्केवारी - १८.५२, दुसरा डोस-६.७०जिल्ह्यात एकूण पहिल्या डोसची टक्केवारी-१३.२८, दुसरा डोस-३.८९

१८ पेक्षा कमी आणि जास्त वयाचे काय?१८ पेक्षा कमी वयोगटासाठी लस देण्यासंदर्भात कोणतीही हालचाल शासनाकडून नाही. मात्र १८ ते ४४ वयोगटासाठी १ मेपासून लसीकरण मोहीम सुरू केली होती. अवघ्या दहा दिवसांमध्ये लसीकरण मोहीम बंद करण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात या वयोगटातील नागरिकांची लोकसंख्या सुमारे १२ लाख आहे. विशेष बाब म्हणजे शहरातील चार खासगी रुग्णालयांमध्ये या वयोगटातील नागरिकांना ९०० रुपये शुल्क आकारून लस देण्यात येत आहे. लस कंपन्यांनी खासगी रुग्णालयांना मोठ्या प्रमाणात डोस उपलब्ध करून दिले आहेत.

औरंगाबाद शहरात जम्बो लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यासाठी ११५ लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. ग्रामीण भागात तालुकानिहाय लसीकरण केंद्र सुरू केले. शासनाकडून अत्यंत कमी प्रमाणात लस डोस येत असल्याने शहरातील लसीकरण केंद्राची संख्या आता ६९पर्यंत खाली आली आहे. ग्रामीण भागातील लस केंद्रांची संख्या कमी झाली.

मागील एक महिन्यापासून शासनाकडून वेळोवेळी अल्प प्रमाणात का होईना लस उपलब्ध होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेत कोणताही खंड नाही. जास्त प्रमाणात लस डोस उपलब्ध झाल्यास पुन्हा शहरात जम्बो लसीकरण मोहीम राबविता येईल. शहरात दररोज २० हजार नागरिकांना लस डोस देता येईल, अशी यंत्रणा तयार करण्यात आली आहे.- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAurangabadऔरंगाबाद