शहरात कोरोना हरतोय; अवघे ८ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:04 IST2021-06-24T04:04:21+5:302021-06-24T04:04:21+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात केवळ ५९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरात ८, तर ग्रामीण भागातील ५१ ...

शहरात कोरोना हरतोय; अवघे ८ नवे रुग्ण
औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात केवळ ५९ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरात ८, तर ग्रामीण भागातील ५१ रुग्णांचा समावेश आहे. शहरात रोज सुमारे दीड हजार अँटीजन, आरटीपीसीआर तपासण्या होतात. त्यात केवळ ८ रुग्णच आढळून आल्याने शहरात कोरोना हरत चालल्याचे चित्र आहे.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यातील ५ रुग्णांचा मृत्यू झाला. तर अन्य जिल्ह्यांतील दोघांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ८९२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४५ हजार ६६६ एवढी झाली आहे. आतापर्यंत एक लाख ४१ हजार ३७० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत ३,४०४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मनपा हद्दीतील १४ आणि ग्रामीण भागातील ८९, अशा १०३ रुग्णांना सुटी देण्यात आली.
उपचार सुरू असताना बाबरा, फुलंब्री येथील ४० वर्षीय पुरुष, सोनारी, फुलंब्री येथील ७० वर्षीय पुरुष, राहतगाव, पैठण येथील ६९ वर्षीय पुरुष , वेदांतनगर येथील ५४ वर्षीय पुरुष, चापानेर, कन्नड येथील ६० वर्षीय पुरुष आणि अहमदनगर जिल्ह्यातील ७१ वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ७० वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला
मनपा हद्दीतील रुग्ण
घाटी परिसर २, शहानूरवाडी १, शिवाजीनगर १, बीड बायपास १, शहाबाजार १, सातारा परिसर १, धावणी मोहल्ला १
ग्रामीण भागातील रुग्ण
पोरगाव ता.पैठण १, मुंडवाडी ता. कन्नड २, ताजनापूर, ता. खुल्ताबाद १, अन्य ४७