शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे ‘समृद्धी’चे परप्रांतीय मजूर धास्तावले; कामाचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:06 IST

Samruddhi Mahamarg's work slowed due to corona औरंगाबादसह राज्यातील अनेक महानगरे व जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्याचा मोठा परिणाम समृद्धी महामार्गाच्या कामावर झाला आहे.

ठळक मुद्दे मजूर परतीच्या तयारीत आहेत एका बाजूचे काम पूर्ण करण्यावर भर

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समृद्धी महामार्गाच्या कामावर परिणाम झाला असून, पूर्वीसारखा दीर्घ स्वरूपाचे लॉकडाऊन लागले, तर अडकून पडावे लागेल, या भीतीपोटी अनेक परप्रांतीय मजूर गावाकडे परतण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, कामासाठी लागणारे अनेक साहित्य बाहेरून आणण्यासाठीदेखील मोठ्या अडचणी येत आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. औरंगाबादसह राज्यातील अनेक महानगरे व जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्याचा मोठा परिणाम समृद्धी महामार्गाच्या कामावर झाला आहे. दरम्यान, कामासाठी आलेले परप्रांतीय मजूरही मोठ्या प्रमाणात धास्तावले आहेत. पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये अचानक राज्याच्या सीमा बंद केल्या. वाहनेही बंद करण्यात आली. त्यामुळे हजारो परप्रांतीय मजूर पायी चालत त्यांच्या मूळ गावी परतले होते. यावेळीही दीर्घ स्वरूपाचे लॉकडाऊन जाहीर झाले, तर इथे अडकून पडण्यापेक्षा गावी गेलेले बरे, या मानसिकतेतून अनेक जण परतण्याच्या तयारीत आहेत. महामार्गाच्या कामासाठी लागणारी यंत्रे, लोखंड किंवा अन्य साहित्य आणण्यासाठीही अडचणी येत आहेत. त्यामुळे १५ ते २० दिवसांपासून कामाची गती मंदावली आहे. मात्र, १ मेपासून शिर्डीपर्यंत या महामार्गावरून वाहतूक सुरू करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यानुसार सध्या ६ पैकी एका बाजूच्या ३ लेनचे काम पूर्ण करण्यावर ‘एमएसआरडीसी’ने भर दिला आहे. डिसेंबरअखेरपर्यंत दोन्ही बाजूच्या सर्व लेनचे काम पूर्ण होईल, असे अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके यांनी सांगितले.

समृद्धी’च्या कनेक्टिव्हिटीला भूसंपादनाचा अडथळा‘डीएमआयसी’साठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीपासून समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. यासाठी अखेर ‘एमएसआरडीसी’ला ४१ कोटी रुपये देण्यास ‘एमआयडीसी’ राजी झाली आहे. ‘समृद्धी’पर्यंत कनेक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या ९०० मीटर अप्रोच रस्त्याचे भूसपांदन व रस्त्याचे काम ‘एमआयडीसी’ला करावे लागणार आहे, तर ‘समृद्धी’च्या ठिकाणी ‘इंटरचेंज’चे काम ‘एमएसआरडीसी’ करणार असून, त्यासाठी ८ हेक्टर जागा लागणार आहे. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाकरिता दिलेला पाच पट भाव ‘एमआयडीसी’कडून मिळावा म्हणून शेतकरी अडून बसले आहेत. सध्या ‘एमआयडीसी’ तडजोडीच्या भूमिकेत आहे. भूसंपादनासाठी दोन ते अडीच महिने अवधी लागण्याची शक्यता असून, जमिनीचा ताबा घेतल्यानंतर ‘इंटरचेंज’चे काम साडेतीन महिन्यांत पूर्ण होईल, असे अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद