शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोरोनामुळे ‘समृद्धी’चे परप्रांतीय मजूर धास्तावले; कामाचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 19:06 IST

Samruddhi Mahamarg's work slowed due to corona औरंगाबादसह राज्यातील अनेक महानगरे व जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्याचा मोठा परिणाम समृद्धी महामार्गाच्या कामावर झाला आहे.

ठळक मुद्दे मजूर परतीच्या तयारीत आहेत एका बाजूचे काम पूर्ण करण्यावर भर

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा समृद्धी महामार्गाच्या कामावर परिणाम झाला असून, पूर्वीसारखा दीर्घ स्वरूपाचे लॉकडाऊन लागले, तर अडकून पडावे लागेल, या भीतीपोटी अनेक परप्रांतीय मजूर गावाकडे परतण्याच्या तयारीत आहेत. दुसरीकडे, कामासाठी लागणारे अनेक साहित्य बाहेरून आणण्यासाठीदेखील मोठ्या अडचणी येत आहेत.

मागील काही दिवसांपासून राज्यभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. औरंगाबादसह राज्यातील अनेक महानगरे व जिल्ह्यांमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्यात आले आहे. त्याचा मोठा परिणाम समृद्धी महामार्गाच्या कामावर झाला आहे. दरम्यान, कामासाठी आलेले परप्रांतीय मजूरही मोठ्या प्रमाणात धास्तावले आहेत. पूर्वीच्या लॉकडाऊनमध्ये अचानक राज्याच्या सीमा बंद केल्या. वाहनेही बंद करण्यात आली. त्यामुळे हजारो परप्रांतीय मजूर पायी चालत त्यांच्या मूळ गावी परतले होते. यावेळीही दीर्घ स्वरूपाचे लॉकडाऊन जाहीर झाले, तर इथे अडकून पडण्यापेक्षा गावी गेलेले बरे, या मानसिकतेतून अनेक जण परतण्याच्या तयारीत आहेत. महामार्गाच्या कामासाठी लागणारी यंत्रे, लोखंड किंवा अन्य साहित्य आणण्यासाठीही अडचणी येत आहेत. त्यामुळे १५ ते २० दिवसांपासून कामाची गती मंदावली आहे. मात्र, १ मेपासून शिर्डीपर्यंत या महामार्गावरून वाहतूक सुरू करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यानुसार सध्या ६ पैकी एका बाजूच्या ३ लेनचे काम पूर्ण करण्यावर ‘एमएसआरडीसी’ने भर दिला आहे. डिसेंबरअखेरपर्यंत दोन्ही बाजूच्या सर्व लेनचे काम पूर्ण होईल, असे अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके यांनी सांगितले.

समृद्धी’च्या कनेक्टिव्हिटीला भूसंपादनाचा अडथळा‘डीएमआयसी’साठी शेंद्रा औद्योगिक वसाहतीपासून समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी देण्यात येणार आहे. यासाठी अखेर ‘एमएसआरडीसी’ला ४१ कोटी रुपये देण्यास ‘एमआयडीसी’ राजी झाली आहे. ‘समृद्धी’पर्यंत कनेक्टिव्हिटीसाठी लागणाऱ्या ९०० मीटर अप्रोच रस्त्याचे भूसपांदन व रस्त्याचे काम ‘एमआयडीसी’ला करावे लागणार आहे, तर ‘समृद्धी’च्या ठिकाणी ‘इंटरचेंज’चे काम ‘एमएसआरडीसी’ करणार असून, त्यासाठी ८ हेक्टर जागा लागणार आहे. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाकरिता दिलेला पाच पट भाव ‘एमआयडीसी’कडून मिळावा म्हणून शेतकरी अडून बसले आहेत. सध्या ‘एमआयडीसी’ तडजोडीच्या भूमिकेत आहे. भूसंपादनासाठी दोन ते अडीच महिने अवधी लागण्याची शक्यता असून, जमिनीचा ताबा घेतल्यानंतर ‘इंटरचेंज’चे काम साडेतीन महिन्यांत पूर्ण होईल, असे अधीक्षक अभियंता ए.बी. साळुंके यांनी सांगितले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद