शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

सणात ‘ध्वनी प्रदूषण’ झाल्यास प्रशासकीय, पोलीस अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई

By प्रभुदास पाटोळे | Updated: September 14, 2023 19:40 IST

खंडपीठ : रस्त्यावर विनापरवाना मंडप टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात विविध वाद्यांच्या तीव्र आवाजाने ‘ध्वनी प्रदूषण’ झाल्यास औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील १२ जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी आदी प्रतिवादींवर ‘न्यायालयाच्या अवमानाची कारवाई’ करण्यात येईल, असा सक्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी बुधवारी (दि.१३) दिला.

त्याचप्रमाणे रस्त्यावर विनापरवाना टाकलेले मंडप प्रशासनाने काढून टाकावेत. मंडप काढण्यास विरोध करणारी समिती, मंडळ अथवा न्यासाविरुद्ध गुन्हे दाखल करावेत. तसेच १२ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला आज प्रतिवादी करून त्यांना नोटिसा बजावण्याचाही आदेश खंडपीठाने दिला. खंडपीठाने यापूर्वी ८ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी तसेच १२ जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक यांना प्रतिवादी केले आहे. वरील आदेशाचे पालन करण्याचे जबाबदारी या सर्व प्रतिवादींवर आहे.

आदेश पारित करताना खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या १६ ऑगस्ट २०१६ च्या जनहित याचिका क्रमांक १७३/२०१० मधील आदेशाचा संदर्भ दिला आहे. आदेशानुसार ड्रम, ढोल, डी.जे. आणि म्युझिक सिस्टीम च्या ध्वनीबाबतच्या मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच गणेश पूजेसाठी रस्त्यावर मंडप टाकण्याबाबत व गणेशोत्सवाच्या काळात सवाद्य मिरवणूक काढण्यासंदर्भात घालून दिलेल्या मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्तातर्फे अॅड. प्रियंका प्रकाश जाधव, लातूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या मनपातर्फे अॅड. सुहास उरगुंडे व शासनातर्फे ॲड. सुजीत कार्लेकर काम पाहत आहेत. याचिकेवर १५ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

ध्वनीच्या तीव्रतेबाबत अशी आहेत मानके१. दिवसा (सकाळी ६ ते रात्री १० वाजे दरम्यान) ‘औद्योगिक परिसरात’ ७५ डेसिबल आणि रात्री (रात्री १० ते पहाटे ६ पर्यंत) ७० डेसिबल पेक्षा जादा तीव्र ध्वनी नसावा, असेही आदेश खंडपीठाने दिले.२.‘व्यावसायिक परिसरात’ दिवसा ६५ डेसिबल आणि रात्री ५५ डेसिबल पेक्षा जादा तीव्र ध्वनी नसावा.३. ‘रहिवासी परिसरात’ दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल पेक्षा जादा तीव्र ध्वनी नसावा.४. ‘शांत परिसरात’ म्हणजे दवाखाने, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक स्थळे आदींच्या आसपासच्या १०० मीटर परिसरात दिवसा ५० डेसिबल आणि रात्री ४० डेसिबल पेक्षा जास्त तीव्र ध्वनी नसावा, अशी मानके उच्च न्यायालयाने २०१६ ला घालून दिली आहेत.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCrime Newsगुन्हेगारी