शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
3
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
4
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
5
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
6
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
7
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
8
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
9
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
10
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
11
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
12
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
13
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
14
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
15
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
16
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
17
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
18
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
19
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

सणात ‘ध्वनी प्रदूषण’ झाल्यास प्रशासकीय, पोलीस अधिकाऱ्यांवर न्यायालयाच्या अवमानाची कारवाई

By प्रभुदास पाटोळे | Updated: September 14, 2023 19:40 IST

खंडपीठ : रस्त्यावर विनापरवाना मंडप टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

छत्रपती संभाजीनगर : सणासुदीच्या काळात विविध वाद्यांच्या तीव्र आवाजाने ‘ध्वनी प्रदूषण’ झाल्यास औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रातील १२ जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी, पोलिस अधिकारी आदी प्रतिवादींवर ‘न्यायालयाच्या अवमानाची कारवाई’ करण्यात येईल, असा सक्त आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. वाय.जी. खोब्रागडे यांनी बुधवारी (दि.१३) दिला.

त्याचप्रमाणे रस्त्यावर विनापरवाना टाकलेले मंडप प्रशासनाने काढून टाकावेत. मंडप काढण्यास विरोध करणारी समिती, मंडळ अथवा न्यासाविरुद्ध गुन्हे दाखल करावेत. तसेच १२ जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला आज प्रतिवादी करून त्यांना नोटिसा बजावण्याचाही आदेश खंडपीठाने दिला. खंडपीठाने यापूर्वी ८ सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी तसेच १२ जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक यांना प्रतिवादी केले आहे. वरील आदेशाचे पालन करण्याचे जबाबदारी या सर्व प्रतिवादींवर आहे.

आदेश पारित करताना खंडपीठाने मुंबई उच्च न्यायालयाच्या १६ ऑगस्ट २०१६ च्या जनहित याचिका क्रमांक १७३/२०१० मधील आदेशाचा संदर्भ दिला आहे. आदेशानुसार ड्रम, ढोल, डी.जे. आणि म्युझिक सिस्टीम च्या ध्वनीबाबतच्या मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच गणेश पूजेसाठी रस्त्यावर मंडप टाकण्याबाबत व गणेशोत्सवाच्या काळात सवाद्य मिरवणूक काढण्यासंदर्भात घालून दिलेल्या मानकांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. याचिकाकर्तातर्फे अॅड. प्रियंका प्रकाश जाधव, लातूर आणि छत्रपती संभाजीनगरच्या मनपातर्फे अॅड. सुहास उरगुंडे व शासनातर्फे ॲड. सुजीत कार्लेकर काम पाहत आहेत. याचिकेवर १५ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार आहे.

ध्वनीच्या तीव्रतेबाबत अशी आहेत मानके१. दिवसा (सकाळी ६ ते रात्री १० वाजे दरम्यान) ‘औद्योगिक परिसरात’ ७५ डेसिबल आणि रात्री (रात्री १० ते पहाटे ६ पर्यंत) ७० डेसिबल पेक्षा जादा तीव्र ध्वनी नसावा, असेही आदेश खंडपीठाने दिले.२.‘व्यावसायिक परिसरात’ दिवसा ६५ डेसिबल आणि रात्री ५५ डेसिबल पेक्षा जादा तीव्र ध्वनी नसावा.३. ‘रहिवासी परिसरात’ दिवसा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल पेक्षा जादा तीव्र ध्वनी नसावा.४. ‘शांत परिसरात’ म्हणजे दवाखाने, शैक्षणिक संस्था, न्यायालये, धार्मिक स्थळे आदींच्या आसपासच्या १०० मीटर परिसरात दिवसा ५० डेसिबल आणि रात्री ४० डेसिबल पेक्षा जास्त तीव्र ध्वनी नसावा, अशी मानके उच्च न्यायालयाने २०१६ ला घालून दिली आहेत.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCrime Newsगुन्हेगारी