शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
3
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
4
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
5
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
8
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
9
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
10
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
11
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
12
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
13
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
14
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
15
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
16
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
17
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
18
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
19
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
20
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!

बजाजनगरमध्ये पार्किंगच्या जागेवर बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 19:30 IST

वाळूज महानगर : बजाजनगरातील महावीर कॉम्पलेक्समधील काही गाळे धारकांनी पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम केले आहे. सदर बांधकाम ...

वाळूज महानगर : बजाजनगरातील महावीर कॉम्पलेक्समधील काही गाळे धारकांनी पार्किंगच्या जागेवर अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम केले आहे. सदर बांधकाम काढण्याची मागणी इतर गाळेधारकांकडून केली जात आहे. पण एमआयडीसी प्रशासन अतिक्रणधारकांना केवळ नोटिसा देवून थेट कारवाई करण्यास कुचराई करीत आहे. गाळेधारकांसह नागरिकांची वाहने रस्त्यावर लावली जात असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.

येथील महाराणा प्रताप चौकालगत एमआयडीसीच्या भूखंड क्रमांक पी- ११८ वर दोन मजली महावीर कॉम्पलेक्स बांधण्यात आले असून, एकूण ३३ गाळेधारक आहेत. कॉम्पलेक्सच्या चारही बाजूने पार्किंगसाठी तसेच काही दुर्घटना घडल्यास मोठ्या वाहनाला ये-जा करता यावी यासाठी जवळपास १० ते १२ फूट मोकळी जागा सोडण्यात आली आहे. काही गाळेधारकांनी मोकळ्या जागेवरच ५ ते ६ फूट अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम केले आहे. तसेच सेप्टी टँकवरही बांधकाम केल्याने हा रस्ताच बंद झाला आहे.

पार्किंगची जागा गायब झाल्याने वाहने रस्त्यावर उभी रहात आहेत. त्यामुळे रहादारीस अडथळा निर्माण होऊन वाहतुकीचा खोळंबा आहे. सायंकाळी वाहतूक कोंडी होत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. पार्क केलेली वाहने वाहतूक पोलीस उचलून नेत असल्याने ग्राहकांची संख्या रोडावली आहे. दुसरीकडे व्यवसायावर परिणाम होत असल्याने काही गाळेधारक व्यवसायिकांनी सदरील अतिक्रमण काढण्याची एमआयडीसीकडे अनेकवेळा मागणी केली आहे.

तक्रारीच्या अनुषंगाने एमआयडीसीने काही दिवसांपूर्वी राजकीय दबावापोटी ठोस कारवाई न करता केवळ थातूरमातूर कारवाई करुन अतिक्रमण हटविल्याचा देखावा केला. अतिक्रमण धारकांना नोटिसा देवून अवैध बांधकाम काढून घेण्यास सांगितले. परंतू अतिक्रमण धारकांनी नोटिशीला केराची टोपली दाखविली. एमआयडीसीने पुन्हा नोटिसा बजावल्या तरीही बांधकाम काढले गेले नाही.

तक्रार करुनही एमआयडीसी अतिक्रमण न काढता केवळ नोटिसा वर नोटिसा देवून अतिक्रमणधारकांना पाठीशी घालत असल्याचा आरोप येथील अन्य गाळेधारकांडून केला जात आहे. या विषयी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता भूषण हर्षे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

एमआयडीसीच्या भूमिकेविषयी शंकापार्किंगसाठी जागा नाही. रस्त्यावर उभी असलली ग्राहकांची वाहने पोलीस घेवून जातात. याचा धंद्यावर परिणाम होत आहे. एमआयडीसी कारवाई करण्याऐवजी नियम डावलून अतिक्रमणधारकांना मुदतवाढ देत असल्याने एमआयडीसीच्या भूमिकेविषयी शंका निर्माण होत आहे, असे तक्रारदार महावीर धुमाळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

टॅग्स :WalujवाळूजAurangabadऔरंगाबाद