शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे स्वबळ : शिवसेना, राष्ट्रवादी अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 19:24 IST

महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर

ठळक मुद्देशिवसेनेचीही स्वबळावर तयारी भारतीय जनता पक्षामध्येही उत्सुकता 

औरंगाबाद : महापालिका निवडणुका केव्हा होणार हे सर्वाेच्च न्यायालयातील निकालानंतरच  स्पष्ट होणार असले तरी काँग्रेसचे औरंगाबादचे संपर्कमंत्री अमित देशमुख यांनी महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा केल्यानंतर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अलर्ट झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीनेदेखील स्वबळावर लढण्याची तयारी असल्याची भूमिका ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केली. 

देशमुख यांचे विधान पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती देण्यासाठी असू शकते. त्यांनी स्वबळाची भाषा जरी केली असली तरी निर्णय तर वरिष्ठ पातळीवरच होणार असल्याचे मत शिवसेना-राष्ट्रवादीच्या गोटातून व्यक्त होत आहे. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार आहे. त्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस सहभागी आहे. औरंगाबाद महापालिकेत एप्रिल २०२० पर्यंत शिवसेना-भाजप सत्तेत होते. ११५ नगरसेवकांच्या आकड्यांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे १० ते १२ नगरसेवक होते. सोबत एमआयएमचे २६ नगरसेवक होते. उर्वरित सत्तेचा आकडा शिवसेना-भाजपच्या बाजूने होता. मनपाच्या निवडणुकांबाबत सध्या अनिश्चितता आहे. 

सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालानंतरच निवडणूक कधी होईल, हे स्पष्ट होणार असले तरी कार्यकर्त्यांमध्ये जीव ओतण्याच्या भूमिकेतून शिवसेना आणि काँग्रेसने आघाडी घेतली आहे. भाजपसमोर पूर्ण क्षमतेने लढण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्रित जाण्याचे मनसुभे ठेवलेले असताना काँग्रेसने स्वबळाची भाषा केल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. महाविकास आघाडीचे राज्यात सरकार जरी असले तरी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ही आघाडी होणार की नाही, याबाबत आता आघाडीतील तिन्ही पक्षांसह भाजपमध्येही उत्सुकता आहे. 

संपर्कमंत्री देशमुख म्हणाले होते...काँग्रेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नेहमी स्वबळावरच लढते. त्यामुळे औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकादेखील काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे.  शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पक्ष राज्यात महाविकास आघाडीच्या रूपाने सत्तेत्त आहेत. मग तीच आघाडी महापालिकेच्या निवडणुकीत कायम न राहण्यामागे नेमके कारण काय आहे, यावर संपर्कमंत्री देशमुख यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांची मागणी स्वबळावर निवडणूक लढण्याची असल्याचे सांगितले होते. 

आम्हीही ११५ वार्डांची तयारी केली आहेशिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. अंबादास दानवे यांनी सांगितले, काँग्रेसचे मंत्री देशमुख यांचे मत पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांत जोश निर्माण करण्यासाठी असेल. महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ पातळीवरच होणार आहे. तत्पूर्वी शिवसेनेनेदेखील ११५ वॉर्डांमध्ये पूर्ण क्षमतेने वॉर्डनिहाय बैठका घेत तयारी केली आहे. 

...तर राष्ट्रवादीही स्वबळावरचराष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विजयराज साळवे यांनी सांगितले, महाविकास आघाडी होण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. महाविकास आघाडीत निवडणूक होईल; पण काँग्रेस जर स्वबळाची भाषा करीत असेल तर आमच्या शुभेच्छा आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढण्याबाबत वरिष्ठच निर्णय घेतील. आम्हीदेखील ११५ वॉर्डांमध्ये बैठकांसह आढावा घेत तयारी केली आहे.

 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकcongressकाँग्रेस