शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस, राष्ट्रवादीसह वंचितांची मतदारसंघ बांधणी वेगाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 13:21 IST

शिवसेना-भाजप युतीला टक्कर देण्यासाठी उमेदवारांनी सुरू केलाय जनसंपर्क 

ठळक मुद्देशहरातील तिन्ही मतदारसंघात वंचित आघाडी कामाला लागली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका अद्याप अस्पष्ट युतीला एकतर्फी विजय मिळविणे अवघड

औरंगाबाद : जिल्ह्यातील राजकारणात शिवसेना-भाजप युतीमध्ये प्रवेश करणाऱ्यांच्या नावाने चर्चा होत असली तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससहवंचित बहुजन आघाडीने मतदारसंघ बांधणी वेगाने सुरू केली आहे. युतीला टक्कर देण्यासाठी संभाव्य उमदेवारांनी मतदारांशी लोकसभा निवडणुकीपासूनच संपर्क सुरू केलेला आहे. त्यामुळे युतीला एकतर्फी विजय मिळविणे अवघड होणार आहे. 

जिल्ह्यात वैजापूरवगळता एकही मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस व काँग्रेसच्या आघाडीकडे नाही. त्यामुळे आघाडीने जिल्ह्यात इच्छुकांच्या मुलाखती घेऊन तुल्यबळ उमेदवारांचा शोध घेतला आहे. वैजापूरचे आ. भाऊसाहेब चिकटगावकर हे इतर पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या होत्या; परंतु सध्या तरी तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील असे चित्र आहे. पैठणमधून राष्ट्रवादीने तयारी पूर्ण केली आहे. फुलंब्रीत माजी आ. कल्याण काळे यांनी पूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. माजी आ. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तेथे काँग्रेसमधील दुसरी फळी लोकसभा निवडणुकीपासूनच कामाला लागली आहे. पालोदकर यांनी मतदारसंघाकडे ताकदीने लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. कन्नडमधून माजी आ. नामदेव पवार यांनीही काँग्रेसकडून मतदारसंघाचा पूर्ण आढावा घेतला आहे. गंगापूर-खुलताबाद मतदारसंघातील उमेदवारीबाबत अजून काही निर्णय झाला नसला तरी ऐनवेळी युतीतून नाराज झालेला तगडा उमेदवार आघाडीकडून लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. पश्चिम मतदारसंघातही काँग्रेसने संपर्क सुरू ठेवला आहे. मध्य आणि पूर्व मतदारसंघात काँगे्रसचे अजून काहीही ठरलेले नाही. युतीचा सर्वत्र बोलबाला असला तरी वंचित आघाडी आणि काँग्रेस-राष्ट्रवादीनेही मोठ्या ताकदीने जिल्हा पोखरला आहे. 

या सर्व प्रक्रियेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अद्याप पत्ते ओपन केलेले नाहीत. मनसेचे येथील संघटन कोलमडल्यामुळे पक्षाकडून उमेदवार देण्याबाबत अजून निर्णय झालेला नाही. मनसेने जर वंचित किंवा आघाडीत सामील होण्याचा निर्णय घेतला तर त्यांचे उमेदवार कदाचित विधानसभेच्या मैदानात नसतील, अशीही चर्चा सध्या सुरू आहे.

वंचित आघाडीही सरसावली 

शहरातील तिन्ही मतदारसंघांपैकी पूर्व, पश्चिम आणि मध्य मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने कामाला सुरुवात केलेली आहे. २०१४ च्या पराभूत उमेदवारांपैकी पूर्व मतदारसंघात एकाने संपर्क अभियान वेगाने सुरू केले आहे. पश्चिम मतदारसंघात वंचितचा उमेदवार जवळपास निश्चितच आहे. मध्यमधून खा. इम्तियाज जलील ठरवतील तो उमेदवार समोर येईल. एमआयएम व भारिप यांच्यातील जागावाटपानंतरच सर्व काही निश्चित होणार असले तरी सध्या उमेदवारांना संपर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद, फुलंब्री या मतदारसंघातूनही वंचित आघाडीने उमेदवार हेरले आहेत. ऐनवेळच्या राजकीय उलथा-पालथीमध्ये फुलंब्रीतून ओबीसी चेहरा वंचितमधून पुढे आला तर नवल वाटू नये. 

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीvidhan sabhaविधानसभा