शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
2
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
3
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
4
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
5
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
6
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
7
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
8
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
11
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
12
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
13
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
14
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
15
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
16
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
17
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
18
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
19
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
20
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
Daily Top 2Weekly Top 5

‘संभाजीनगर’वरून काँग्रेसनेही केले हात वर; किमान समान कार्यक्रमात हा मुद्दा नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 11:57 IST

घाई गडबडीत संभाजीनगरचा मुद्दा आला आणि तो मंजूर करून घेतला गेला

औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर आता काँग्रेसनेहीऔरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून हात वर केले आहेत. काँग्रेसचे नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज औरंगाबादेत एका कार्यक्रमात आले असता, पत्रकारांशी बोलताना काँग्रेसच्या अजेंड्यावर संभाजीनगरचा विषय नाही. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमातही हा मुद्दा नव्हता, असे स्पष्ट केले.

१० आणि ११ जुलै रोजी शरद पवार औरंगाबादेत होते. त्यांनीही अशीच भूमिका घेऊन हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणण्यापूर्वी आमच्याशी चर्चा केली नव्हती, असे म्हटले होते. आज बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळेवर हा विषय चर्चेसाठी आणला. खरे तर हा विषय धर्माच्या पातळीवर जाता कामा नये. आता नामांतराची चर्चा न होता विकासाच्या मुद्द्यांची चर्चा व्हायला हवी, औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. रस्त्यांचे प्रश्न आहेत. त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.शेवटची कॅबिनेट झाली, तेव्हा महाराष्ट्रात पावसाचा जोर नव्हता. दुष्काळ पडेल की काय, अशी शक्यता होती. त्यामुळे आम्ही या प्रश्नावर चर्चा व्हावी, या मताचे होतो. परंतु घाई गडबडीत संभाजीनगरचा मुद्दा आला आणि तो मंजूर करून घेतला गेला, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचीहीएकनाथ शिंदे सरकारही आता घाईगडबडीतच निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. एका प्रश्नाच्या उत्तरात थोरात यांनी आरोप केला की, सत्ता मिळवण्यासाठी काहीही करायचे हे लोकशाहीसाठी घातक आहे. शेवटी सत्ता कशी मिळवली, याचा इतिहास लिहिला जातो. तसेच या देशातील लोकशाही टिकली पाहिजे, याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचीही आहेच.

मतभेद असतातचमहाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची कामे होत नव्हती, या तक्रारीत तथ्य आहेच ना, असे विचारले असता, थोरात उद्गारले, एकाच पक्षाचे सरकार असताना मतभेद असतात. आमचं तर तीन पक्षांचं सरकार होतं आणि सर्वच कामं होतच असतात, असंही नाही. त्याला थोडा काळही जाऊ द्यावा लागतो. 

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात