शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

‘संभाजीनगर’वरून काँग्रेसनेही केले हात वर; किमान समान कार्यक्रमात हा मुद्दा नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 11:57 IST

घाई गडबडीत संभाजीनगरचा मुद्दा आला आणि तो मंजूर करून घेतला गेला

औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर आता काँग्रेसनेहीऔरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून हात वर केले आहेत. काँग्रेसचे नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज औरंगाबादेत एका कार्यक्रमात आले असता, पत्रकारांशी बोलताना काँग्रेसच्या अजेंड्यावर संभाजीनगरचा विषय नाही. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमातही हा मुद्दा नव्हता, असे स्पष्ट केले.

१० आणि ११ जुलै रोजी शरद पवार औरंगाबादेत होते. त्यांनीही अशीच भूमिका घेऊन हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणण्यापूर्वी आमच्याशी चर्चा केली नव्हती, असे म्हटले होते. आज बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळेवर हा विषय चर्चेसाठी आणला. खरे तर हा विषय धर्माच्या पातळीवर जाता कामा नये. आता नामांतराची चर्चा न होता विकासाच्या मुद्द्यांची चर्चा व्हायला हवी, औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. रस्त्यांचे प्रश्न आहेत. त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.शेवटची कॅबिनेट झाली, तेव्हा महाराष्ट्रात पावसाचा जोर नव्हता. दुष्काळ पडेल की काय, अशी शक्यता होती. त्यामुळे आम्ही या प्रश्नावर चर्चा व्हावी, या मताचे होतो. परंतु घाई गडबडीत संभाजीनगरचा मुद्दा आला आणि तो मंजूर करून घेतला गेला, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचीहीएकनाथ शिंदे सरकारही आता घाईगडबडीतच निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. एका प्रश्नाच्या उत्तरात थोरात यांनी आरोप केला की, सत्ता मिळवण्यासाठी काहीही करायचे हे लोकशाहीसाठी घातक आहे. शेवटी सत्ता कशी मिळवली, याचा इतिहास लिहिला जातो. तसेच या देशातील लोकशाही टिकली पाहिजे, याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचीही आहेच.

मतभेद असतातचमहाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची कामे होत नव्हती, या तक्रारीत तथ्य आहेच ना, असे विचारले असता, थोरात उद्गारले, एकाच पक्षाचे सरकार असताना मतभेद असतात. आमचं तर तीन पक्षांचं सरकार होतं आणि सर्वच कामं होतच असतात, असंही नाही. त्याला थोडा काळही जाऊ द्यावा लागतो. 

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात