शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

‘संभाजीनगर’वरून काँग्रेसनेही केले हात वर; किमान समान कार्यक्रमात हा मुद्दा नव्हता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 11:57 IST

घाई गडबडीत संभाजीनगरचा मुद्दा आला आणि तो मंजूर करून घेतला गेला

औरंगाबाद: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यानंतर आता काँग्रेसनेहीऔरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून हात वर केले आहेत. काँग्रेसचे नेते व माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज औरंगाबादेत एका कार्यक्रमात आले असता, पत्रकारांशी बोलताना काँग्रेसच्या अजेंड्यावर संभाजीनगरचा विषय नाही. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या किमान समान कार्यक्रमातही हा मुद्दा नव्हता, असे स्पष्ट केले.

१० आणि ११ जुलै रोजी शरद पवार औरंगाबादेत होते. त्यांनीही अशीच भूमिका घेऊन हा प्रस्ताव कॅबिनेटमध्ये आणण्यापूर्वी आमच्याशी चर्चा केली नव्हती, असे म्हटले होते. आज बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळेवर हा विषय चर्चेसाठी आणला. खरे तर हा विषय धर्माच्या पातळीवर जाता कामा नये. आता नामांतराची चर्चा न होता विकासाच्या मुद्द्यांची चर्चा व्हायला हवी, औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. रस्त्यांचे प्रश्न आहेत. त्यावर चर्चा होणे अपेक्षित आहे.शेवटची कॅबिनेट झाली, तेव्हा महाराष्ट्रात पावसाचा जोर नव्हता. दुष्काळ पडेल की काय, अशी शक्यता होती. त्यामुळे आम्ही या प्रश्नावर चर्चा व्हावी, या मताचे होतो. परंतु घाई गडबडीत संभाजीनगरचा मुद्दा आला आणि तो मंजूर करून घेतला गेला, असे थोरात यांनी स्पष्ट केले.

जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचीहीएकनाथ शिंदे सरकारही आता घाईगडबडीतच निर्णय घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. एका प्रश्नाच्या उत्तरात थोरात यांनी आरोप केला की, सत्ता मिळवण्यासाठी काहीही करायचे हे लोकशाहीसाठी घातक आहे. शेवटी सत्ता कशी मिळवली, याचा इतिहास लिहिला जातो. तसेच या देशातील लोकशाही टिकली पाहिजे, याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाचीही आहेच.

मतभेद असतातचमहाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसची कामे होत नव्हती, या तक्रारीत तथ्य आहेच ना, असे विचारले असता, थोरात उद्गारले, एकाच पक्षाचे सरकार असताना मतभेद असतात. आमचं तर तीन पक्षांचं सरकार होतं आणि सर्वच कामं होतच असतात, असंही नाही. त्याला थोडा काळही जाऊ द्यावा लागतो. 

टॅग्स :congressकाँग्रेसAurangabadऔरंगाबादBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात