शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
2
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
3
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
4
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
5
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
6
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
7
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
8
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
9
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
10
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
11
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
12
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
13
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
14
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
15
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
16
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
17
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
18
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
19
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
20
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो

गुणवत्ता व सभ्यतेचा संगम, कर्तबगार व्यक्तिमत्व कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 11:56 IST

अत्यंत अभ्यासू व प्रामाणिक डॉ. शिवराज नाकाडे यांनी वकिली केली असती, तर लाखोंची कमाई करता आली असती, पण शिक्षणावर निष्ठा असणाऱ्या डॉ. नाकाडेंनी आपला अध्यापन व अध्ययन धर्म सोडला नाही. त्यांच्या या अतुलनीय योगदानाची व क्रियाशील वृत्तीची दखल घेत त्यांना नामविस्तार झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पहिले पूर्णवेळ कुलगुरू होण्याचा सन्मान मिळाला.

- प्रा. डॉ. सुधीर गव्हाणे ( माजी कुलगुरू) 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कर्तबगार व सुसंस्कृत माजी कुलगुरू व लातूरच्या दयानंद विधि महाविद्यालयाचे दीर्घकालीन प्राचार्य, केंद्र- राज्य संबंधाचे राष्ट्रीय दर्जाचे संशोधक डॉ. शिवराज नाकाडे यांचे निधन म्हणजे मराठवाड्यातील शेतकरी कुटुंबातून आलेल्या व काहीही शैक्षणिक परंपरा नसलेल्या तरीही कर्तबगार ठरलेल्या व सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या पहिल्या पिढीच्या प्रतिनिधीचे निधन म्हणायला हवे. पूर्वीच्या उस्मानाबाद व आताच्या लातूर जिल्ह्यातील चाकूरचा प्रतिभावान तरीही सुसंस्कृत नि विनम्रवृत्तीचे डॉ. नाकाडे यांनी हैदराबाद येथील प्रख्यात विवेक वर्धिनी महाविद्यालयातून गुणवत्तापूर्णरितीने पदवी घेतली. राज्यशास्त्रात पद्व्युत्तर शिक्षण उत्तम गुणांनी केलं. विधि (लॉ) एलएलएम पदवी उस्मानिया विद्यापीठातून घेतली. लॉ विषयात डॉक्टरेट केली. त्याकाळी लॉमध्ये डॉक्टरेट करणारे दोन-चारच होते.

प्राचार्य राहून शेकडो वकिलांची फौज घडवलीआरंभापासून अतिशय कष्टाळू व अभ्यासू असणारे डॉ. शिवराज नाकाडे यांनी केंद्र- राज्य संबंध व भारतीय घटना या विषयावर मौलिक संशोधन केलं होतं. त्यांचा या विषयावरील इंग्रजी ग्रंथ मैलाचा दगड मानला जातो. हैदराबादहून परतल्यावर दयानंद शिक्षण संस्थेने विधि महाविद्यालय लातूरला काढले व डॉ. नाकाडे यांना प्राचार्यपद सन्मानानं दिलं गेलं. विनाअनुदान महाविद्यालय असलं तरी डॉ. नाकाडे यांनी जीव ओतून काम केलं. शेकडो वकिलांची पहिली पिढी घडविली. इतकेच नव्हे तर राज्यातील विधि महाविद्यालयांना अनुदान मिळण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत वीस वर्षे लढा दिला व न्याय मिळविला. डॉ. नाकाडे यांची लढाऊ वृत्ती व चिकाटी सर्वांनी पाहिली.

कुलगुरू पदाचा सन्मानअत्यंत अभ्यासू व प्रामाणिक डॉ. शिवराज नाकाडे यांनी वकिली केली असती, तर लाखोंची कमाई करता आली असती, पण शिक्षणावर निष्ठा असणाऱ्या डॉ. नाकाडेंनी आपला अध्यापन व अध्ययन धर्म सोडला नाही. त्यांच्या या अतुलनीय योगदानाची व क्रियाशील वृत्तीची दखल घेत त्यांना नामविस्तार झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे पहिले पूर्णवेळ कुलगुरू होण्याचा सन्मान मिळाला. त्याआधी ते विधि अधिष्ठाता होतेच. अशी अनपेक्षित संधी निवृत्तीच्या उंबरठ्यावर मिळाल्यावर डॉ. नाकाडे यांनी झपाटल्यागत निर्मोही वृत्तीने काम केले. नामविस्ताराचा निधी योग्य रीतीनं वापरून संगणकशास्त्र, पर्यटनशास्त्र, पर्यावरणशास्त्र या विभागांची उभारणी व सुरुवात केली. तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून उर्दू व लॉ, पाली व बुद्धिझम विभागांची मागणी पूर्ण करून घेतली. तेही विभाग सुरू केले. विद्यापीठाचे भव्य नाट्यगृह बांधून पूर्ण केले. अनेक वर्षांपासून रिक्त प्राध्यापकांची पदे भरली. स्पेशल ड्राइव्ह घेऊन राखीव पदे मोठ्या संख्येने भरली. अनेक जण प्राध्यापक झाले. इतकेच नव्हे तर मोजक्याच महिला प्राध्यापक असणाऱ्या विद्यापीठात अनेक महिला प्राध्यापकांची नेमणूक केली. समतावादी कृती करणारे कुलगुरू अशी कामं केली हे कुणीही नाकारू शकत नाही. कमवा-शिका योजनेचा विस्तार केला. मागासवर्गीय व खुल्या वर्गातील मुलांना समान दिवस काम दिले, मानधन वाढवले. मुलींनाही कमवा-शिका योजनेत प्रवेश देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा सहकारी म्हणून मला संचालक विद्यार्थी कल्याण विभागात दोन टर्म काम करता आलं व त्यांचे नेतृत्व गुण अनुभवता आले व मलाही खूप शिकता आले. झेरॉक्स सेंटर, फाइलपॅड मेकिंग युनिट सुरू केली. केंद्रीय युवक महोत्सवाची सुरुवात केली.

घेतला वसा सोडला नाहीकुलगुरूंना जाती-पातीपलीकडे राहून विद्यापीठ हिताचं काम करावं लागतं. विरोध व दबाव गटांना तोंड द्यावं लागतं. क़ायदा व राज्यशास्त्राचे तज्ज्ञ या नात्यानं हे सारं त्यांनी लिलया सांभाळलं. सभ्यता व सुसंस्कृतता यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यांच्या सरळ मराठवाडी भाषेची टिंगलही होतं असे, पण त्यांनी मातीशी नातं तोडलं नाही. सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंना खूप काही सहन करावं लागतं. ते नाकाडे सरांनी सारं पचवलं, पण घेतला वसा सोडला नाही. कुलगुरू डॉ. शिवराज नाकाडे यांना विनम्र आदरांजली.. ! विद्यापीठानं विधि विभागाला त्यांचं नावं द्यावं असं वाटतं. कुलगुरू डॉ. विजय फुलारी व व्यवस्थापन परिषद याचा जरूर विचार करेल, अशी आशा आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरlaturलातूर