शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

श्रेयवादात पूल आणखी ‘खचला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:41 IST

बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आणि नेते मंडळीमध्ये श्रेय लाटण्यासाठी अनोखी स्पर्धा सुरु झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आणि नेते मंडळीमध्ये श्रेय लाटण्यासाठी अनोखी स्पर्धा सुरु झाली. वाहून गेलेल्या या पुलाला पर्यटनस्थळाचे स्वरूप येत असून, प्रत्येकजण या पुलाला भेट देऊन दररोज वेगवेगळी घोषणा करीत असला तरी वाहतुकीचा प्रश्न मात्र सुटला नाही. या पावसाळ्यात दुसºयांदा हा पूल वाहून गेला. बीड शहरात येणारी आणि बाहेर जाणारी वाहतूक वेगवेगळ्या मार्गांनी वळविली असली तरी सर्वसामान्य जनता मात्र या त्रासास कमालीची वैतागली आहे. यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यायी पुलाच्या डागडुजीचे श्रेय घेण्याची स्पर्धा आचंबित करणारी आहे.नवीन पुलाचे बांधकाम लवकर सुरू करा - पालकमंत्रीबिंदूसरा नदीवरील वाहतूक बंद झाल्यामुळे पर्यायी वळण रस्ता सुरु करण्यात आला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य ठेवावा, असे निर्देश देत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पुलाच्या कामाचा आढावा घेतला.नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नवीन पुलाचे काम लवकर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासन व आयआरबीच्या अधिकाºयांना दिले. यावेळी त्यांनी कामासंदर्भात अनेक सूचना केल्या.पंकजा मुंडे यांनी गुरुवारी मंत्रालयातील दालनातून जिल्हाधिकारी देवेंद्रसिंग, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि आयआरबीच्या संबंधित अधिकाºयांची बिंदूसरा नदीवरील पुलाचे बांधकाम आणि शहरातील वाहतुकीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेतली.बिंदूसरा नदीवरील वाहतूक बंद झाल्याने अवजड वाहतूक खंडेश्वरी मंदिराकडून तर हलके वाहने मोमीनपुरा भागातून सुरु करण्यात आली आहेत. हे रस्ते पावसामुळे खराब होऊ शकतात. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी चोवीस तास सतर्क रहावे, असे आदेश त्यांनी दिले.‘क्षीरसागर बंधूमुळेच पुलाचे काम अंतिम टप्प्यात’बिंदुसरा नदीवरील पूल असो किंवा बीड शहरातील अनेक महत्त्वकांक्षी योजना, ज्या पूर्ण करण्यासाठी आ. जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामे केल्यामुळेच ती आता अंतिम टप्प्यात आली आहेत.या सर्व कामांचा शोध घेऊन विरोधक आता आयत्या पिठावर रेघोट्या मारु लागले आहेत हे न कळण्याइतकी जनता दुधखुळी नाही, असे नगरसेवक विष्णू वाघमारे, विनोद मुळूक, सय्यद सादेक, विकास जोगदंड, भीमराव वाघचौरे, प्रा. किशोर काळे यांनी पत्रकात म्हटले आहे.