शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने प्रवाशांना उडवले, तिघांची प्रकृती गंभीर; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
4
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
5
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
6
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
7
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
8
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
9
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
10
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
11
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
12
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
13
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
14
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
15
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
16
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
17
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
18
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
19
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...
20
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

श्रेयवादात पूल आणखी ‘खचला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:41 IST

बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आणि नेते मंडळीमध्ये श्रेय लाटण्यासाठी अनोखी स्पर्धा सुरु झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आणि नेते मंडळीमध्ये श्रेय लाटण्यासाठी अनोखी स्पर्धा सुरु झाली. वाहून गेलेल्या या पुलाला पर्यटनस्थळाचे स्वरूप येत असून, प्रत्येकजण या पुलाला भेट देऊन दररोज वेगवेगळी घोषणा करीत असला तरी वाहतुकीचा प्रश्न मात्र सुटला नाही. या पावसाळ्यात दुसºयांदा हा पूल वाहून गेला. बीड शहरात येणारी आणि बाहेर जाणारी वाहतूक वेगवेगळ्या मार्गांनी वळविली असली तरी सर्वसामान्य जनता मात्र या त्रासास कमालीची वैतागली आहे. यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यायी पुलाच्या डागडुजीचे श्रेय घेण्याची स्पर्धा आचंबित करणारी आहे.नवीन पुलाचे बांधकाम लवकर सुरू करा - पालकमंत्रीबिंदूसरा नदीवरील वाहतूक बंद झाल्यामुळे पर्यायी वळण रस्ता सुरु करण्यात आला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य ठेवावा, असे निर्देश देत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पुलाच्या कामाचा आढावा घेतला.नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नवीन पुलाचे काम लवकर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासन व आयआरबीच्या अधिकाºयांना दिले. यावेळी त्यांनी कामासंदर्भात अनेक सूचना केल्या.पंकजा मुंडे यांनी गुरुवारी मंत्रालयातील दालनातून जिल्हाधिकारी देवेंद्रसिंग, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि आयआरबीच्या संबंधित अधिकाºयांची बिंदूसरा नदीवरील पुलाचे बांधकाम आणि शहरातील वाहतुकीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेतली.बिंदूसरा नदीवरील वाहतूक बंद झाल्याने अवजड वाहतूक खंडेश्वरी मंदिराकडून तर हलके वाहने मोमीनपुरा भागातून सुरु करण्यात आली आहेत. हे रस्ते पावसामुळे खराब होऊ शकतात. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी चोवीस तास सतर्क रहावे, असे आदेश त्यांनी दिले.‘क्षीरसागर बंधूमुळेच पुलाचे काम अंतिम टप्प्यात’बिंदुसरा नदीवरील पूल असो किंवा बीड शहरातील अनेक महत्त्वकांक्षी योजना, ज्या पूर्ण करण्यासाठी आ. जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामे केल्यामुळेच ती आता अंतिम टप्प्यात आली आहेत.या सर्व कामांचा शोध घेऊन विरोधक आता आयत्या पिठावर रेघोट्या मारु लागले आहेत हे न कळण्याइतकी जनता दुधखुळी नाही, असे नगरसेवक विष्णू वाघमारे, विनोद मुळूक, सय्यद सादेक, विकास जोगदंड, भीमराव वाघचौरे, प्रा. किशोर काळे यांनी पत्रकात म्हटले आहे.