शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयवादात पूल आणखी ‘खचला’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:41 IST

बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आणि नेते मंडळीमध्ये श्रेय लाटण्यासाठी अनोखी स्पर्धा सुरु झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बिंदुसरा नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला आणि नेते मंडळीमध्ये श्रेय लाटण्यासाठी अनोखी स्पर्धा सुरु झाली. वाहून गेलेल्या या पुलाला पर्यटनस्थळाचे स्वरूप येत असून, प्रत्येकजण या पुलाला भेट देऊन दररोज वेगवेगळी घोषणा करीत असला तरी वाहतुकीचा प्रश्न मात्र सुटला नाही. या पावसाळ्यात दुसºयांदा हा पूल वाहून गेला. बीड शहरात येणारी आणि बाहेर जाणारी वाहतूक वेगवेगळ्या मार्गांनी वळविली असली तरी सर्वसामान्य जनता मात्र या त्रासास कमालीची वैतागली आहे. यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पर्यायी पुलाच्या डागडुजीचे श्रेय घेण्याची स्पर्धा आचंबित करणारी आहे.नवीन पुलाचे बांधकाम लवकर सुरू करा - पालकमंत्रीबिंदूसरा नदीवरील वाहतूक बंद झाल्यामुळे पर्यायी वळण रस्ता सुरु करण्यात आला आहे. हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य ठेवावा, असे निर्देश देत पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी पुलाच्या कामाचा आढावा घेतला.नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन नवीन पुलाचे काम लवकर सुरू करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासन व आयआरबीच्या अधिकाºयांना दिले. यावेळी त्यांनी कामासंदर्भात अनेक सूचना केल्या.पंकजा मुंडे यांनी गुरुवारी मंत्रालयातील दालनातून जिल्हाधिकारी देवेंद्रसिंग, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर आणि आयआरबीच्या संबंधित अधिकाºयांची बिंदूसरा नदीवरील पुलाचे बांधकाम आणि शहरातील वाहतुकीसंदर्भात व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे बैठक घेतली.बिंदूसरा नदीवरील वाहतूक बंद झाल्याने अवजड वाहतूक खंडेश्वरी मंदिराकडून तर हलके वाहने मोमीनपुरा भागातून सुरु करण्यात आली आहेत. हे रस्ते पावसामुळे खराब होऊ शकतात. त्यामुळे संबंधित यंत्रणांनी चोवीस तास सतर्क रहावे, असे आदेश त्यांनी दिले.‘क्षीरसागर बंधूमुळेच पुलाचे काम अंतिम टप्प्यात’बिंदुसरा नदीवरील पूल असो किंवा बीड शहरातील अनेक महत्त्वकांक्षी योजना, ज्या पूर्ण करण्यासाठी आ. जयदत्त क्षीरसागर आणि नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी नियोजनबद्ध पद्धतीने कामे केल्यामुळेच ती आता अंतिम टप्प्यात आली आहेत.या सर्व कामांचा शोध घेऊन विरोधक आता आयत्या पिठावर रेघोट्या मारु लागले आहेत हे न कळण्याइतकी जनता दुधखुळी नाही, असे नगरसेवक विष्णू वाघमारे, विनोद मुळूक, सय्यद सादेक, विकास जोगदंड, भीमराव वाघचौरे, प्रा. किशोर काळे यांनी पत्रकात म्हटले आहे.