शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरणी न्यायालयीन चौकशी करा; खंडपीठात जनहित याचिका सादर

By बापू सोळुंके | Updated: September 9, 2023 21:56 IST

उपोषणकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत, जखमी आंदोलकांच्या मूलभूत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याने त्यांना भरपाई देण्यात यावी, या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, याचिकेत नमूद

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण मागणीसाठी जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी येथे १ सप्टेंबर रोजी शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. यात अनेक आंदोलक गंभीर जखमी झाले. ॲड. देवीदास शेळके यांनी खंडपीठात फौजदारी जनहित याचिका सादर केली आहे. या याचिकेत त्यांनी उपोषणकर्त्यांवर लाठीमार करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे नोंदवावेत, जखमी आंदोलकांच्या मूलभूत आणि मानवी हक्कांचे उल्लंघन झाल्याने त्यांना भरपाई देण्यात यावी, या घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी विनंती करण्यात आली.

याचिकेत नमूद केले की, अंतरवाली सराटी येथे १ सप्टेंबर रोजी शांततेत उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर सुमारे दीड हजार पोलिस आणि एसआरपीएफ जवानांनी निर्दयी पद्धतीने लाठीहल्ला केला. आंदोलन उधळून लावण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून गोळीबार करण्यात आला. अनेक आंदोलकांना पोलिसांनी घरात घुसून मारहाण केली. शंभरहून अधिक आंदोलक जखमी झाले किंवा त्यांना मुका मार लागला. गंभीर जखमी आंदोलक रुग्णालयात उपचार घेत आहेत, असे या याचिकेत नमूद आहे. यावेळी पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत १० ते १२ पोलिस जखमी झालेत. याविरोधात पोलिसांनी ३५० हून अधिक ज्ञात, अज्ञात लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदविले आहेत. मात्र, पोलिसांनी आंदोलकांवर जो निर्दयी हल्ला केला आणि ज्या अधिकाऱ्यांच्या तोंडी अथवा लेखी आदेशाने बेदम मारहाण करण्यात आली, त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

न्यायालयीन समितीकडून चौकशी व्हावीअंतरवाली सराटी येथे आंदोलकांवर बेछूट लाठीहल्ला करून त्यांना जखमी करणाऱ्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होणे अपेक्षित आहे. यावेळी दगडफेकही झाली होती. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन समितीकडून चौकशी व्हावी आणि जखमींना नुकसानभरपाई मिळावी, अशी आपण याचिकेत विनंती केली आहे. पुढील आठवड्यात ही याचिका न्यायालयासमोर सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.-ॲड. देवीदास आर. शेळके, याचिकाकर्ता.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठMaratha Reservationमराठा आरक्षण