शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

एक हजार पानांच्या महापालिका वॉर्ड रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 19:32 IST

एप्रिल २०२० मध्ये मनपाची निवडणूक घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहापालिकेत प्रतीक्षा सोडतीची  काही वॉर्डांच्या रचना बदलल्या

औरंगाबाद : शहरातील ११५ वॉर्डांची नवीन रचना करण्यात आली आहे. सोमवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्या समितीने वॉर्ड रचनेचा सविस्तर अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला. एक हजार पानांचा हा अहवाल असून, लवकरच आयोग मनपाला आरक्षणाची सोडत घेण्याचा कार्यक्रम देणार आहे. नवीन वॉर्ड रचनेत काही मोजक्याच वॉर्डांची रचना बदलण्यात आली आहे. उर्वरित वॉर्ड जशास तसे ठेवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

एप्रिल २०२० मध्ये मनपाची निवडणूक घेण्यात येणार आहे. अगोदर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मनपाने प्रभाग पद्धतीची तयारी केली. राज्यात नव्याने आलेल्या महाविकास आघाडी सरकारने प्रभाग पद्धत रद्द केली. त्यामुळे महापालिकेची निवडणूक जुन्या वॉर्ड पद्धतीनेच घेण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून मनपाचे अधिकारी, कर्मचारी वॉर्ड रचनेचे काम करीत होते. त्यांनी मागील आठवड्यात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांच्या समितीसमोर नवीन वॉर्ड रचनेचा अहवाल सादर केला. समितीने या अहवालाचे बारकाईने निरीक्षण काही फेरबदलाच्या सूचना केल्या. त्यानंतर आज हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. तब्बल एक हजार पानांचा हा अहवाल असून, यामध्ये मोजक्याच वॉर्डांच्या हद्दीत बदल करण्यात आला आहे. सातारा देवळाईत ५ वॉर्ड करण्यात आले आहेत. साताऱ्यातून शहराकडे येणाऱ्या काही वॉर्डांमध्ये बदल केला आहे. शहरातील तीन वॉर्डांचे आपोआप तुकडे झाले आहेत. शंभर टक्के हे वॉर्ड गायब झालेले नाहीत. दुसऱ्या वॉर्डांची हद्द त्यांना जोडण्यात आल्याचेही सूत्रांनी नमूद केले.

खुल्या प्रवर्गातील वॉर्डांवर आरक्षण२०१५ मध्ये खुल्या प्रवर्गात असलेले बहुतांश वॉर्ड यंदा आरक्षणात जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. २२ वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात येतील. दोन वॉर्ड एस.टी. प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येतील. ११५ वॉर्डांच्या अनुषंगाने ५० टक्के महिला आरक्षणही राहणार आहे. त्यात ओबीसी महिलांचाही समावेश राहील.

दिग्गज मंडळींना मोठा धक्कामनपात मागील १५ ते २० वर्षांपासून सतत निवडून येणाऱ्या काही दिग्गज मंडळींना यंदा धोका निर्माण झाला आहे. त्यांना आपल्या हक्काचे वॉर्ड गमवावे लागणार आहेत. पर्यायी वॉर्डांमध्ये त्यांना निवडणूक लढवावी लागेल. काही दिग्गज मंडळींनी सातारा-देवळाईत जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग