शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

एक हजार पानांच्या महापालिका वॉर्ड रचनेचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2020 19:32 IST

एप्रिल २०२० मध्ये मनपाची निवडणूक घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहापालिकेत प्रतीक्षा सोडतीची  काही वॉर्डांच्या रचना बदलल्या

औरंगाबाद : शहरातील ११५ वॉर्डांची नवीन रचना करण्यात आली आहे. सोमवारी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांच्या समितीने वॉर्ड रचनेचा सविस्तर अहवाल राज्य निवडणूक आयोगाला सादर केला. एक हजार पानांचा हा अहवाल असून, लवकरच आयोग मनपाला आरक्षणाची सोडत घेण्याचा कार्यक्रम देणार आहे. नवीन वॉर्ड रचनेत काही मोजक्याच वॉर्डांची रचना बदलण्यात आली आहे. उर्वरित वॉर्ड जशास तसे ठेवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

एप्रिल २०२० मध्ये मनपाची निवडणूक घेण्यात येणार आहे. अगोदर राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मनपाने प्रभाग पद्धतीची तयारी केली. राज्यात नव्याने आलेल्या महाविकास आघाडी सरकारने प्रभाग पद्धत रद्द केली. त्यामुळे महापालिकेची निवडणूक जुन्या वॉर्ड पद्धतीनेच घेण्यात येणार आहे. मागील काही दिवसांपासून मनपाचे अधिकारी, कर्मचारी वॉर्ड रचनेचे काम करीत होते. त्यांनी मागील आठवड्यात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांच्या समितीसमोर नवीन वॉर्ड रचनेचा अहवाल सादर केला. समितीने या अहवालाचे बारकाईने निरीक्षण काही फेरबदलाच्या सूचना केल्या. त्यानंतर आज हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. तब्बल एक हजार पानांचा हा अहवाल असून, यामध्ये मोजक्याच वॉर्डांच्या हद्दीत बदल करण्यात आला आहे. सातारा देवळाईत ५ वॉर्ड करण्यात आले आहेत. साताऱ्यातून शहराकडे येणाऱ्या काही वॉर्डांमध्ये बदल केला आहे. शहरातील तीन वॉर्डांचे आपोआप तुकडे झाले आहेत. शंभर टक्के हे वॉर्ड गायब झालेले नाहीत. दुसऱ्या वॉर्डांची हद्द त्यांना जोडण्यात आल्याचेही सूत्रांनी नमूद केले.

खुल्या प्रवर्गातील वॉर्डांवर आरक्षण२०१५ मध्ये खुल्या प्रवर्गात असलेले बहुतांश वॉर्ड यंदा आरक्षणात जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. २२ वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात येतील. दोन वॉर्ड एस.टी. प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येतील. ११५ वॉर्डांच्या अनुषंगाने ५० टक्के महिला आरक्षणही राहणार आहे. त्यात ओबीसी महिलांचाही समावेश राहील.

दिग्गज मंडळींना मोठा धक्कामनपात मागील १५ ते २० वर्षांपासून सतत निवडून येणाऱ्या काही दिग्गज मंडळींना यंदा धोका निर्माण झाला आहे. त्यांना आपल्या हक्काचे वॉर्ड गमवावे लागणार आहेत. पर्यायी वॉर्डांमध्ये त्यांना निवडणूक लढवावी लागेल. काही दिग्गज मंडळींनी सातारा-देवळाईत जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकAurangabadऔरंगाबादElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग