शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
"जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

आयुक्त शहरात नसल्याने रस्त्यांची कामे संथगतीने; दिरंगाई विरोधात खंडपीठात जनहित याचिका दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 17:26 IST

जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी महापालिका प्रशासनातर्फे तोंडी निवेदन

औरंगाबाद : शहरातील ३० रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी १०० कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. ४ डिसेंबर २०१८ रोजी या कामांचा कार्यादेश (वर्क आॅर्डर) देण्यात आला होता. हे काम पूर्ण करण्याचा कालावधी एक वर्षाचाच होता. या रस्त्यांची कामे पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मनपा आयुक्तांची राहील, असेही खंडपीठाने २८ नोव्हेंबर २०१८ रोजीच्या आदेशात बजावले होते. मात्र, अद्याप या रस्त्यांची कामे पूर्ण झाली नसल्याची बाब गुरुवारी (दि.२८) जनहित याचिकेच्या सुनावणीवेळी समोर आली. 

ही कामे वेळेत पूर्ण का झाली नाहीत, अशी विचारणा न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. ए.एम. किलोर यांच्या खंडपीठाने केली असता प्रदीर्घ काळापासून मनपा आयुक्त शहरात नसल्यामुळे ही कामे संथगतीने होत असल्याचे मनपातर्फे तोंडी सांगण्यात आले. महापालिकेने खंडपीठात शपथपत्र दाखल करून शहरातील १०० कोटींच्या निधीतून होत असलेल्या ३० व्हाईट टॉपिंग रस्त्यांपैकी ६ रस्त्यांचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याचे आणि १९ रस्त्यांचे काम चालू असल्याचे आणि ५ रस्त्यांचे काम सुरू झाले नसल्याची माहिती दिली. शपथपत्रासोबत रस्त्यांच्या कामांचा तक्ता जोडण्यात आला. त्यात जवळपास १२ रस्त्यांचे काम ९५ टक्के झाल्याचे नमूद केले होते. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. पार्टी इन पर्सन रूपेश जैस्वाल यांनी रस्त्यांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची विनंती केली.

ही विनंती मान्य करून खंडपीठाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली ‘थर्ड पार्टी इन्स्पेक्शन कमिटी’ स्थापन करण्याचा, तसेच या कमिटीने वरील ३० रस्त्यांच्या कामांची पाहणी करून १० दिवसांत अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. अहवालाची एक प्रत महापालिकेला द्यावी. प्रत मिळाल्यापासून महापालिकेने ४ दिवसांत त्यांचे म्हणणे शपथपत्राद्वारे सादर करण्याचा आदेश खंडपीठाने दिला. याचिकेची पुढील सुनावणी १२ डिसेंबर रोजी होणार आहे. पार्टी इन पर्सन अ‍ॅड. रूपेश जैस्वाल यांनी स्वत: बाजू मांडली. पालिकेच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, रेल्वेच्या वतीने अ‍ॅड. मनीष नावंदर, राज्य महामार्ग मंडळाच्या वतीने अ‍ॅड. दीपक मनूरकर, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे अ‍ॅड. श्रीकांत अदवंत यांनी काम पाहिले. याचिकेवर १२ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी होईल.

शिवाजीनगर भुयारी मार्गाचा मुद्दाशिवाजीनगर येथे भुयारी मार्ग करण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. मात्र, या कामाच्या बैठकांना पालिका अधिकारी हजर राहत नसल्याची बाब याचिकाकर्ते अ‍ॅड. जैस्वाल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. शिवाजीनगर येथील भुयारी मार्गासाठी आजूबाजूच्या १८०० चौरस मीटर जागेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आल्याचे प्रमाणपत्र महापालिकेच्या वतीने सादर करण्यात आले. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीAurangabadऔरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ