शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
14
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
15
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
16
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
17
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
18
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
19
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार

औरंगाबादमधील कचराकोंडीला आयुक्तच जबाबदार; महापौरांचा हल्ला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 2:49 PM

शहरातील कचराकोंडीला फक्त आणि फक्त महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर एकमेव जबाबदार असून, मागील पाच महिन्यांमध्ये त्यांनी कागदी घोडे नाचविण्यातच वेळ वाया घालविला. एकही  ठोस निर्णय घेण्यास आयुक्त तयार नाहीत, असा जोरदार प्रहार महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला. 

औरंगाबाद : शहरातील कचराकोंडीला फक्त आणि फक्त महापालिका आयुक्त डी.एम. मुगळीकर एकमेव जबाबदार असून, मागील पाच महिन्यांमध्ये त्यांनी कागदी घोडे नाचविण्यातच वेळ वाया घालविला. एकही  ठोस निर्णय घेण्यास आयुक्त तयार नाहीत, असा जोरदार प्रहार महापौर नंदकुमार घोडेले यांनी शुक्रवारी नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासमोर केला. कचराकोंडीमुळे उद्या शहरात काही झाल्यास मी जबाबदार राहणार नाही, असे विधान मनपा आयुक्तांनी केले. म्हैसकर यांनी मनपा आयुक्तांना ठणकावत सांगितले की, जबाबदारीपासून असे अजिबात पळता येणार नाही. आयुक्त म्हणून सर्वस्वी जबाबदारी तुमचीच आहे.

नारेगावच्या आंदोलकांनी मनपाला चार महिन्यांचा वेळ दिला. या चार महिन्यांत प्रशासन म्हणून आयुक्तांनी ठोस निर्णय घेतला नाही. १६ फेब्रुवारीपासून नारेगावच्या आंदोलकांनी कोंडी केली. २२ दिवसांपासून शहरात हजारो टन कचरा रस्त्यावर पडून आहे. प्रशासन म्हणून काय पाऊल उचलले हे जरा आयुक्तांना विचारा, अशा शब्दांत महापौरांनी आघात केला. आणीबाणी कायद्याचा वापर करून कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या छोट्या मशीन खरेदी करा म्हटले तरी आयुक्त ऐकत नाहीत. लोकप्रतिनिधींच्या आदेशाचे आयुक्तांना पालन करायचे नसेल तर मी बैठक सोडून जाण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगताच प्रकरण गंभीर वळणार आले. ‘स्थायी’चे सभापती गजानन बारवाल, उपमहापौर विजय औताडे यांनीही स्मार्ट सिटीच्या निधीतून ई-रिक्षा, डस्टबीन खरेदीसही आयुक्त तयार नसल्याचे सांगितले. 

मुगळीकर यांनी म्हैसकर यांच्यासमोर आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा वाचून दाखविताना कचर्‍यामुळे उद्या शहरात काही झाल्यास माझी जबाबदारी राहणा    र नाही, असे सांगून टाकले. त्यांच्या या विधानावर म्हैसकर यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. असे विधान करणे चुकीचे आहे. शेवटी आयुक्त म्हणून ही सर्व जबाबदारी तुमचीच आहे. जबाबदारीतून असे पळता येत नाही,  असा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाAurangabadऔरंगाबाद