शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

दिलासादायक ! औरंगाबादी कांद्याला दिल्ली, ओडिशातून मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 17:27 IST

मंडईत किलोमागे ३ रुपये भाव वाढले 

ठळक मुद्देनिर्यातबंदीचा त्वरित परिणाम नाहीजिल्ह्यात जुना कांदा शिल्लक 

औरंगाबाद : एकीकडे केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी लागू केली आहे, तर मुख्य बाजारपेठ लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी त्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. मात्र, औरंगाबाद जिल्ह्यातील जुन्या  कांद्याला दिल्ली, आंध्र प्रदेश व ओडिशा राज्यातून मागणी सुरू झाली आहे. यामुळे मंगळवारी जाधववाडीत कांदा किलोमागे ३ रुपयांनी महागला.

देशात कांद्याचे वाढते दर लक्षात घेऊन केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर अचानक बंदी घातली. या निर्णयाचा त्वरित परिणाम स्थानिक बाजारावर दिसून येईल, असे सांगितले जात होते. मात्र, जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवारी चक्क १०० किलोमागे ३०० रुपयांनी भाव वाढले.  रविवारी २०० ते २२०० रुपये प्रति १०० किलो विक्री होणार कांदा मंगळवारी २०० ते २५०० रुपयांना विकला जात होता. जिल्ह्यात जुना कांदा शिल्लक आहे. दिल्लीत हा कांदा ३५ ते ४० रुपये किलोपर्यंत विकला जात आहे.

येथील लासलगाव भागात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने जाधववाडीतून दिल्ली, आंध्र प्रदेश, ओडिशा या राज्यात ५ ट्रक कांदा रवाना झाला. १६ टन कांदा प्रत्येक ट्रकमध्ये भरला जातो. यासंदर्भात कांद्याचे होलसेल व्यापारी इसाखान यांनी सांगितले की, परराज्यात जाणारा कांदा ८ ते ९ महिने जुना आहे. येथून २५०० रुपये १०० किलोमागे आम्हाला भाव मिळतो. तिथे ३५ ते ४० रुपये किलोने कांदा विकला जातो. नवीन कांदा येण्यास अजून  एक ते दीड महिना बाकी आहे. निर्यातबंदीमुळे लासलगाव आदी ठकाणी कांद्याचे भाव घसरले; पण जाधववाडीत भाव वधारले. 

मंडईत १० ते ३० रुपये किलोने कांदा विक्रीभाजीमंडईमध्ये कांदा ३० रुपये किलोने विकला जात आहे, तर खराब कांदा १० रुपयांनी विकत आहे. हॉटेल, भजेविक्रेते, खानावळ, पाणीपुरी, भेळपुरीवाले १५ रुपये किलोपर्यंत कांदा खरेदी करतात, असे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले.  

टॅग्स :AurangabadऔरंगाबादonionकांदाFarmerशेतकरी