शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

चंद्रशेखर राव यांची राजू शेट्टींना साद; 'तुम्ही महाराष्ट्र सांभाळा' थेट ऑफरवर आज होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 12:14 IST

आज पैठण येथील राज्य कार्यकारणीच्या बैठकीत तेलंगणाचे मुख्रयमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या ऑफरवर चर्चा होणार आहे

औरंगाबाद: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सोबत काम करण्यासाठी साद घातली आहे. दरम्यान, चंद्रशेखर राव यांच्या ऑफरवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत आज चर्चा होणार आहे. तेलंगणाच्या भारत राष्ट्र समितीच्या राज्याच्या राजकारणात प्रवेशाने नवीन राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव यांच्या ऑफरवर स्वाभिमानी शेतकरी संघटना काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

तेलंगणातील सत्ताधारी पक्ष बीआरएसचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची देशव्यापी राजकारणाचा चेहरा बनण्याची महत्वाकांक्षा आहे. यामुळेच त्यांनी पक्षविस्ताराची सुरुवात महाराष्ट्रातून केली आहे. राव यांची नुकतीच नांदेडमध्ये सभा झाली. महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी त्यांनी आजीमाजी आमदार, खासदार आणि विविध पक्ष संघटनांसोबत चर्चा केली आहे. शेतकरी प्रश्नांवर बीआरएसचे राजकारण केद्रित आहे. महाराष्ट्रात राजकारण करायचे असेल तर शेतकरी प्रश्नांची जाण असणारा नेता राव यांना हवा आहे. यातूनच त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माही खासदार राजू शेट्टी यांना साद घातली आहे. तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, अशी थेट ऑफर शेट्टी यांना देण्यात आल्याची माहिती आहे. 

गेल्या महिन्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि राजू शेट्टी यांच्यात हैदराबादमध्ये एक बैठक झाली. शेतकरी प्रश्नांसोबत दोघांत राजकीय चर्चा देखील झाली. यावेळी 'तुम्ही महाराष्ट्र सांभाळा', अशी थेट ऑफर मुख्यमंत्री राव यांनी शेट्टी यांना दिली. मात्र, शेट्टींनी ही ऑफर नाकारली. मात्र, आज पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यभरातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. ज्यात आगामी पक्षाची वाटचाल, ध्येयधोरणांवर चर्चा होईल. यावेळी राव यांच्या ऑफरवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. 

थेट बीआरएस झेंडा नाही पण युतीची शक्यता?बीआरएसकडून आम्हाला ऑफर आली असून, आम्ही ती नाकारली आहे. आम्हाला चळवळीतच राहून काम करायचे असल्याचे चंद्रशेखर राव यांना सांगितल्याचे शेट्टी यांनी ऑफरवर बोलताना सांगितले. इतर पक्षात जाणार नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बीआरएसमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरी प्रश्नांवर बीआरएसने तेलंगणात जम बसवला आहे. तसेच देशात शेतकऱ्यांचे कैवारी अशी प्रतिमा राव करू इच्छित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर बोलणाऱ्या स्वाभिमानी आणि बीआरएस यांच्यात पुढे ठरते हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRaju Shettyराजू शेट्टीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावMaharashtraमहाराष्ट्र