शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

चंद्रशेखर राव यांची राजू शेट्टींना साद; 'तुम्ही महाराष्ट्र सांभाळा' थेट ऑफरवर आज होणार निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 12:14 IST

आज पैठण येथील राज्य कार्यकारणीच्या बैठकीत तेलंगणाचे मुख्रयमंत्री चंद्रशेखर राव यांनी दिलेल्या ऑफरवर चर्चा होणार आहे

औरंगाबाद: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सोबत काम करण्यासाठी साद घातली आहे. दरम्यान, चंद्रशेखर राव यांच्या ऑफरवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत आज चर्चा होणार आहे. तेलंगणाच्या भारत राष्ट्र समितीच्या राज्याच्या राजकारणात प्रवेशाने नवीन राजकीय समीकरणे उदयास येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर राव यांच्या ऑफरवर स्वाभिमानी शेतकरी संघटना काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष आहे. 

तेलंगणातील सत्ताधारी पक्ष बीआरएसचे सर्वेसर्वा मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची देशव्यापी राजकारणाचा चेहरा बनण्याची महत्वाकांक्षा आहे. यामुळेच त्यांनी पक्षविस्ताराची सुरुवात महाराष्ट्रातून केली आहे. राव यांची नुकतीच नांदेडमध्ये सभा झाली. महाराष्ट्रात पक्ष विस्तारासाठी त्यांनी आजीमाजी आमदार, खासदार आणि विविध पक्ष संघटनांसोबत चर्चा केली आहे. शेतकरी प्रश्नांवर बीआरएसचे राजकारण केद्रित आहे. महाराष्ट्रात राजकारण करायचे असेल तर शेतकरी प्रश्नांची जाण असणारा नेता राव यांना हवा आहे. यातूनच त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माही खासदार राजू शेट्टी यांना साद घातली आहे. तुम्ही महाराष्ट्र सांभाळा, अशी थेट ऑफर शेट्टी यांना देण्यात आल्याची माहिती आहे. 

गेल्या महिन्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आणि राजू शेट्टी यांच्यात हैदराबादमध्ये एक बैठक झाली. शेतकरी प्रश्नांसोबत दोघांत राजकीय चर्चा देखील झाली. यावेळी 'तुम्ही महाराष्ट्र सांभाळा', अशी थेट ऑफर मुख्यमंत्री राव यांनी शेट्टी यांना दिली. मात्र, शेट्टींनी ही ऑफर नाकारली. मात्र, आज पैठणमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्यभरातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. ज्यात आगामी पक्षाची वाटचाल, ध्येयधोरणांवर चर्चा होईल. यावेळी राव यांच्या ऑफरवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. 

थेट बीआरएस झेंडा नाही पण युतीची शक्यता?बीआरएसकडून आम्हाला ऑफर आली असून, आम्ही ती नाकारली आहे. आम्हाला चळवळीतच राहून काम करायचे असल्याचे चंद्रशेखर राव यांना सांगितल्याचे शेट्टी यांनी ऑफरवर बोलताना सांगितले. इतर पक्षात जाणार नसल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि बीआरएसमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेतकरी प्रश्नांवर बीआरएसने तेलंगणात जम बसवला आहे. तसेच देशात शेतकऱ्यांचे कैवारी अशी प्रतिमा राव करू इच्छित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर बोलणाऱ्या स्वाभिमानी आणि बीआरएस यांच्यात पुढे ठरते हे पाहणे औत्सुक्याचे ठरत आहे. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRaju Shettyराजू शेट्टीK Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावMaharashtraमहाराष्ट्र