शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
3
पाकिस्तानची खोटी बडबड! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये गुडघे टेकले, आता परदेशात जाऊन मारतायत थापा
4
उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी विरोधकांकडून उमेदवार जाहीर; सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती रिंगणात
5
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
6
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
7
GST बदलाच्या घोषणेनंतर 'या' ५ शेअर्समध्ये होणार मोठी वाढ? ब्रोकरेजकडून खरेदीचा सल्ला!
8
दिलीप प्रभावळकरांचा रोमांचक 'दशावतार'; कोकणातल्या मातीत घडणाऱ्या सिनेमाचा अंगावर काटा आणणारा ट्रेलर
9
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
10
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
11
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
12
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
13
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
14
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
15
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
16
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
17
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
18
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
19
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
20
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?

ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर; रब्बीच्या पिकांना बसतोय फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 17:59 IST

औषध फवारणीच्या खर्चात वाढ झाली असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे

- जयेश निरपळगंगापूर (औरंगाबाद) : अतिवृष्टीमुळे खरिपाची पिके हातून गेली असताना त्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बीची पेरणी केली. पिके बहरलेली आहेत. मात्र, मागील चार ते पाच दिवसांपासून अनेक भागांत ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना फटका बसत आहे. त्यातच रोगराईमुळे औषध फवारणीचा खर्च वाढल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

मागील दोन वर्षांपासून बरसणाऱ्या जोरदार पावसाने पाणीपातळी वाढली असून, विहिरींत पाणीसाठादेखील वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बीची जोरदार तयारी केली आहे. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. थंडी गायब झाल्याने गहू, हरभरा, ज्वारी, रब्बीचा कांदा आदी पिकांवर रसशोषक किडी वाढल्याने शेतकरीवर्गाला चिंता भेडसावत आहे. तालुक्यात रब्बीच्या ६९ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून कांदा व गहू पिकांच्या पेऱ्यात वाढ झाली आहे, तर ज्वारीच्या क्षेत्रात घट झाली असल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. भरपूर पाऊस झाल्याने थंडीचे प्रमाण जास्त राहील, असा शेतकऱ्यांचा अंदाज होता. मात्र, दोन-तीन दिवसांपासून थंडी गायब झाल्याने उगवलेल्या रब्बी पिकांची वाढ खुंटली असून ती रसशोषक किडींच्या विळख्यात सापडली आहेत. त्यामुळे हंगाम पूर्व (आरास) पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर औषध फवारणी करण्याची वेळ आली आहे. जास्तीची थंडी पडल्यास पिकांना लाभ होणार आहे. ढगाळ वातावरणामुळे पाऊस पडतो की काय, अशी भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

बळीराजाच्या खर्चात वाढढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध किडींचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजाला औषध फवारणीसाठी जादा खर्च करावा लागत आहे. आधीच बाजारभाव नसल्याने उत्पादन खर्चही निघत नाही. त्यातच औषध फवारणीचा खर्च अधिक येत असल्याने बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.

उत्पादनात घट होण्याची शक्यताहवामानामुळे गहू पिकावर रोग किडीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. मावा, तुडतुडे तसेच गव्हाचा उतारा कमी प्रमाणात आहे. त्यामुळे उत्पादनात वीस ते पंचवीस टक्क्यांनी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- सुरेश दंडे, शेतकरी, बाबरगाव.

रब्बीची तालुक्यात झालेली लागवड१) ज्वारी- ४५६९ हेक्टर२) गहू- ५२१८३) मका- १६२९४) हरबरा- ४५६९५) रब्बी कांदा- ११३०६) चारा पिके- १७१७७) भाजीपाला- २२०७

टॅग्स :AurangabadऔरंगाबादFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस