शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

औरंगाबाद महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी काम बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:19 IST

महापालिकेने वेगवेगळ्या संस्थांमार्फत एक हजारपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे महापालिका : पाच महिन्यांपासून पगारच नाही

औरंगाबाद : महापालिकेने वेगवेगळ्या संस्थांमार्फत एक हजारपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. बचतगट, रिक्षा कंत्राटदारांना कोट्यवधी रुपये मनपाकडून अदा करण्यात येत आहेत. महापालिकेच्या लेखा विभागाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने एक हजार कर्मचारी सोमवार २४ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. या कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यास सर्वाधिक फटका पाणीपुरवठ्याला बसणार आहे.

मागील दोन-तीन वर्षांमध्ये महापालिकेत असंख्य पदे रिक्त झाली आहेत. रिक्त पदांवर काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली आहे. मनपा अधिकारी व कर्मचाºयांच्या वाहनांवर कंत्राटी चालक, कचरा जमा करणाºया रिक्षांवर चालक, पाणी सोडण्यासाठी वॉर्डनिहाय कर्मचारी, सुरक्षारक्षक, संगणकचालक, कनिष्ठ अभियंते आदी वेगवेगळ्या कामांसाठी हे कर्मचारी नेमले आहेत. महापालिकेच्या विविध कामांचा डोलारा सध्या याच कर्मचाºयांवर अवलंबून आहे. मनपा दरमहिन्याला विविध संस्थांना पगार देते. संस्था या कर्मचाºयांना पगार करीत असते. मागील पाच महिन्यांपासून या कर्मचाºयांचा पगार मनपाने केला नाही. त्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. अगोदरच अत्यंत तुटपुंज्या पगारावर हे कर्मचारी काम करीत आहेत. त्यात पाच महिने पगार नाही, म्हणजे जगायचे कसे, असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत. मनपाने बचतगट, कचºयाच्या रिक्षाही याच कंत्राटी पद्धतीने नेमल्या आहेत. त्यांचा पगार दरमहिन्याला वेळेवर अदा करण्यात येत आहे. बचत गटाच्या कर्मचाºयांना आता १९ हजार रुपये प्रत्येकी पगार देण्यात येत आहे. बचत गटाच्या कर्मचाºयांची संख्या जवळपास ३५० आहे.

सोमवार २४ सप्टेंबरपासून कंत्राटी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यास सर्वाधिक फटका पाणीपुरवठ्याला बसणार आहे. त्या पाठोपाठ कच-याच्या रिक्षा, अधिकारी व कर्मचाºयांची वाहने एकाच ठिकाणी उभी राहतील. दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, कंत्राटी कर्मचा-यांना पगार वेळेवर मिळाला पाहिजे. प्रशासन नियोजन करीत आहे. आंदोलनाची वेळ कोणावरही येणार नाही. यासंदर्भात योग्य तोडगा काढण्यात येईल.

पर्यटन केंद्रही बंद पडणाररेल्वेस्टेशन येथे मनपाने मोठा गाजावाजा करून पर्यटन केंद्र सुरू केले. या केंद्रात विद्यापीठाच्या एमटीए विभागातील पाच विद्यार्थ्यांची नेमणूक केली आहे. या विद्यार्थ्यांना मागील नऊ महिन्यांपासून मनपाने मानधन अदा केलेले नाही. आता या विद्यार्थ्यांची सहनशीलता संपली आहे. या विद्यार्थ्यांनी महापौरांकडे दोन दिवसांपूर्वी कामबंद आंदोलन सुरू करणार असल्याचे नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEmployeeकर्मचारीStrikeसंप