शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

औरंगाबाद महापालिकेतील कंत्राटी कर्मचारी काम बंद करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 22:19 IST

महापालिकेने वेगवेगळ्या संस्थांमार्फत एक हजारपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे.

ठळक मुद्दे महापालिका : पाच महिन्यांपासून पगारच नाही

औरंगाबाद : महापालिकेने वेगवेगळ्या संस्थांमार्फत एक हजारपेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी नेमले आहेत. या कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यांपासून पगार देण्यात आला नसल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. बचतगट, रिक्षा कंत्राटदारांना कोट्यवधी रुपये मनपाकडून अदा करण्यात येत आहेत. महापालिकेच्या लेखा विभागाकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने एक हजार कर्मचारी सोमवार २४ सप्टेंबरपासून कामबंद आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. या कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन सुरू केल्यास सर्वाधिक फटका पाणीपुरवठ्याला बसणार आहे.

मागील दोन-तीन वर्षांमध्ये महापालिकेत असंख्य पदे रिक्त झाली आहेत. रिक्त पदांवर काम करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली आहे. मनपा अधिकारी व कर्मचाºयांच्या वाहनांवर कंत्राटी चालक, कचरा जमा करणाºया रिक्षांवर चालक, पाणी सोडण्यासाठी वॉर्डनिहाय कर्मचारी, सुरक्षारक्षक, संगणकचालक, कनिष्ठ अभियंते आदी वेगवेगळ्या कामांसाठी हे कर्मचारी नेमले आहेत. महापालिकेच्या विविध कामांचा डोलारा सध्या याच कर्मचाºयांवर अवलंबून आहे. मनपा दरमहिन्याला विविध संस्थांना पगार देते. संस्था या कर्मचाºयांना पगार करीत असते. मागील पाच महिन्यांपासून या कर्मचाºयांचा पगार मनपाने केला नाही. त्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. अगोदरच अत्यंत तुटपुंज्या पगारावर हे कर्मचारी काम करीत आहेत. त्यात पाच महिने पगार नाही, म्हणजे जगायचे कसे, असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत. मनपाने बचतगट, कचºयाच्या रिक्षाही याच कंत्राटी पद्धतीने नेमल्या आहेत. त्यांचा पगार दरमहिन्याला वेळेवर अदा करण्यात येत आहे. बचत गटाच्या कर्मचाºयांना आता १९ हजार रुपये प्रत्येकी पगार देण्यात येत आहे. बचत गटाच्या कर्मचाºयांची संख्या जवळपास ३५० आहे.

सोमवार २४ सप्टेंबरपासून कंत्राटी कर्मचा-यांनी कामबंद आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आंदोलनाला सुरुवात केल्यास सर्वाधिक फटका पाणीपुरवठ्याला बसणार आहे. त्या पाठोपाठ कच-याच्या रिक्षा, अधिकारी व कर्मचाºयांची वाहने एकाच ठिकाणी उभी राहतील. दरम्यान, महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, कंत्राटी कर्मचा-यांना पगार वेळेवर मिळाला पाहिजे. प्रशासन नियोजन करीत आहे. आंदोलनाची वेळ कोणावरही येणार नाही. यासंदर्भात योग्य तोडगा काढण्यात येईल.

पर्यटन केंद्रही बंद पडणाररेल्वेस्टेशन येथे मनपाने मोठा गाजावाजा करून पर्यटन केंद्र सुरू केले. या केंद्रात विद्यापीठाच्या एमटीए विभागातील पाच विद्यार्थ्यांची नेमणूक केली आहे. या विद्यार्थ्यांना मागील नऊ महिन्यांपासून मनपाने मानधन अदा केलेले नाही. आता या विद्यार्थ्यांची सहनशीलता संपली आहे. या विद्यार्थ्यांनी महापौरांकडे दोन दिवसांपूर्वी कामबंद आंदोलन सुरू करणार असल्याचे नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEmployeeकर्मचारीStrikeसंप