शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
2
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
3
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
4
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
5
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
6
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
7
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
8
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
9
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
10
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
11
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
12
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
13
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
14
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
15
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
16
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
17
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
18
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
19
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
20
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
Daily Top 2Weekly Top 5

बंद योजनांनी टाकली टंचाईत भर

By admin | Updated: August 26, 2014 01:51 IST

परभणी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत अजूनही २७० नळ योजना अपूर्ण आहेत़ सध्या टंचाईची स्थिती निर्माण झाली असून

परभणी : जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा योजनेंतर्गत अजूनही २७० नळ योजना अपूर्ण आहेत़ सध्या टंचाईची स्थिती निर्माण झाली असून, या योजना वेळेत कार्यान्वित झाल्या असत्या तर समस्या थोड्याफार प्रमाणात कमी झाली असती़ दुुष्काळी स्थितीने जिल्हा ग्रासला असताना दुसरीकडे नियोजनाच्या अभावामुळे देखील नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे़ ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न सुटावा, ग्रामस्थांची पाण्याची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने ग्रामीण पाणीपुरवठा योजना काम करते़ भारत निर्माण आणि राष्ट्रीय पेयजल योजनेतून पाणीपुरवठा योजना उभारल्या जातात़ या योजना उभारल्यानंतर त्या ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केल्या जातात़ जिल्ह्यात भारत निर्माण आणि राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ४०२ पाणीपुरवठा योजना मंजूर झाल्या होत्या़ त्यापैकी केवळ १३२ योजना आतापर्यंत पूर्ण झाल्या असून, २७० योजना अपूर्ण आहेत़ ग्रामीण भागात अनेक गावे अशी आहेत की ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे़ परंतु, नियोजनाचा अभाव असल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईसारख्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे़ सध्या जिल्ह्यामध्ये दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे़ जलस्त्रोत आटू लागले आहेत़ प्रमुख बंधारे, तलाव, विहिरी आणि हातपंपांचे पाणी तळ गाठू लागले आहे़ त्यामुळे पाणीटंचार्इंचा प्रश्न उग्र बनत चालला आहे़ ग्रामीण भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी योजना राबविण्यात आल्या़ परभणी तालुक्यात ७१ योजनांना मंजुरी मिळाली़ त्यापैकी केवळ २८ योजना पूर्ण झाल्या आहेत़ पूर्णा तालुक्यात ४८ योजनांपैकी १५, गंगाखेड तालुक्यात ५५ पैकी २०, जिंतूर तालुक्यात ५३ पैकी ६, पाथरी तालुक्यात २४ पैकी १४, सेलू तालुक्यात ४४ पैकी २४, पालम तालुक्यात ६२ पैकी ९, मानवत तालुक्यात २२ पैकी ९ आणि सोनपेठ तालुक्यात २३ पैकी केवळ ७ योजना पूर्णत्वाला गेल्या आहेत़ ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांचे उद्दिष्टय पूर्ण करण्यामध्ये सेलू तालुका आघाडीवर असल्याचे दिसते़ या तालुक्यासाठी ४४ योजना मंजूर झाल्या होत्या़ यापैकी २४ योजना पूर्ण झाल्या आहेत़ तर पालम, जिंतूर या तालुक्यांमध्ये ग्रामीण पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात मोठी अनास्था असल्याचे दिसते़ पालम तालुक्यात ६२ पैकी ९ तर जिंतूर तालुक्यात ५३ पैकी केवळ ६ योजना पूर्णत्वाला गेल्या आहेत़ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने संकेतस्थळावर दिलेल्या आकडेवारीतून ही माहिती स्पष्ट होते़ (प्रतिनिधी)जिल्ह्यामध्ये ४०२ पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली होती़ त्यापैकी केवळ १३२ योजनांची कामे पूर्ण झाली आहेत़ परंतु, अनेक योजनांची कामे अजूनही पूर्णत्वास गेलेली नाहीत़ परभणी तालुक्यामध्ये ४३ योजनांची कामे होणे बाकी आहेत़ पूर्ण तालुक्यात ३३, गंगाखेड तालुक्यात ३५, जिंतूर तालुक्यात ४७, पाथरी १०, सेलू २०, पालम ५३, मानवत १३ आणि सोनपेठ तालुक्यामध्ये १६ पाणीपुरवठा योजनांची कामे अजूनही अपूर्ण आहेत़ ही कामे वेळेत पूर्ण झाली असती तर पाणी प्रश्न सोडविण्यासाठी निश्चितच मदत झाली असती़