शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

'ब्लेम गेम बंद करा',क्रांती चौक उड्डाणपूलाच्या दुरुस्तीवरून हायकोर्टाने तिन्ही विभागांना फटकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 12:24 IST

रस्ते महामंडळ, सा. बां. विभाग आणि मनपाला त्वरित तोडग्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहेत

औरंगाबाद : औरंगाबादेतील क्रांती चौकामधील उड्डाण पुलाच्या देखभाल व दुरुस्तीबाबत परस्परांकडे बोट दाखवू नका. (ब्लेम गेम बंद करा) नेमकी जबाबदारी कोणाची; या वादावर त्वरित तोडगा काढा, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला आणि न्या. एस. जी. दिगे यांनी बुधवारी रस्ते महामंडळ, मनपा आणि सा. बां.ला दिले. पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर होणार आहे.सुनावणीवेळी वरील तिन्ही विभाग पुलाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी झटकून परस्परांकडे बोट दाखवू लागले असता खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

क्रांती चौकामधील उड्डाण पुलावर आरपार फट पडली असून, त्यामुळे मोठी हानी होऊ शकते, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने ३ जानेवारीला छायाचित्रासह छापले होते. शहरातील रस्ते व उड्डाणपुलांच्या दुरवस्थेबाबत जनहित याचिका दाखल केलेेले ॲड. रूपेश जैस्वाल यांनी पाहणी केली. पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठमोठ्या फटी पडल्याबाबत ॲड. जैस्वाल यांनी दिवाणी अर्ज दाखल करून ही बाब मंगळवारी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली होती.

क्रांती चौकातील उड्डाणपूल रस्ते महामंडळाने २०१७ ला बांधून मनपा सा. बां. विभागाकडे हस्तांतरित केला होता. तो शहरातील सर्वाधिक रहदारीचा पूल असून, या पुलावरून दररोज सरासरी १० हजार वाहने ये-जा करतात. संभाव्य अपघात व हानी टाळण्यासाठी पुलाची दुरुस्ती तत्काळ होणे आवश्यक आहे. दुर्दैवाने जीवित हानी घडल्यास अथवा अपघातात कोणी अवयव गमावले तर ते आर्थिक भरपाईने भरून निघू शकत नाही. त्वरित पुलाची दुरुस्ती करण्याचे निर्देश द्यावेत, तोपर्यंत रहदारी इतरत्र वळवावी, अशी विनंती ॲड. जैस्वाल यांनी केली होती. त्यावर बुधवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. सुनावणी दरम्यान प्रतिवादी जबाबदारीची टोलवाटोलवी करीत असल्यामुळे खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्देश दिले.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठPublic Transportसार्वजनिक वाहतूकAurangabadऔरंगाबाद