शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

संप स्थगितीनंतर पडसाद; कर्मचारी संघटनांमध्ये खदखद, सोशल मीडियावर संदेशांचा धुमाकूळ

By विकास राऊत | Updated: March 22, 2023 13:20 IST

उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यांतून कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यामुळे उद्रेक केला आहे.

छत्रपती संभाजीनगर : जुन्या पेन्शनच्या मागणीवरून सात दिवस एकजुटीने सुरू असलेला संप सोमवारी सायंकाळी अचानक मागे घेण्यात आल्याने कर्मचारी संघटनांमध्ये सोशल मीडियातून खदखद व्यक्त होत आहे. संपावरून सरकारी कर्मचारी संघटनांमध्ये फूट पडली आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यांतून कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्यामुळे उद्रेक केला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोशल मीडियातून संप मागे घेतल्याप्रकरणी विश्वासघात झाल्याची टीका सुरू आहे. असे असले तरी जिल्ह्यात, तालुक्यात सर्व कर्मचारी वेळेत रुजू झाल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. संघटनेचे पदाधिकारी सोशल मीडियातून टीका करीत असले तरी कामावर रुजू झाल्याचे आढळले. विभाग पातळीवर कुणाशीही चर्चा न करता राज्य पदाधिकाऱ्यांनी परस्पर शासनासोबत संपकऱ्यांच्या मागण्यांबाबत बोलणी केल्याने नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हेमंत साळवी यांचा एसएमएस संघटनांच्या ग्रुपवर फिरत असून, त्यात म्हटले आहे की, सरकारी-निमसरकारी कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने जाहीर केलेला बेमुदत संप सोमवारी मुख्यमंत्र्यांबरोबर समितीच्या सदस्यांत चर्चा होऊन मागे घेण्यात आला. जुनी पेन्शन योजना लागू करा, यासह इतर अठरा मागण्यांवर चर्चा होऊन समन्वय समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी सोमवारी अचानक माध्यमांसमोर येऊन बेमुदत संप स्थगित केल्याचे जाहीर केले. विविध खातेनिहाय संघटना, विशेषतः जिल्हा महसूल संघटना व विभागीय महसूल समन्वय समिती पदाधिकाऱ्यांनी संप मागे घेण्याच्या निर्णयास विरोध केला. अनेक जिल्हा संघटनांनी संपातून माघार घेण्याचा निर्णय मान्य न करता बेमुदत संप चालू ठेवण्याची मागणी केली. काटकर यांचा बेमुदत संप मागे घेण्याचा निर्णय संशयास्पद असल्याने त्यांचा निषेध करून यापुढे मध्यवर्ती संघटनेच्या आंदोलनात सहभागी व्हायचे की नाही, याबद्दल राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेऊ.

सोशल मीडियातून विरोधराज्य मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. देवीदास जरारे यांनी सांगितले, सोशल मीडियातून विरोधाचे एसएमएस फिरत आहेत. असे असले तरी बहुतांश कर्मचारी कामावर रुजू झाले होते. आता संप करता येणार नाही. समन्वय समितीने चर्चा करूनच पाऊल उचलले आहे. नागरिकांसह प्रशासकीय कामे आणि अवकाळी नुकसानीचे पंचनामे देखील रखडले होते. त्यामुळे सामंजस्याची भूमिका घेतली असेल.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादStrikeसंप