शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

शहरातील राजकीय नेत्यांना हवी पदोन्नती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 17:19 IST

अराजकीय व्यासपीठावर अनेकांच्या मनातील इच्छा अखेर प्रकट

ठळक मुद्देएरव्ही नाही, नाही, म्हणणारे महापौर नंदकुमार घोडेले यांनीही व्यक्त केली इच्छा

औरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या पक्षांतील राजकीय मंडळींना विधानसभा निवडणुका जवळ येताच पदोन्नतीचे वेध लागले आहेत. मनातील सुप्त इच्छा रविवारी रात्री एका अराजकीय व्यासपीठावर अनेकांनी व्यक्त केलीच. उद्योगमंत्री अतुल सावे, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांना कॅबिनेट करण्याची मागणी करण्यात आली. त्यात संजय शिरसाटही मागे नव्हते. एरव्ही नाही, नाही, म्हणणारे महापौर नंदकुमार घोडेले यांनीही पदोन्नतीची इच्छा व्यक्त केलीच.

शहरातील बांधकाम व्यावसायिक क्रेडाई संघटनेचा पदग्रहण सोहळा रविवारी रात्री आयोजित केला होता. या कार्यक्रमात सर्वप्रथम संघटनेचे राज्याचे अध्यक्ष राजेंद्रसिंग जबिंदा यांनी राजकीय फोडणीला सुरुवात केली. त्यांनी आपल्या भाषणात उद्योग राज्यमंत्री अतुल सावे, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांना पुढच्या वेळेस कॅबिनेट मंत्री करावे, अशी मागणी ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे, भाजपच्या राष्ट्रीय नेत्या विजया रहाटकर यांच्याकडे केली. हाच धागा पुढे संजय शिरसाट यांनी आपल्या भाषणात पकडला. या दोघांचा पदोन्नतीचा विचार होतोय... माझा कोणीच विचार करीत नाही. जबिंदा पदोन्नत्यांची शिफारस करणार, हे अगोदर माहीत असते, तर मी उद्धव ठाकरे यांनाच कार्यक्रमाला बोलावले असते... हंशा... शिरसाट यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे, इम्तियाज जलील, चंद्रकांत खैरे’ असा उल्लेख करताच सभागृहात खसखस पिकली. 

शिरसाट यांच्यापाठोपाठ भाषणाची संधी महापौरांना मिळाली. लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहून विधानसभा नको रे बाबा म्हणणारे महापौरांच्या मनातील ओठांवर आलेच. राजेंद्रसिंग जबिंदा माझ्या पदोन्नतीबद्दल काहीच बोलले नाही... शेवटी पदोन्नतीच्या मुद्यावर विजया रहाटकर म्हणाल्या की, काम करणाऱ्यांना आपोआप संधी मिळत असते. अतुल सावे यांनीही चिंता करू नका, होईल प्रमोशन, असे म्हणून विषयाला पूर्णविराम दिला.

जलील-खैरे यांच्यात कलगीतुरासभागृहात व्यासपीठावर सर्व विराजमान झाल्यानंतर माजी खा. चंद्रकांत खैरे यांचे आगमन झाले. खा. इम्तियाज जलील यांच्या बाजूला एक खुर्ची रिकामी होती. आ. दानवे यांनी खैरेंना जलील यांच्या बाजूला बसण्याचा इशारा केला. खैरे यांनी नकार देत अंबादास दानवे यांना बाजूला सरकवून खुर्चीवर बसणे पसंत केले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या. इम्तियाज जलील यांनी आपल्या भाषणात शहराच्या विकासासाठी अगोदर महापालिका दुरुस्त करा, प्रश्न आपोआप सुटतील, असे नमूद केले. सर्वांनी एकत्र यावे, काम करावे, अशी माझी खूप इच्छा आहे. मी प्रयत्न करतोय (खैरे यांच्याकडे पाहत) लोक दूर पळू लागले आहेत. मी जवळ करतोय, ते लांब पळत आहेत. रात्र गेली दिवस उगवला. आता सर्व काही विसरायला हवे... असे आवाहन करताच सभागृहात हंशा पिकला.

खैरेंनी वाचला विकास कामांचा पाढाचंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात नेहमीप्रमाणे मी आजपर्यंत या शहरासाठी काय काय केले, याचा पाढाच वाचला. मनपाला कोणी दोष दिला, तर ते मान्य करणार नाही, समांतरची योजना आणली, भूमिगत आणली. प्रत्येक योजनेवर टीका करून अयशस्वी करण्याचा प्रयत्न होतो. आम्ही मतांची खंडणी मागतो, पैशांची नाही. यंदा तुम्ही (बिल्डर) विसरले... असे म्हणताच सभागृहात जोरदार हंशा पिकला. मागील ३० वर्षांमध्ये मी जे केले, तसे काम इतरांनी (जलील) करून दाखवावे, असे आवाहनही त्यांनी केले. आजही मला तीच किंमत आहे, असा दावा खैरे यांनी केला.

टॅग्स :Atul Saveअतुल सावेSanjay Sirsatसंजय सिरसाटAurangabadऔरंगाबाद