शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कचरा बिघडवणार शहराचे आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:34 IST

शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान २ ते ३ हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचऱ्यापासून आता प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान २ ते ३ हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचऱ्यापासून आता प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. रस्त्यांवरील कचरा नेमका कुठे नेऊन टाकायचा हा महापालिकेसाठी सर्वात मोठा प्रश्न आहे. हर्सूल, पडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथे कचरा टाकण्यास नागरिकांकडून प्रचंड विरोध होत आहे. मागील दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी येत असल्याने कच-यापासून रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.शहरात दररोज ३५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. ११५ वॉर्डातील फक्त ३० वॉर्डांमध्ये ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यात येत होती. आता पावसाळा सुरू झाल्यावर ही प्रक्रियाही थांबणार आहे. ३० एप्रिल रोजी महापालिकेने शहरातील संपूर्ण कचरा उचलला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शब्द दिल्यामुळे हा कचरा उचलण्यात आला होता. मागील ४० दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील कचरा महापालिकेने उचलला नाही. त्यामुळे जिकडे तिकडे कच-याचे मोठे डोंगर दिसून येत आहेत. उन्हाळ्यामुळे या कच-यातून दुर्गंधी सुटत नव्हती. शिवाय मनपाचे हुशार कर्मचारी कच-याला आग लावून मोकळे होत होते. आता ओल्या कच-याला आग लावणे अशक्य आहे. त्यामुळे कचरा जिकडे तिकडे दिसून येत आहे. दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. कचरा ओला होऊन दुर्गंधीही सुटली आहे. ज्याठिकाणी कचºयाचे ढिगार साचले आहेत, तेथील नागरिकांना दुर्गंधीचा बराच त्रास सहन करावा लागतो. मध्यवर्ती जकात नाका येथे मनपाने बराच कचरा आणून टाकला आहे. या भागात राहणाºया नागरिकांना ऐन रमजान महिन्यात नरकयातना सहन कराव्यात लागत आहेत. या कचºयावर कोणतीही प्रक्रिया करण्यात येत नाही. हर्सूल, पडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथे कचरा टाकण्यास विरोध करण्यात येतो. शहरातील कचरा उचलून कुठे ठेवावा हा सर्वात मोठा प्रश्न प्रशासनाला आहे.निविदा लालफितीतशहरातील ९ झोनमध्ये कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन खरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ३ कोटी रुपयांची ही यंत्रणा आहे. मागील १५ दिवसांपासून महापालिका या निविदाच उघडण्यास तयार नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका