शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
5
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
6
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
7
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
8
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
9
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
10
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
11
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
12
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
13
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
14
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
15
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
16
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
17
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
18
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
19
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
20
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?

कचरा बिघडवणार शहराचे आरोग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 01:34 IST

शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान २ ते ३ हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचऱ्यापासून आता प्रचंड दुर्गंधी सुटली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील प्रमुख रस्त्यांवर किमान २ ते ३ हजार मेट्रिक टन कचरा पडून आहे. या कचऱ्यापासून आता प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. रस्त्यांवरील कचरा नेमका कुठे नेऊन टाकायचा हा महापालिकेसाठी सर्वात मोठा प्रश्न आहे. हर्सूल, पडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथे कचरा टाकण्यास नागरिकांकडून प्रचंड विरोध होत आहे. मागील दोन दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी येत असल्याने कच-यापासून रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.शहरात दररोज ३५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. ११५ वॉर्डातील फक्त ३० वॉर्डांमध्ये ओल्या कचºयावर प्रक्रिया करण्यात येत होती. आता पावसाळा सुरू झाल्यावर ही प्रक्रियाही थांबणार आहे. ३० एप्रिल रोजी महापालिकेने शहरातील संपूर्ण कचरा उचलला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शब्द दिल्यामुळे हा कचरा उचलण्यात आला होता. मागील ४० दिवसांपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील कचरा महापालिकेने उचलला नाही. त्यामुळे जिकडे तिकडे कच-याचे मोठे डोंगर दिसून येत आहेत. उन्हाळ्यामुळे या कच-यातून दुर्गंधी सुटत नव्हती. शिवाय मनपाचे हुशार कर्मचारी कच-याला आग लावून मोकळे होत होते. आता ओल्या कच-याला आग लावणे अशक्य आहे. त्यामुळे कचरा जिकडे तिकडे दिसून येत आहे. दोन दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. कचरा ओला होऊन दुर्गंधीही सुटली आहे. ज्याठिकाणी कचºयाचे ढिगार साचले आहेत, तेथील नागरिकांना दुर्गंधीचा बराच त्रास सहन करावा लागतो. मध्यवर्ती जकात नाका येथे मनपाने बराच कचरा आणून टाकला आहे. या भागात राहणाºया नागरिकांना ऐन रमजान महिन्यात नरकयातना सहन कराव्यात लागत आहेत. या कचºयावर कोणतीही प्रक्रिया करण्यात येत नाही. हर्सूल, पडेगाव, चिकलठाणा आणि कांचनवाडी येथे कचरा टाकण्यास विरोध करण्यात येतो. शहरातील कचरा उचलून कुठे ठेवावा हा सर्वात मोठा प्रश्न प्रशासनाला आहे.निविदा लालफितीतशहरातील ९ झोनमध्ये कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी मशीन खरेदीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. ३ कोटी रुपयांची ही यंत्रणा आहे. मागील १५ दिवसांपासून महापालिका या निविदाच उघडण्यास तयार नाही.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका