स्वच्छतेच्या वारक-यांनी केले शहर स्वच्छ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 00:35 IST2017-10-07T00:35:32+5:302017-10-07T00:35:32+5:30
राज्याच्या पर्यटन राजधानीतील ४२ ठिकाणे स्वच्छतेच्या वारक-यांनी शुक्रवारी स्वच्छ केली. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत शहरात स्वच्छतेचे महाअभियान राबविण्यात आले.

स्वच्छतेच्या वारक-यांनी केले शहर स्वच्छ
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राज्याच्या पर्यटन राजधानीतील ४२ ठिकाणे स्वच्छतेच्या वारक-यांनी शुक्रवारी स्वच्छ केली. सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत शहरात स्वच्छतेचे महाअभियान राबविण्यात आले. या अभियानात शासकीय कर्मचा-यांसह शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग
नोंदविला.
पर्यटन स्थळांचा वारसा, संस्कृतीचे जतन करण्यासाठी स्वच्छतेला मोलाचे स्थान आहे. परिसर व आस्थापना कार्यालय स्वच्छ ठेवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. पर्यटन राजधानीला स्वच्छ सुंदर बनविण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी केले. शहागंज येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या अभियानाला सुरुवात झाली. शहागंज चौक येथून सिटी चौक, रंगारगल्ली मार्गे गुलमंडी या परिसरात विभागीय आयुक्तांनी सहभाग घेत स्वच्छतेबाबत प्रबोधनही केले.
डॉ. भापकर म्हणाले, पंतप्रधानांनी ‘स्वच्छता ही सेवा’ हा नारा दिला. राष्ट्रीय सेवा योजना, स्काऊट गाईड, महाविद्यालयीन, शालेय विद्यार्थी, नागरिक आणि शासनाच्या विविध कार्यालयांतील अधिकारी, कर्मचाºयांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेऊन श्रमदान केले. ज्या भागात श्रमदान केले तो भाग सहभागी झालेल्यांना दत्तक देऊन दर महिन्याला जनजागृतीच्या दृष्टिकोनातून मोहीम राबविण्यात येणार असल्याचे डॉ. भापकर यांनी सांगितले. ५ ते २५ आॅक्टोबरदरम्यान पर्यटन पर्व राबविण्यात येत असून, या पर्वाची सुरुवात स्वच्छता अभियानापासून झाली आहे. पुढील टप्प्यात उर्वरित ऐतिहासिक, पर्यटनस्थळांची स्वच्छता करण्यात येणार आहे. आजच्या मोहिमेत जवळपास लाखभर नागरिक, युवक-युवती, अधिकारी-कर्मचाºयांनी ४२ ठिकाणी स्वच्छता मोहिमेत श्रमदान केले. त्यांचे भापकर यांनी आभार मानले. या अभियानाचा समारोप गुलमंडी परिसरात झाला.
यावेळी उपायुक्त वर्षा ठाकूर, महेंद्र हरपाळकर, पारस बोथरा, अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे, माहिती संचालक देवेंद्र भुजबळ, पर्यटन विभागाचे व्यवस्थापक अण्णासाहेब शिंदे, वनाधिकारी वडस्कर यांच्यासह हिंदी विद्यालय, समाजकार्य महाविद्यालय, मराठा हायस्कूल, गुजराती विद्यालय, स्काऊट गाईडस्, शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी यांची उपस्थिती होती.