शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

मनपात नागरिक कमी दलाल जास्त येतात; त्यामुळे मी मुख्यालयात सहसा बसत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 19:20 IST

काही नागरिक मनपात येऊ शकत नाहीत. त्यामुळे मी स्वत: त्यांना भेटण्यासाठी जातो, असे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

औरंगाबाद : महापालिकेत सर्वसामान्य नागरिक समस्या घेऊन कमी येतात. दलालांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मी मुख्यालयात सहसा बसत नाही. काही नागरिक मनपात येऊ शकत नाहीत. त्यामुळे मी स्वत: त्यांना भेटण्यासाठी जातो, असे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बसून कचरा प्रश्न, समांतर, स्मार्ट सिटी आदी असंख्य प्रश्न हाताळण्यात वेळ गेला. यापुढे मी मुख्यालयातच जास्त वेळ बसण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महापालिका आयुक्त कार्यालयात थांबत नसल्याची नगरसेवकांसह सर्वसामान्यांचीही तक्रार आहे. नगरसेवक कैलास गायकवाड यांनी तर आयुक्त दाखवा, एक हजार रुपये मिळवा, अशी बक्षीस योजना जाहीर केली होती. असे का होत आहे, असा थेट प्रश्न आयुक्त डॉ. निपुण यांना विचारण्यात आला. आयुक्त म्हणाले की, नगरसेवक गायकवाड यांनी जाहीर केलेले बक्षीस दिले का? असा उलट प्रश्न आयुक्तांनी केला. महापालिकेत येणाºया नागरिकांची संख्या ठराविक आहे. त्यात काही दलालही असतात. त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असतो. नागरिकांनी मला भेटण्याऐवजी मी त्यांच्यात जाऊन चर्चा करतो. गेल्या काही दिवसांपासून कचरा, पाणी प्रश्न सोडविण्याच्या कामात व्यस्त होतो. 

उधळपट्टी थांबवावी लागेलमहापालिकेचा खर्च आणि उत्पन्न यात मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यासाठी मालमत्ता कर, नगररचना, मालमत्ता विभाग अधिक सक्षम करण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च थांबवावा लागेल. त्यासाठी काही कठोर निर्णयही वेळप्रसंगी घ्यावे लागतील. लेखा विभागाला दायित्व, त्यामध्ये सुरू असलेली कामे, झालेली कामे असे वर्गीकरण करून अहवाल देण्यास सांगितले असल्याचे डॉ. निपुण विनायक यांनी नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न