शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

मनपात नागरिक कमी दलाल जास्त येतात; त्यामुळे मी मुख्यालयात सहसा बसत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 19:20 IST

काही नागरिक मनपात येऊ शकत नाहीत. त्यामुळे मी स्वत: त्यांना भेटण्यासाठी जातो, असे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

औरंगाबाद : महापालिकेत सर्वसामान्य नागरिक समस्या घेऊन कमी येतात. दलालांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मी मुख्यालयात सहसा बसत नाही. काही नागरिक मनपात येऊ शकत नाहीत. त्यामुळे मी स्वत: त्यांना भेटण्यासाठी जातो, असे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बसून कचरा प्रश्न, समांतर, स्मार्ट सिटी आदी असंख्य प्रश्न हाताळण्यात वेळ गेला. यापुढे मी मुख्यालयातच जास्त वेळ बसण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महापालिका आयुक्त कार्यालयात थांबत नसल्याची नगरसेवकांसह सर्वसामान्यांचीही तक्रार आहे. नगरसेवक कैलास गायकवाड यांनी तर आयुक्त दाखवा, एक हजार रुपये मिळवा, अशी बक्षीस योजना जाहीर केली होती. असे का होत आहे, असा थेट प्रश्न आयुक्त डॉ. निपुण यांना विचारण्यात आला. आयुक्त म्हणाले की, नगरसेवक गायकवाड यांनी जाहीर केलेले बक्षीस दिले का? असा उलट प्रश्न आयुक्तांनी केला. महापालिकेत येणाºया नागरिकांची संख्या ठराविक आहे. त्यात काही दलालही असतात. त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असतो. नागरिकांनी मला भेटण्याऐवजी मी त्यांच्यात जाऊन चर्चा करतो. गेल्या काही दिवसांपासून कचरा, पाणी प्रश्न सोडविण्याच्या कामात व्यस्त होतो. 

उधळपट्टी थांबवावी लागेलमहापालिकेचा खर्च आणि उत्पन्न यात मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यासाठी मालमत्ता कर, नगररचना, मालमत्ता विभाग अधिक सक्षम करण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च थांबवावा लागेल. त्यासाठी काही कठोर निर्णयही वेळप्रसंगी घ्यावे लागतील. लेखा विभागाला दायित्व, त्यामध्ये सुरू असलेली कामे, झालेली कामे असे वर्गीकरण करून अहवाल देण्यास सांगितले असल्याचे डॉ. निपुण विनायक यांनी नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न