शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

मनपात नागरिक कमी दलाल जास्त येतात; त्यामुळे मी मुख्यालयात सहसा बसत नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 19:20 IST

काही नागरिक मनपात येऊ शकत नाहीत. त्यामुळे मी स्वत: त्यांना भेटण्यासाठी जातो, असे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.

औरंगाबाद : महापालिकेत सर्वसामान्य नागरिक समस्या घेऊन कमी येतात. दलालांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे मी मुख्यालयात सहसा बसत नाही. काही नागरिक मनपात येऊ शकत नाहीत. त्यामुळे मी स्वत: त्यांना भेटण्यासाठी जातो, असे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात बसून कचरा प्रश्न, समांतर, स्मार्ट सिटी आदी असंख्य प्रश्न हाताळण्यात वेळ गेला. यापुढे मी मुख्यालयातच जास्त वेळ बसण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महापालिका आयुक्त कार्यालयात थांबत नसल्याची नगरसेवकांसह सर्वसामान्यांचीही तक्रार आहे. नगरसेवक कैलास गायकवाड यांनी तर आयुक्त दाखवा, एक हजार रुपये मिळवा, अशी बक्षीस योजना जाहीर केली होती. असे का होत आहे, असा थेट प्रश्न आयुक्त डॉ. निपुण यांना विचारण्यात आला. आयुक्त म्हणाले की, नगरसेवक गायकवाड यांनी जाहीर केलेले बक्षीस दिले का? असा उलट प्रश्न आयुक्तांनी केला. महापालिकेत येणाºया नागरिकांची संख्या ठराविक आहे. त्यात काही दलालही असतात. त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असतो. नागरिकांनी मला भेटण्याऐवजी मी त्यांच्यात जाऊन चर्चा करतो. गेल्या काही दिवसांपासून कचरा, पाणी प्रश्न सोडविण्याच्या कामात व्यस्त होतो. 

उधळपट्टी थांबवावी लागेलमहापालिकेचा खर्च आणि उत्पन्न यात मोठी दरी निर्माण झाली आहे. त्यासाठी मालमत्ता कर, नगररचना, मालमत्ता विभाग अधिक सक्षम करण्याची गरज आहे. अनावश्यक खर्च थांबवावा लागेल. त्यासाठी काही कठोर निर्णयही वेळप्रसंगी घ्यावे लागतील. लेखा विभागाला दायित्व, त्यामध्ये सुरू असलेली कामे, झालेली कामे असे वर्गीकरण करून अहवाल देण्यास सांगितले असल्याचे डॉ. निपुण विनायक यांनी नमूद केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfundsनिधीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न