शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

शहराची पत मनपा पदाधिकाऱ्यांनी घालवली; स्वच्छ भारत अभियानात शहराचा क्रमांक घसरल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 17:43 IST

कचराकोंडी फोडण्यास महानगरपालिकेतील पदाधिकारी, कचरा व्यवस्थापन करणारे अधिकारी, महापौर आणि आयुक्त हे सर्वाधिक जबाबदार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देलोकमतच्या सर्वेक्षणात नागरिकांचे मतआयुक्तांनी दबावाखाली न येता धाडसी निर्णय घ्यावेत, अशी सूचनाही केली

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानात शहराचा क्रमांक १२८ वरून २२० वर घसरल्याने शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहराची पत घालविण्यास मनपाचे सर्व पदाधिकारी जबाबदार असल्याच्या भावना नागरिकांनी लोकमतने घेतलेल्या आॅनलाईन सर्वेक्षणात व्यक्त केल्या. शहराची पत गेलीच, शिवाय कचराकोंडी फोडण्यास महानगरपालिकेतील पदाधिकारी, कचरा व्यवस्थापन करणारे अधिकारी, महापौर आणि आयुक्त हे सर्वाधिक जबाबदार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

देशपातळीवरील स्वच्छ भारत अभियानात शहराच्या कामगिरीचे मूल्यांकन नुकतेच जाहीर करण्यात आले. यात शहराचा क्रमांक १२८ वरून २२० वर घसरला आहे. यामुळे नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी लोकमतने तात्काळ आॅनलाईन सर्वेक्षण घेतले. सर्वेक्षणात तीन प्रश्न विचारण्यात आले. यात २० ते ७५ वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला. क्रमवारीत घसरण झाल्याने शहराची पत गेली आहे का, या प्रश्नावर संताप व्यक्त करीत ९५.१ टक्के नागरिकांनी होय, असे मत नोंदवले. केवळ ४.९ टक्के नागरिकांनी यामुळे शहराची पत गेली नसल्याचे म्हटले आहे. 

शहराची कचराकोंडी फुटत नाही, यास जबाबदार कोण, या प्रश्नावर ३४.१ टक्के नागरिकांनी मनपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांस जबाबदार धरले आहे. २२ टक्के नागरिकांनी घन कचरा निर्मूलनाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांस जबाबदार धरले, १७. १ टक्के नागरिकांनी महापौर, तर १२.२ टक्के नागरिकांनी मनपा आयुक्त जबाबदार असल्याचे मत नोंदवले. ९.८ टक्के नागरिकांनी नगरसेवक, तर ४.९ टक्के नागरिकांनी यास शहरवासीय स्वत: जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

यासोबतच कचराकोंडी फोडण्यात आमदार, खासदार आणि सरकारचे दुर्लक्ष झाले आहे का? या प्रश्नावर तब्बल ९२.७ टक्के नागरिकांनी लोकप्रतिनिधींचे कचराकोंडी फोडण्यात साफ दुर्लक्ष झाले असल्याचे म्हटले आहे. २.४ टक्के नागरिकांनी नाही, २.४ टक्के नागरिकांनी काही प्रमाणात आणि २.५ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, अशी मते नोंदवली आहेत. 

बेजबाबदार कारभारामुळे लाज गेली महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे शहराची लाज गेली आहे, कचराकोंडीमुळे शहर सोडून जावे वाटते, किमान याची जबाबदारी घेऊन सर्वांनी राजीनामे तरी द्यावेत, अशी परखड मते शहराची क्रमवारीत घसरण झाल्याने नागरिकांनी या सर्वेक्षणातून नोंदवली आहेत.

नागरिक म्हणतात : - महानगपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे ऐतिहासिक शहराची लाज गेली.- आयुक्तांनी दबाव न घेता धाडसी निर्णय घ्यावेत.- महापालिकेत सर्वात वाईट राजकारणी आहेत त्यांना बदला. - महापालिका अधिकाऱ्यांनी काम वाढवायला हवे, राजकारण्यांनी हस्तक्षेप करू नये. - महापालिका आयुक्त आणि अधिकारी आपले कर्तव्य योग्यरीत्या पार पाडत नाहीत. - लोकप्रतिनिधी स्वत:ची पोळी भाजत आहेत, त्यांना जनता माफ करणार नाही. - नगरसेवक काहीच काम करीत नाहीत. - प्रसंगाची कुणालाही काळजी नाही. ‘चलता है’ ही प्रवृत्ती.- राजकारणी, महापालिका प्रशासन आणि सरकार जबाबदार. - खूपच लज्जास्पद बाब आहे. - नागरिकांनी शहरातील सर्व लोकप्रतिनिधी आणि आयुक्त यांच्या घरावर मोर्चा काढावा.- लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान