शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शहराची पत मनपा पदाधिकाऱ्यांनी घालवली; स्वच्छ भारत अभियानात शहराचा क्रमांक घसरल्याने नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2019 17:43 IST

कचराकोंडी फोडण्यास महानगरपालिकेतील पदाधिकारी, कचरा व्यवस्थापन करणारे अधिकारी, महापौर आणि आयुक्त हे सर्वाधिक जबाबदार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

ठळक मुद्देलोकमतच्या सर्वेक्षणात नागरिकांचे मतआयुक्तांनी दबावाखाली न येता धाडसी निर्णय घ्यावेत, अशी सूचनाही केली

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियानात शहराचा क्रमांक १२८ वरून २२० वर घसरल्याने शहरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. शहराची पत घालविण्यास मनपाचे सर्व पदाधिकारी जबाबदार असल्याच्या भावना नागरिकांनी लोकमतने घेतलेल्या आॅनलाईन सर्वेक्षणात व्यक्त केल्या. शहराची पत गेलीच, शिवाय कचराकोंडी फोडण्यास महानगरपालिकेतील पदाधिकारी, कचरा व्यवस्थापन करणारे अधिकारी, महापौर आणि आयुक्त हे सर्वाधिक जबाबदार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

देशपातळीवरील स्वच्छ भारत अभियानात शहराच्या कामगिरीचे मूल्यांकन नुकतेच जाहीर करण्यात आले. यात शहराचा क्रमांक १२८ वरून २२० वर घसरला आहे. यामुळे नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी लोकमतने तात्काळ आॅनलाईन सर्वेक्षण घेतले. सर्वेक्षणात तीन प्रश्न विचारण्यात आले. यात २० ते ७५ वयोगटातील नागरिकांनी सहभाग घेतला. क्रमवारीत घसरण झाल्याने शहराची पत गेली आहे का, या प्रश्नावर संताप व्यक्त करीत ९५.१ टक्के नागरिकांनी होय, असे मत नोंदवले. केवळ ४.९ टक्के नागरिकांनी यामुळे शहराची पत गेली नसल्याचे म्हटले आहे. 

शहराची कचराकोंडी फुटत नाही, यास जबाबदार कोण, या प्रश्नावर ३४.१ टक्के नागरिकांनी मनपाच्या सर्व पदाधिकाऱ्यांस जबाबदार धरले आहे. २२ टक्के नागरिकांनी घन कचरा निर्मूलनाची जबाबदारी असणाऱ्या अधिकाऱ्यांस जबाबदार धरले, १७. १ टक्के नागरिकांनी महापौर, तर १२.२ टक्के नागरिकांनी मनपा आयुक्त जबाबदार असल्याचे मत नोंदवले. ९.८ टक्के नागरिकांनी नगरसेवक, तर ४.९ टक्के नागरिकांनी यास शहरवासीय स्वत: जबाबदार असल्याचे म्हटले आहे. 

यासोबतच कचराकोंडी फोडण्यात आमदार, खासदार आणि सरकारचे दुर्लक्ष झाले आहे का? या प्रश्नावर तब्बल ९२.७ टक्के नागरिकांनी लोकप्रतिनिधींचे कचराकोंडी फोडण्यात साफ दुर्लक्ष झाले असल्याचे म्हटले आहे. २.४ टक्के नागरिकांनी नाही, २.४ टक्के नागरिकांनी काही प्रमाणात आणि २.५ टक्के नागरिकांनी सांगता येत नाही, अशी मते नोंदवली आहेत. 

बेजबाबदार कारभारामुळे लाज गेली महापालिकेच्या बेजबाबदारपणामुळे शहराची लाज गेली आहे, कचराकोंडीमुळे शहर सोडून जावे वाटते, किमान याची जबाबदारी घेऊन सर्वांनी राजीनामे तरी द्यावेत, अशी परखड मते शहराची क्रमवारीत घसरण झाल्याने नागरिकांनी या सर्वेक्षणातून नोंदवली आहेत.

नागरिक म्हणतात : - महानगपालिकेच्या बेजबाबदारपणामुळे ऐतिहासिक शहराची लाज गेली.- आयुक्तांनी दबाव न घेता धाडसी निर्णय घ्यावेत.- महापालिकेत सर्वात वाईट राजकारणी आहेत त्यांना बदला. - महापालिका अधिकाऱ्यांनी काम वाढवायला हवे, राजकारण्यांनी हस्तक्षेप करू नये. - महापालिका आयुक्त आणि अधिकारी आपले कर्तव्य योग्यरीत्या पार पाडत नाहीत. - लोकप्रतिनिधी स्वत:ची पोळी भाजत आहेत, त्यांना जनता माफ करणार नाही. - नगरसेवक काहीच काम करीत नाहीत. - प्रसंगाची कुणालाही काळजी नाही. ‘चलता है’ ही प्रवृत्ती.- राजकारणी, महापालिका प्रशासन आणि सरकार जबाबदार. - खूपच लज्जास्पद बाब आहे. - नागरिकांनी शहरातील सर्व लोकप्रतिनिधी आणि आयुक्त यांच्या घरावर मोर्चा काढावा.- लोकप्रतिनिधींनी राजीनामे द्यावेत.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान