शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सिडकोवासीयांना नरकयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 1:06 AM

कचऱ्याच्या ढिगांवर कुठलीही प्रक्रिया होत नसल्यामुळे पावसाने कुजलेल्या कच-याची दुर्गंधी सिडकोवासीयांना नरकयातना देत आहे.

विकास राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : एन-६ येथील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन कब्रस्तानालगत असलेल्या सेंट्रल नाक्याला पालिकेच्या घनकचरा विभागाने कचरानाका करून टाकले आहे. कचऱ्याच्या ढिगांवर कुठलीही प्रक्रिया होत नसल्यामुळे पावसाने कुजलेल्या कच-याची दुर्गंधी सिडकोवासीयांना नरकयातना देत आहे. मनपा, राजकीय नेत्यांसह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यामुळे सिडकोतील नागरिक ‘कचरानाक्या’च्या विरोधात जनआंदोलनाच्या तयारीत आहेत.१२२ दिवसांपासून शहरातील कच-याच्या प्रक्रियेसाठी काहीही निर्णय झालेला नाही. २१ फेबु्रवारी रोजी मनपाने नारेगाव, मांडकी परिसरातील आंदोलकांना १५० दिवसांत कच-यावर तोडगा काढण्याचा शब्द दिला होता. १२२ दिवस संपले आहेत, अजून पालिकेला काहीही करता आलेले नाही. त्यामुळे नारेगावच्या आंदोलकांनी मनपावर जो अविश्वास दाखविला होता, तो खरा होता की काय, असे वाटू लागले आहे.पावसामुळे शहरातील कच-याचे ढीग कुजू लागले आहेत. १२२ दिवसांत मनपाने वाटेल तेथे डम्पिंग ग्राऊंड केले आहे. त्यामुळे त्या कच-यातून आता चोहोबाजूने दुर्गंधी सुटली आहे. जोरदार पाऊस झाला तर शहरातील प्रत्येक कानाकोप-यातून पुरलेला व साचलेला कचरा रोगराईयुक्त हवा निर्माण करील. ज्यामुळे मोठी समस्या शहराला भेडसावील. महिला व बाल आरोग्य कच-याच्या दुर्गंधीमुळे धोक्यात आले आहे. दिवसभर सिडकोतील एन-१, बजरंग चौकापर्यंत तर इकडे आझाद चौकापर्यंत कच-याची दुर्गंधी पसरते आहे. भर लोकवस्तीमध्ये कचरा डेपो असला तरी त्यावर प्रक्रिया करण्याची तसदी पालिका घेत नसल्यामुळे नागरी आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नcidco aurangabadसिडको औरंगाबाद