शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

हर्सूल तलावाच्या पाण्यामुळे सिडकोला दिलासा; नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या,पालिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 20:20 IST

हडको -सिडको भागाला पाणीपुरवठा करताना हर्सूल आणि परिसराला देखील जायकवाडीतून मिळणारे पाच एमएलडी पाणी द्यावे लागत होते.

औरंगाबाद : हर्सूल तलावातील अतिरिक्त ५ एमएलडी पाणी हर्सूल गावासह आसपासच्या परिसराला देण्यात येत आहे. त्यामुळे एन-७ पाण्याच्या टाकीवरून देण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले. हे पाणी सिडको-हडकोसाठीच वापरण्यात येत आहे. सिडको-हडकोत पूर्वीच्या तुलनेत पाण्याच्या तक्रारी अत्यंत कमी झाल्याचा दावा मनपा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या पुढाकाराने हर्सूल तलावातील पाणी घेण्याकरिता स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली. जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती करून त्याची क्षमता वाढविण्यात आली. हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र ते हर्सूल जेलपर्यंत स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात येऊन अडीच लाख लीटर पाणी जलकुंभात घेण्यात आले. त्यासोबतच हरसिद्धीमाता जलकुंभातदेखील हर्सूल तलावाचे पाणी घेऊन विविध वसाहतींना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तीन दिवस पाणीपुरवठा करताच काही नागरिकांनी तक्रारी केल्या. हर्सूलचे पाणी नागरिकांना मिळत असले तरी ते अत्यंत गढूळ असल्यामुळे नागरिकांनी हे पाणी पिण्यास नकार देत जायकवाडीचे पाणी मिळावे, अशी मागणी केली.

हडको -सिडको भागाला पाणीपुरवठा करताना हर्सूल आणि परिसराला देखील जायकवाडीतून मिळणारे पाच एमएलडी पाणी द्यावे लागत होते. सिडको एन-५, एन-७ च्या जलकुंभावरून जेलचा जलकुंभ आणि हरसिद्धीमाता जलकुंभ हे दोन्ही भरून घेतले जात होते. त्यामुळे सिडको-हडकोला सुरळीत पाणी पुरवठा करताना दमछाक होत होती. हर्सूलचा पाणीपुरवठा स्वतंत्रपणे सुरू झाल्यामुळे सिडको-हडकोचा पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी