शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हर्सूल तलावाच्या पाण्यामुळे सिडकोला दिलासा; नागरिकांच्या तक्रारी कमी झाल्या,पालिकेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 20:20 IST

हडको -सिडको भागाला पाणीपुरवठा करताना हर्सूल आणि परिसराला देखील जायकवाडीतून मिळणारे पाच एमएलडी पाणी द्यावे लागत होते.

औरंगाबाद : हर्सूल तलावातील अतिरिक्त ५ एमएलडी पाणी हर्सूल गावासह आसपासच्या परिसराला देण्यात येत आहे. त्यामुळे एन-७ पाण्याच्या टाकीवरून देण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले. हे पाणी सिडको-हडकोसाठीच वापरण्यात येत आहे. सिडको-हडकोत पूर्वीच्या तुलनेत पाण्याच्या तक्रारी अत्यंत कमी झाल्याचा दावा मनपा पाणीपुरवठा विभागाने केला आहे.

शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या पुढाकाराने हर्सूल तलावातील पाणी घेण्याकरिता स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात आली. जलशुद्धीकरण प्रकल्पाची दुरुस्ती करून त्याची क्षमता वाढविण्यात आली. हर्सूल जलशुद्धीकरण केंद्र ते हर्सूल जेलपर्यंत स्वतंत्र पाईपलाईन टाकण्यात येऊन अडीच लाख लीटर पाणी जलकुंभात घेण्यात आले. त्यासोबतच हरसिद्धीमाता जलकुंभातदेखील हर्सूल तलावाचे पाणी घेऊन विविध वसाहतींना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तीन दिवस पाणीपुरवठा करताच काही नागरिकांनी तक्रारी केल्या. हर्सूलचे पाणी नागरिकांना मिळत असले तरी ते अत्यंत गढूळ असल्यामुळे नागरिकांनी हे पाणी पिण्यास नकार देत जायकवाडीचे पाणी मिळावे, अशी मागणी केली.

हडको -सिडको भागाला पाणीपुरवठा करताना हर्सूल आणि परिसराला देखील जायकवाडीतून मिळणारे पाच एमएलडी पाणी द्यावे लागत होते. सिडको एन-५, एन-७ च्या जलकुंभावरून जेलचा जलकुंभ आणि हरसिद्धीमाता जलकुंभ हे दोन्ही भरून घेतले जात होते. त्यामुळे सिडको-हडकोला सुरळीत पाणी पुरवठा करताना दमछाक होत होती. हर्सूलचा पाणीपुरवठा स्वतंत्रपणे सुरू झाल्यामुळे सिडको-हडकोचा पाणीपुरवठा सुरळीत झाला असल्याचे मनपा अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी