शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

चिकलठाणा एमआयडीसीची दररोज वीज गुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2019 11:16 PM

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महिनाभरापासून दररोज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तासन्तास मशीन बंद होत असल्याने वेळेवर आॅर्डर पूर्ण करून देता येत नसल्याने नवीन काम मिळण्यावर परिणाम होत आहे.

ठळक मुद्देपरिणाम : महिनाभरापासून उद्योजक त्रास्त, उत्पादनावर परिणाम

औरंगाबाद : चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत महिनाभरापासून दररोज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडत असल्याने उत्पादनावर विपरीत परिणाम झाला आहे. तासन्तास मशीन बंद होत असल्याने वेळेवर आॅर्डर पूर्ण करून देता येत नसल्याने नवीन काम मिळण्यावर परिणाम होत आहे.चिकलठाणा औद्योगिक वसाहत शासनाला कोट्यवधीचा महसूल देत आहे. मात्र, या परिसरात उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण राहिले नाही. येथील उद्योजक पैसा लावण्यास तयार आहेत, अत्याधुनिक मशीन आहेत, कामगारही सज्ज आहेत; पण वीजपुरवठा नसल्याने सर्व काम ठप्प पडत आहे. मागील महिनाभरापासून दररोज कोणत्या ना कोणत्या फिडरवर एक ते तीन तास वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे कंपनीतील सर्व काम ठप्प पडत आहे. यासंदर्भात उद्योजक किशोर राठी यांनी सांगितले की, चिकलठाणा औद्योगिक वसाहतीत असंख्य अडचणींना तोंड देत येथील कंपन्या तग धरून आहेत. कोट्यवधीचा महसूल या परिसरातून शासनाला प्राप्त होतो; पण त्या तुलनेत या वसाहतीत मूलभूत सुविधा पुरविण्यात शासनाला अपयश येत आहे. दररोज येथील उद्योगांना नवनवीन समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील महिनाभरापासून या परिसरातील वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे वेळेवर उत्पादन तयार करून आॅर्डर पूर्ण करणे कठीण जात आहे. परिणामी, नवीन आॅर्डर मिळण्यास विलंब होत आहे. याचा परिणाम, येथील उलाढालीवर होत आहे. उद्योजक मनीष अग्रवाल म्हणाले की, दररोेज एक ते तीन तास वीजपुरवठा बंद पडला की, पुन्हा मशीन सुरू होऊन काम सुरळीत होण्यास एक ते दीड तास लागतो. यात विनाकारणच वेळ व पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. तासन्तास कामगार बसून राहत आहेत. मागील अनेक दिवसांपासून महावितरण फॉल्ट शोधत आहे; पण यश येत नाही. लवकरात लवकर फॉल्ट शोधून वीजपुरवठा अखंडित करावा, असे आवाहन आम्हा सर्व उद्योगाजकांच्या वतीने करण्यात आले आहे.दिवसेंदिवस काम करणे कठीणमागील महिनाभरापासून कधी इंडस्ट्रिअल फिडर १, कधी फिडर २, तर कधी रेडिएन्ट फिडर, अशा तीन फिडरवरील वीजपुरवठा आलटूनपालटून बंद होत आहे. पूर्वी दिवसातून अर्धातास वीजपुरवठा खंडित होत असे. आता तो २ ते ३ तास खंडित होत आहे. महावितरणचे अंडरग्राऊंड काम सुरू आहे. यामुळे वीज खंडित होते, असे सांगितले जात आहे. पूर्वी शुक्रवारीच वीजपुरवठा बंद होईल, असे सांगण्यात आले होते. एखाद्या दिवशी ठीक आहे; पण दररोज वीजपुरवठा बंद पडत असल्याने कंपनी चालविणे कठीण झाले आहे.-अनुप काबरा,उद्योजक

टॅग्स :AurangabadऔरंगाबादMIDCएमआयडीसीmahavitaranमहावितरण