शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मुलांनो, मामाच्या गावाला जा; पण मे महिन्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 18:45 IST

शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्या कमी अथवा रद्दही नाहीत

औरंगाबाद : अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांना एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आवठड्यापर्यंत पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवावे लागतील. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात वार्षिक परीक्षा घेऊन १ मे रोजी निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाळांना उन्हाळी सुट्या राहतील. सुट्या कमी अथवा रद्द करण्यात आलेल्या नाहीत, असे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

शिक्षण उपसंचालक साबळे यांनी सांगितले की, कोविडमुळे मागील दोन वर्षांत मोजक्याच दिवस शाळा सुरू राहिल्या. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. मात्र, नेटवर्कच्या मर्यादेमुळे मुलांपर्यंत पाहिजे तेवढे हे शिक्षण पोहोचले नाही. परिणामी, अनेक शाळांना अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. ऑक्टोबरपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे शाळा सुरू करण्यात आल्या. काही शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केला, तर काही शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने एप्रिल महिन्यात खाजगी, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे परिपत्रक जारी केले. मात्र, काही पालक, शिक्षकांनी या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला आहे. उन्हाळी सुट्या मे महिन्यापासून सुरू होतील व जूनच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.

मग, रिव्हिजन कराज्या शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, अशा शाळांनी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुलांची रिव्हिजन घ्यावी व तिसऱ्या आठवड्यात द्वितीय सत्राची परीक्षा घ्यावी. ज्या शाळांचा अभ्यासक्रम राहिला असेल, त्या शाळा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी रविवारीदेखील वर्ग भरवू शकतात. मात्र, हा निर्णय शाळांसाठी बंधनकारक नसून तो ऐच्छिक आहे.

सुटीचा बेत रद्द करण्याची गरज नाहीमुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या की, अनेकांना मामाच्या गावाला जाण्याचे वेध लागतात. काही पालक सुट्यांत फिरण्याचा बेत आखतात. मागील दोन वर्षांत कोरोना प्रादुर्भावामुळे बाहेरगावी जाता आले नाही. आता कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळी सुट्यांत फिरण्याचा बेत आखला होता; परंतु उन्हाळी सुट्या रद्द झाल्याचा गैरसमज करत शिक्षण विभागाच्या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शविला होता. मात्र, सुट्या रद्द होणार नाहीत.

टॅग्स :SchoolशाळाAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदStudentविद्यार्थीEducationशिक्षण