शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

मुलांनो, मामाच्या गावाला जा; पण मे महिन्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 18:45 IST

शाळांच्या उन्हाळ्याच्या सुट्या कमी अथवा रद्दही नाहीत

औरंगाबाद : अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शाळांना एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आवठड्यापर्यंत पूर्णवेळ वर्ग सुरू ठेवावे लागतील. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात वार्षिक परीक्षा घेऊन १ मे रोजी निकाल जाहीर करणे अपेक्षित आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाळांना उन्हाळी सुट्या राहतील. सुट्या कमी अथवा रद्द करण्यात आलेल्या नाहीत, असे शिक्षण उपसंचालक अनिल साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

शिक्षण उपसंचालक साबळे यांनी सांगितले की, कोविडमुळे मागील दोन वर्षांत मोजक्याच दिवस शाळा सुरू राहिल्या. त्यामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. मात्र, नेटवर्कच्या मर्यादेमुळे मुलांपर्यंत पाहिजे तेवढे हे शिक्षण पोहोचले नाही. परिणामी, अनेक शाळांना अभ्यासक्रम पूर्ण करता आला नाही. ऑक्टोबरपासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे शाळा सुरू करण्यात आल्या. काही शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केला, तर काही शाळांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने एप्रिल महिन्यात खाजगी, तसेच जिल्हा परिषदेच्या शाळा पूर्णवेळ सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे परिपत्रक जारी केले. मात्र, काही पालक, शिक्षकांनी या आदेशाचा चुकीचा अर्थ लावला आहे. उन्हाळी सुट्या मे महिन्यापासून सुरू होतील व जूनच्या दुसऱ्या आठवड्यात नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.

मग, रिव्हिजन कराज्या शाळांनी अभ्यासक्रम पूर्ण केला असेल, अशा शाळांनी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत मुलांची रिव्हिजन घ्यावी व तिसऱ्या आठवड्यात द्वितीय सत्राची परीक्षा घ्यावी. ज्या शाळांचा अभ्यासक्रम राहिला असेल, त्या शाळा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी रविवारीदेखील वर्ग भरवू शकतात. मात्र, हा निर्णय शाळांसाठी बंधनकारक नसून तो ऐच्छिक आहे.

सुटीचा बेत रद्द करण्याची गरज नाहीमुलांच्या शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या की, अनेकांना मामाच्या गावाला जाण्याचे वेध लागतात. काही पालक सुट्यांत फिरण्याचा बेत आखतात. मागील दोन वर्षांत कोरोना प्रादुर्भावामुळे बाहेरगावी जाता आले नाही. आता कोरोनाचा प्रादुर्भावही कमी झाला आहे. शासनाने अनेक निर्बंधही हटविले आहेत. त्यामुळे यंदा उन्हाळी सुट्यांत फिरण्याचा बेत आखला होता; परंतु उन्हाळी सुट्या रद्द झाल्याचा गैरसमज करत शिक्षण विभागाच्या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शविला होता. मात्र, सुट्या रद्द होणार नाहीत.

टॅग्स :SchoolशाळाAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदStudentविद्यार्थीEducationशिक्षण