शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

तीव्र पाणीटंचाईने चिकू बागा धोक्यात; उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 17:16 IST

चिकू फळबागा अडकल्या पाणीटंचाईच्या चक्रव्यूहात; एप्रिल, मेमध्ये गरज असताना पाण्याचा तुटवडा

वासडी ( छत्रपती संभाजीनगर) : परिसरातील अनेक गावांमध्ये चिकूच्या फळबागा आहेत. मात्र यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने या बागा धोक्यात आल्या आहेत. बागांना बहार लागण्यासाठी एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक पाण्याची आवश्यकता लागते. मात्र यंदा वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्याने चिकूच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे फळबागधारक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कन्नड तालुक्यातील वासडी परिसरातील साखरवेल, खातखेडा, रामनगर, पळशी बु., पळशी खु, पिशोर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिकूच्या बागा आहेत. यातील अनेक फळबागा या तीस वर्षांपूर्वीच्या आहेत. या फळबागांना एप्रिल मे मध्ये पाण्याची व्यवस्था असली, तर उत्पादनात चांगली वाढ होते. मात्र यंदा परिसरातील अंजना-पळशी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे. तसेच कडक उन्हाळ्यामुळे विहिरींमधीलही पाणी आटले आहे. परिणामी शेतकऱ्यांना ऐन बहरात या फळबागांना पाणी देता आले नाही, याचा विपरीत परिणाम मृग बहार धरण्यावर, तो टिकण्यावर आणि पर्यायाने उत्पादनात सर्वाधिक फटका बसणार आहे. तसेच त्यानंतर येणाऱ्या आंबा बहरावरही याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता जूनमध्ये जरी पाणीटंचाई दूर झाली तरी, बागांचे नुकसान भरून निघणार नाही, अशी माहिती खातखेडा येथील शेतकरी नारायण मोहनराव पवार, रामनगर येथील शेतकरी संजय कौतिकराव गायकवाड यांनी दिली.

पाणीटंचाईमुळे ठिबकचा वापरवासडी परिसरातील जवळपास शेतकरी चिकूच्या बागांना यापूर्वी आळे पद्धतीने पाणी देत होते. मात्र यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी उधार उसणे करीत ठिबक संच घेतलेला आहे. ठिबकमुळे कमी पाणी लागत असले तरी, पाणीटंचाई असल्याने बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

नवीन कळ्या लागू शकल्या नाहीया उन्हाळ्यात नेहमीपेक्षा उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे चिकूच्या झाडांना नवीन कळ्या लागू शकल्या नाहीत तर ज्या लागल्या होत्या, त्यापण गळून गेल्या. उष्णता व पाणीटंचाईमुळे फळे झाडावरच पिकली. पैकी काहीची गळ झाली. त्यामुळे सगळी फळे विक्रीसाठी उपलब्ध झाली नाहीत. परिणामी मोठे नुकसान झाले.- सोपान विठ्ठलराव लोंढे, शेतकरी, रामनगर

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रwater scarcityपाणी टंचाई