शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तीव्र पाणीटंचाईने चिकू बागा धोक्यात; उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 17:16 IST

चिकू फळबागा अडकल्या पाणीटंचाईच्या चक्रव्यूहात; एप्रिल, मेमध्ये गरज असताना पाण्याचा तुटवडा

वासडी ( छत्रपती संभाजीनगर) : परिसरातील अनेक गावांमध्ये चिकूच्या फळबागा आहेत. मात्र यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने या बागा धोक्यात आल्या आहेत. बागांना बहार लागण्यासाठी एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक पाण्याची आवश्यकता लागते. मात्र यंदा वेळेवर पाणी उपलब्ध न झाल्याने चिकूच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे फळबागधारक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

कन्नड तालुक्यातील वासडी परिसरातील साखरवेल, खातखेडा, रामनगर, पळशी बु., पळशी खु, पिशोर आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिकूच्या बागा आहेत. यातील अनेक फळबागा या तीस वर्षांपूर्वीच्या आहेत. या फळबागांना एप्रिल मे मध्ये पाण्याची व्यवस्था असली, तर उत्पादनात चांगली वाढ होते. मात्र यंदा परिसरातील अंजना-पळशी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपला आहे. तसेच कडक उन्हाळ्यामुळे विहिरींमधीलही पाणी आटले आहे. परिणामी शेतकऱ्यांना ऐन बहरात या फळबागांना पाणी देता आले नाही, याचा विपरीत परिणाम मृग बहार धरण्यावर, तो टिकण्यावर आणि पर्यायाने उत्पादनात सर्वाधिक फटका बसणार आहे. तसेच त्यानंतर येणाऱ्या आंबा बहरावरही याचा विपरीत परिणाम होणार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता जूनमध्ये जरी पाणीटंचाई दूर झाली तरी, बागांचे नुकसान भरून निघणार नाही, अशी माहिती खातखेडा येथील शेतकरी नारायण मोहनराव पवार, रामनगर येथील शेतकरी संजय कौतिकराव गायकवाड यांनी दिली.

पाणीटंचाईमुळे ठिबकचा वापरवासडी परिसरातील जवळपास शेतकरी चिकूच्या बागांना यापूर्वी आळे पद्धतीने पाणी देत होते. मात्र यंदा तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी उधार उसणे करीत ठिबक संच घेतलेला आहे. ठिबकमुळे कमी पाणी लागत असले तरी, पाणीटंचाई असल्याने बागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची दमछाक होत आहे.

नवीन कळ्या लागू शकल्या नाहीया उन्हाळ्यात नेहमीपेक्षा उष्णता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे चिकूच्या झाडांना नवीन कळ्या लागू शकल्या नाहीत तर ज्या लागल्या होत्या, त्यापण गळून गेल्या. उष्णता व पाणीटंचाईमुळे फळे झाडावरच पिकली. पैकी काहीची गळ झाली. त्यामुळे सगळी फळे विक्रीसाठी उपलब्ध झाली नाहीत. परिणामी मोठे नुकसान झाले.- सोपान विठ्ठलराव लोंढे, शेतकरी, रामनगर

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रwater scarcityपाणी टंचाई