शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वरूडकाझी येथील अवैध कत्तलखान्यांवर चिकलठाणा पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 19:10 IST

कत्तलखान्याशेजारीच अत्यंत क्रूरपद्धतीने बांधून ठेवलेल्या २० गोवंशची पोलिसांनी मुक्तता केली

ठळक मुद्देगुप्त माहितीवरून पोलिसांनी संशयित पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. गोवंशची कत्तल करीत असलेल्या चार जणांपैकी दोघे अटकेत

औरंगाबाद: वरूडकाझी येथील अवैध कत्तलखान्यावर चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी धाड टाकली. यावेळी तेथे तीन गोवंशची हत्या करण्यात आल्याचे आढळले. या कत्तलखान्याशेजारीच अत्यंत क्रूरपद्धतीने बांधून ठेवलेल्या २० गोवंशची पोलिसांनी मुक्तता करीत दोन जणांना अटक केली. यावेळी दोन संशयित पळून गेले. या कारवाईमुळे चोरट्यामार्गाने अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.

शेख सद्दाम शेख रहेमान (रा.वरूडकाझी), अकबर खलील शेख  अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर फय्याज फकीर कुरेशी, फिरोज रफिक कुरेशी अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्यात आली आहे, तेव्हापासून गोवंशची सर्व कत्तलखाने बंद करण्यात आली. तसेच गोवंशची कत्तल करणे कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. असे असताना वरूड काझी शिवारातील चोरट्यामार्गाने गोवंशची कत्तल केली जाते, अशी माहिती चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश आंधळे यांना मिळाली. यानंतर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिनरीक्षक गोपाल देशमुख, पोलीस कर्मचारी बादलसिंग कवाल, दिनकर थोरे, अजित शेकडे , विशाल नरवडे,  गोपाल डवले, सुधाकर बोचरे, दिपक सुरे अनिल जायभाये, दिनकर पांढरे, अण्णा गावंडे, विशाल लोंढे यांना सोबत घेऊन संशयित पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. यावेळी गोवंशची कत्तल करीत असलेल्या चार जणांपैकी शेख सद्दाम आणि अकबर खलील यांना पोलिसांनी पकडले तर फय्याज कुरेशी आणि फिरोज कुरेशी हे पोलिसांना पाहून पळून गेले.  यावेळी तेथे तीन गोवंशची मुंडके आणि बारा पाय तेथे कापलेली होती, शिवाय रक्तामांसाचा सडाच तेथे जागोजागी पडलेला होता. मांस लटकावून ठेवले होते. यावेळी पशूवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घटनास्थळाचा पंचनामा करून गोवंश मांस  आणि कत्तलीसाठी वापरलेली शस्त्रे जप्त केली.

क्रुरपणे बांधून ठेवलेल्या २० गुरांची मुक्तता वरूडकाझी येथील या कत्तलखान्यापासून काही अंतरावर नासेर मन्नू कुरेशी आणि मोहम्मद कालू कुरेशी यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यात आखूड दाव्यांना २० गोवंश बांधून ठेवल्याचे आढळले. या गुरांना पुरेसे अन्न पाणी न देता त्यांची क्रूरवागणूक देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी ही सर्व गुरांची मुक्ताता करून त्यांची रवानगी गोशाळेत केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकAurangabadऔरंगाबाद