शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

वरूडकाझी येथील अवैध कत्तलखान्यांवर चिकलठाणा पोलिसांची धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 19:10 IST

कत्तलखान्याशेजारीच अत्यंत क्रूरपद्धतीने बांधून ठेवलेल्या २० गोवंशची पोलिसांनी मुक्तता केली

ठळक मुद्देगुप्त माहितीवरून पोलिसांनी संशयित पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. गोवंशची कत्तल करीत असलेल्या चार जणांपैकी दोघे अटकेत

औरंगाबाद: वरूडकाझी येथील अवैध कत्तलखान्यावर चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी सकाळी धाड टाकली. यावेळी तेथे तीन गोवंशची हत्या करण्यात आल्याचे आढळले. या कत्तलखान्याशेजारीच अत्यंत क्रूरपद्धतीने बांधून ठेवलेल्या २० गोवंशची पोलिसांनी मुक्तता करीत दोन जणांना अटक केली. यावेळी दोन संशयित पळून गेले. या कारवाईमुळे चोरट्यामार्गाने अवैध कत्तलखाने सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले.

शेख सद्दाम शेख रहेमान (रा.वरूडकाझी), अकबर खलील शेख  अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर फय्याज फकीर कुरेशी, फिरोज रफिक कुरेशी अशी पळून गेलेल्या आरोपींची नावे आहेत. राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्यात आली आहे, तेव्हापासून गोवंशची सर्व कत्तलखाने बंद करण्यात आली. तसेच गोवंशची कत्तल करणे कायद्याने गुन्हा ठरविण्यात आला आहे. असे असताना वरूड काझी शिवारातील चोरट्यामार्गाने गोवंशची कत्तल केली जाते, अशी माहिती चिकलठाणा ठाण्याचे सहायक निरीक्षक महेश आंधळे यांना मिळाली. यानंतर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिनरीक्षक गोपाल देशमुख, पोलीस कर्मचारी बादलसिंग कवाल, दिनकर थोरे, अजित शेकडे , विशाल नरवडे,  गोपाल डवले, सुधाकर बोचरे, दिपक सुरे अनिल जायभाये, दिनकर पांढरे, अण्णा गावंडे, विशाल लोंढे यांना सोबत घेऊन संशयित पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. यावेळी गोवंशची कत्तल करीत असलेल्या चार जणांपैकी शेख सद्दाम आणि अकबर खलील यांना पोलिसांनी पकडले तर फय्याज कुरेशी आणि फिरोज कुरेशी हे पोलिसांना पाहून पळून गेले.  यावेळी तेथे तीन गोवंशची मुंडके आणि बारा पाय तेथे कापलेली होती, शिवाय रक्तामांसाचा सडाच तेथे जागोजागी पडलेला होता. मांस लटकावून ठेवले होते. यावेळी पशूवैद्यकीय अधिकारी यांना बोलावून घटनास्थळाचा पंचनामा करून गोवंश मांस  आणि कत्तलीसाठी वापरलेली शस्त्रे जप्त केली.

क्रुरपणे बांधून ठेवलेल्या २० गुरांची मुक्तता वरूडकाझी येथील या कत्तलखान्यापासून काही अंतरावर नासेर मन्नू कुरेशी आणि मोहम्मद कालू कुरेशी यांनी त्यांच्या शेतातील गोठ्यात आखूड दाव्यांना २० गोवंश बांधून ठेवल्याचे आढळले. या गुरांना पुरेसे अन्न पाणी न देता त्यांची क्रूरवागणूक देत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी ही सर्व गुरांची मुक्ताता करून त्यांची रवानगी गोशाळेत केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकAurangabadऔरंगाबाद