चिकलठाणा शेतकरी प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:03 IST2021-08-22T04:03:27+5:302021-08-22T04:03:27+5:30

नीलेश कावडे, शेतकरी कचरा प्रक्रिया केंद्रातील घाण पाणी हळूहळू शेतात येत असतानाच आम्ही घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना सांगण्याचा ...

Chikalthana farmer reaction | चिकलठाणा शेतकरी प्रतिक्रिया

चिकलठाणा शेतकरी प्रतिक्रिया

नीलेश कावडे, शेतकरी

कचरा प्रक्रिया केंद्रातील घाण पाणी हळूहळू शेतात येत असतानाच आम्ही घनकचरा विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे यांना सांगण्याचा प्रयत्न अनेकदा केला. ते फोनच उचलत नाहीत. दूषित पाणी बंद करा असे सांगितल्यानंतरही मनपाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. शेवटी कंटाळून लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागले.

अंकुश कावडे, शेतकरी

१ लाख १६ हजार लिटरचे टँक

महापालिकेने कचरा प्रक्रिया प्रकल्पाजवळ १ लाख १६ हजार लिटर क्षमतेचा लिजेड (दूषित पाणी) टँक बांधला आहे. पावसाळ्यात हा टँक लवकर भरतो. टँकमधील दूषित पाणी टँकरमध्ये भरून नक्षत्रवाडीतील मलशुद्धीकरण केंद्रात नेऊन टाकले जाते. मागील काही दिवसांपासून मनपाने हे टँक रिकामे केले नाही. दर महिन्याला टँक रिकामे केले तर हा प्रश्नच निर्माण होत नाही, असे सूत्रांनी सांगितले.

Web Title: Chikalthana farmer reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.