शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
3
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
4
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
5
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
6
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
7
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
8
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
9
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
10
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
11
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
12
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
13
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
14
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
15
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
16
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
17
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
18
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
19
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
20
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!

छावणी जळीत घटना; योग्य कलमांची वाढ, आराेपीला अटकही होणार

By सुमित डोळे | Updated: April 6, 2024 19:56 IST

पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांचे स्पष्टीकरण, घटनेच्या नेमक्या कारणांचा तज्ज्ञांकडून अहवालही मागवणार

छत्रपती संभाजीनगर : छावणीच्या दाना बाजारमध्ये बुधवारी पहाटे ३:३० वाजता कपड्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत सात जणांचे संपूर्ण कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. यात घरमालक शेख अस्लम शेख युनूस याच्यावर सात जणांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, चौकशीसाठी ताब्यातही घेतले गेले नाही. मात्र, घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. यात आवश्यक कलमांची वाढ करून आरोपी शेख असलमला अटकदेखील होईल, असे पोलिस उपायुक्त नितीन बगाटे यांनी स्पष्ट केले.

शेख असलम शेख युनूस (५५) याच्या चार मजली घराच्या तळमजल्यावरील दुकानाला आग लागून बुधवारी शहराला हादरून टाकणारी घटना घडली. दुसऱ्या मजल्यावर भाड्याने राहणाऱ्या हमिदा बेगम अब्दुल अजीज (५५), त्यांची दोन मुले वसीम शेख (३५), सोहेल (३२), वसीम यांची पत्नी तनवीर (२७), सोहेल यांची पत्नी रेश्मा (२२) व अब्दुल यांची मुले असीम (४) व महानूर ऊर्फ परी (२) यांचा यात मृत्यू झाला. यात असलमच्या अनेक चुकांमुळेच ही आग लागल्याचा निष्कर्ष अग्निशमन विभाग, महावितरणच्या अधिकाऱ्यांनी पाहणीनंतर काढला होता. मात्र, छावणी पोलिसांनी कलमांमध्ये कुचराई करत केवळ भादंवी ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला. उपायुक्त बगाटे यांनी मात्र कलमांमध्ये वाढ करण्याचे आदेश दिल्यानंतर भादंवी ३०४ चे कलम वाढवण्यात आले. महावितरणच्या अहवालानंतर भारतीय विद्युत कायदा १३५ चेही कलम लावण्यात आले.

असलमवर नेमके आरोप काय ?महावितरणने व्यावसायिक मीटरची जोडणी तोडल्यानंतरही त्याने संपूर्ण दुकान, पाच मशीनचा वापर घरगुती मीटरवर केला. शिवाय, तीनही कुटुंबांतील विजेचा वापर त्याच मीटरवर सुरू होता. महावितरण अधिकाऱ्यांच्या मते, वायर देखील अत्यंत खराब दर्जाची होती.-अरुंद जिना बांधला. स्वत:च्या मजल्याला गॅलरी ठेवली. मात्र, दुसऱ्या मजल्यावरील घराला गॅलरी, खिडकी, मोकळी जागाच ठेवली नाही.-या सर्व बाबी धोकेदायक असू शकतात, याची जाणीव असलमला असूनही त्याने त्या चुका केल्या.

काय फरकभादंवी ३०४ (अ) नुसार हयगयीने मृत्यूस कारण होणे. यात सदोष मनुष्यवध या सदरात न मोडणारी कोणतीही हयगयीची कृती करून व्यक्तीच्या मृत्यूस कारण होईल.भादंवी ३०४ - मृत्यू घडवून आणण्याच्या किंवा ज्या कृत्यामुळे मृत्यू घडून येण्याचा संभव आहे, अशी जाणीव असूनही ते कृत्य करणे. यात दहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षेची तरतूद आहे. बगाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर घटना गंभीर आहे. असलम ला अटक केली जाईल. शिवाय, तज्ञांकडून देखील आम्ही या घटनेच्या नेमक्या कारणांचा स्वतंत्र अहवाल घेणार आहोत. ज्यातून आरोपीला शिक्षा होण्यास मदत मिळेल, असेही बगाटे यांनी स्पष्ट केले.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीfireआग