शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

पाच महिने अगोदरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा

By विजय सरवदे | Updated: November 8, 2023 15:57 IST

जिल्हा परिषदेने तीन महिन्यांसाठी केला २२ कोटींचा कृती आराखडा

छत्रपती संभाजीनगर : साधारणपणे मार्च महिन्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसत असतात. मात्र, यावेळी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील ७८ गावे व ६ वाड्यांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र यावरून दिसते. तथापि, पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने डिसेंबरपर्यंत २२ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. 

यंदा पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे जिल्ह्यातील नद्या, बंधारे, तलाव कोरडे पडले आहेत. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाच महिने अगोदरच अनेक गावे, वाड्या, तांड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. आजच्या घडीला ७८ गावे व ६ वाड्यांसाठी ८७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यापुढे टंचाईग्रस्त गावांची आकडेवारी रोज वाढत जाईल. मागच्या वर्षी जिल्ह्यातील मोजक्याच गावांना टंचाई जाणवली. त्यांच्यासाठी अवघ्या दोनच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.

दरम्यान, हिवाळ्यातील पाणीटंचाईसाठी जिल्हा परिषदेला अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच नियोजन करावे लागले. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत विहिरी अधिग्रहण, टँकर, विंधन विहिरींची दुरुस्ती, नदीपात्रात बुडक्या घेण्यासाठी २२ कोटी १० लाख ५ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

सध्या छत्रपती संभाजीनगर आणि पैठण तालुक्यातील सर्वाधिक गावे तहानलेली आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गोलटगाव, सांजखेडा, एकलहरा, महमदपूर, जोडवाडी, पांढरीतांडा, पांढरीपिंपळगाव, घारदोन, कन्नोनाईक तांडा, बेगानाईक तांडा, दरकवाडी, खामखेडा, करंजगाव, कोनवाडी, जडगाव २, डायगव्हाण, कौडगाव जालना, काऱ्होळ, भिंदोन, हिरापूर, वडाचीवाडी, लालवाडी, कचनेर, डोणवाडा, पिंपळखुटा, कंचनापूर, गोकुळवाडी, पांढरीतांडा, पांढरीतांडा १, शेंद्राकमंगर अंतर्गत शिवाजीनगर, पैठण तालुक्यातील आडूळ बु., आडूळ खु., आंतरवालीखांडी, ब्राम्हणगाव, ब्राम्हणगाव तांडाढ, गेवराई मर्दा, गेवराई खु., गेवराई बु., अब्दुल्लापूर, होणोबाची वाडी, एकतुनी, रजापूर, हिरापूर, थापटीतांडा, पारुंडीतांडा, आडगाव जावळे, दाभरुळ, कडेठाण खु., दादेगाव खु., दादेगाव बु., दरेगाव, देवगाव, देवगाव तांडा, तुपेवाडी तांडा, सुंदरवाडी, चिंचाळा, मिरखेडा, केकतजळगाव, हर्षी बु. चौंडाळा आदी गावांचा समावेश आहे.

टंचाईची तीव्रता वाढणारसध्या ८४ गावांत पाणीटंचाई आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील २३६ गावे पाणीटंचाईच्या विळख्यात सापडतील, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाने लावला आहे. त्यासाठी २४२ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार असून पाणीपुरवठा करण्यासाठी २४५ टँकरचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई