शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पाच महिने अगोदरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा

By विजय सरवदे | Updated: November 8, 2023 15:57 IST

जिल्हा परिषदेने तीन महिन्यांसाठी केला २२ कोटींचा कृती आराखडा

छत्रपती संभाजीनगर : साधारणपणे मार्च महिन्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसत असतात. मात्र, यावेळी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील ७८ गावे व ६ वाड्यांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र यावरून दिसते. तथापि, पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने डिसेंबरपर्यंत २२ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. 

यंदा पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे जिल्ह्यातील नद्या, बंधारे, तलाव कोरडे पडले आहेत. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाच महिने अगोदरच अनेक गावे, वाड्या, तांड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. आजच्या घडीला ७८ गावे व ६ वाड्यांसाठी ८७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यापुढे टंचाईग्रस्त गावांची आकडेवारी रोज वाढत जाईल. मागच्या वर्षी जिल्ह्यातील मोजक्याच गावांना टंचाई जाणवली. त्यांच्यासाठी अवघ्या दोनच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.

दरम्यान, हिवाळ्यातील पाणीटंचाईसाठी जिल्हा परिषदेला अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच नियोजन करावे लागले. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत विहिरी अधिग्रहण, टँकर, विंधन विहिरींची दुरुस्ती, नदीपात्रात बुडक्या घेण्यासाठी २२ कोटी १० लाख ५ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

सध्या छत्रपती संभाजीनगर आणि पैठण तालुक्यातील सर्वाधिक गावे तहानलेली आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गोलटगाव, सांजखेडा, एकलहरा, महमदपूर, जोडवाडी, पांढरीतांडा, पांढरीपिंपळगाव, घारदोन, कन्नोनाईक तांडा, बेगानाईक तांडा, दरकवाडी, खामखेडा, करंजगाव, कोनवाडी, जडगाव २, डायगव्हाण, कौडगाव जालना, काऱ्होळ, भिंदोन, हिरापूर, वडाचीवाडी, लालवाडी, कचनेर, डोणवाडा, पिंपळखुटा, कंचनापूर, गोकुळवाडी, पांढरीतांडा, पांढरीतांडा १, शेंद्राकमंगर अंतर्गत शिवाजीनगर, पैठण तालुक्यातील आडूळ बु., आडूळ खु., आंतरवालीखांडी, ब्राम्हणगाव, ब्राम्हणगाव तांडाढ, गेवराई मर्दा, गेवराई खु., गेवराई बु., अब्दुल्लापूर, होणोबाची वाडी, एकतुनी, रजापूर, हिरापूर, थापटीतांडा, पारुंडीतांडा, आडगाव जावळे, दाभरुळ, कडेठाण खु., दादेगाव खु., दादेगाव बु., दरेगाव, देवगाव, देवगाव तांडा, तुपेवाडी तांडा, सुंदरवाडी, चिंचाळा, मिरखेडा, केकतजळगाव, हर्षी बु. चौंडाळा आदी गावांचा समावेश आहे.

टंचाईची तीव्रता वाढणारसध्या ८४ गावांत पाणीटंचाई आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील २३६ गावे पाणीटंचाईच्या विळख्यात सापडतील, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाने लावला आहे. त्यासाठी २४२ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार असून पाणीपुरवठा करण्यासाठी २४५ टँकरचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई