शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

पाच महिने अगोदरच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा

By विजय सरवदे | Updated: November 8, 2023 15:57 IST

जिल्हा परिषदेने तीन महिन्यांसाठी केला २२ कोटींचा कृती आराखडा

छत्रपती संभाजीनगर : साधारणपणे मार्च महिन्यापासून जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा बसत असतात. मात्र, यावेळी हिवाळ्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील ७८ गावे व ६ वाड्यांच्या घशाला कोरड पडली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र यावरून दिसते. तथापि, पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने डिसेंबरपर्यंत २२ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. 

यंदा पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे जिल्ह्यातील नद्या, बंधारे, तलाव कोरडे पडले आहेत. अनेक विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाच महिने अगोदरच अनेक गावे, वाड्या, तांड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. आजच्या घडीला ७८ गावे व ६ वाड्यांसाठी ८७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यापुढे टंचाईग्रस्त गावांची आकडेवारी रोज वाढत जाईल. मागच्या वर्षी जिल्ह्यातील मोजक्याच गावांना टंचाई जाणवली. त्यांच्यासाठी अवघ्या दोनच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला होता.

दरम्यान, हिवाळ्यातील पाणीटंचाईसाठी जिल्हा परिषदेला अनेक वर्षांनंतर पहिल्यांदाच नियोजन करावे लागले. ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत विहिरी अधिग्रहण, टँकर, विंधन विहिरींची दुरुस्ती, नदीपात्रात बुडक्या घेण्यासाठी २२ कोटी १० लाख ५ हजार रुपयांचा आराखडा तयार केला आहे.

सध्या छत्रपती संभाजीनगर आणि पैठण तालुक्यातील सर्वाधिक गावे तहानलेली आहेत. यामध्ये छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गोलटगाव, सांजखेडा, एकलहरा, महमदपूर, जोडवाडी, पांढरीतांडा, पांढरीपिंपळगाव, घारदोन, कन्नोनाईक तांडा, बेगानाईक तांडा, दरकवाडी, खामखेडा, करंजगाव, कोनवाडी, जडगाव २, डायगव्हाण, कौडगाव जालना, काऱ्होळ, भिंदोन, हिरापूर, वडाचीवाडी, लालवाडी, कचनेर, डोणवाडा, पिंपळखुटा, कंचनापूर, गोकुळवाडी, पांढरीतांडा, पांढरीतांडा १, शेंद्राकमंगर अंतर्गत शिवाजीनगर, पैठण तालुक्यातील आडूळ बु., आडूळ खु., आंतरवालीखांडी, ब्राम्हणगाव, ब्राम्हणगाव तांडाढ, गेवराई मर्दा, गेवराई खु., गेवराई बु., अब्दुल्लापूर, होणोबाची वाडी, एकतुनी, रजापूर, हिरापूर, थापटीतांडा, पारुंडीतांडा, आडगाव जावळे, दाभरुळ, कडेठाण खु., दादेगाव खु., दादेगाव बु., दरेगाव, देवगाव, देवगाव तांडा, तुपेवाडी तांडा, सुंदरवाडी, चिंचाळा, मिरखेडा, केकतजळगाव, हर्षी बु. चौंडाळा आदी गावांचा समावेश आहे.

टंचाईची तीव्रता वाढणारसध्या ८४ गावांत पाणीटंचाई आहे. ही संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत जिल्ह्यातील २३६ गावे पाणीटंचाईच्या विळख्यात सापडतील, असा अंदाज पाणीपुरवठा विभागाने लावला आहे. त्यासाठी २४२ विहिरी अधिग्रहित कराव्या लागणार असून पाणीपुरवठा करण्यासाठी २४५ टँकरचे नियोजन करण्यात आले आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादwater scarcityपाणी टंचाई